गुरुवार, ३१ ऑगस्ट, २०१७

● बहिष्काराचा उद्देश

● बहिष्काराचा उद्देश

बाबासाहेब म्हणतात -
"दूसरे ज्ञानेश्वराने तरी काय केले? त्याने भगवत गीता ज्ञानेश्वरी नावाचा ग्रंथ लिहिला. त्या ग्रंथाचे सार काय? तर जग हे ब्रह्ममय आहे. जर जग ब्रह्ममय आहे, तर महार - मांगात ही ब्रह्म असायला पाहिजे. मग ज्ञानेश्वर महार - मांगात का राहिला नाही. ब्राह्मणाने त्यास परत घ्यावे म्हणून त्याने प्रयत्न का केला? ब्राह्मणाने त्यास वाळीत टाकल्या नंतर त्याने त्यांना सांगायला पाहिजे होते की, मी महार - मांगात जावून राहीन. कारण सर्व जग ब्रह्ममय आहे. पण असे त्याने सांगितलेले नाही."

"सर्व साधारण जनतेला भूलविण्यासाठी हे सर्व थोतांड आहे आणि या थोतांडला तुम्ही सर्व भुललेले आहात. तेव्हा तुम्ही पंढरी किंवा जेजुरी किंवा दुसऱ्या कुठल्या देवाच्या नादी लागलात. तर तुम्हाला वाळीत टाकण्याचा हूकूम मला द्यावा लागेल. त्याच्या शिवाय तुमचा देव भोळेपणा जाणार नाही आणि तुमची सुधारणा ही होणार नाही. आजचे युग हे विचारांचे युग आहे. कसले ही थोतांड रचले तरी ते थोतांड आहे, हे तुम्हाला ओळखता आले पाहिजे."

संदर्भ -
डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे : खंड १८, पान क्र. ३६४

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

● बुद्ध धम्माच्या आचरणाच्या दृष्टीने

● बुद्ध धम्माच्या आचरणाच्या दृष्टीने

लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षेच्या वेळी दिलेल्या २२ प्रतिज्ञा मधील पहिल्या आठ प्रतिज्ञा (क्रमांक १ ते ८) हिंदू धर्माचा धिक्कार करणाऱ्या आहेत, तर उर्वरित १४ प्रतीज्ञा बौद्ध धर्माचे आचरण करण्याचा निश्चय करणाऱ्या आहेत. बौद्धा मधील अनेक जण पहिल्या आठ प्रतिज्ञांचा (क्रमांक १ ते ८) हवाला देऊन बौद्ध धम्माला हिंदू धर्माचा विरोधी धर्म म्हणून उभे करण्याचा खटाटोप करतात. उर्वरित १४ प्रतीज्ञां बाबत मात्र तेवढाच टोकाचा आग्रह धरताना दिसत नाही. (काही सन्माननीय अपवाद वगळता)

माझ्या मते,
हिंदू धर्माचा धिक्कार करणाऱ्या या आठ प्रतिज्ञा व १९ व्या क्रमांकाची - "माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला अस्मान व नीच मानणाऱ्या हिंदु धर्माचा मी त्याग करतो व बुद्धाच्या धर्माचा स्वीकार करतो." ही प्रतिज्ञा त्यावेळी धर्मांतर करणारा सर्वच समुदाय त्या क्षणी हिंदू असल्यामुळे त्यांची हिंदू धर्म सोडण्याची मानसिक तयारी करून घेण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या आहेत. एकदा का व्यक्तीने स्वतः ला बौद्ध म्हणून घोषित केले तर त्याच्या पुढील जीवनात या आठ प्रतिज्ञा व १९ व्या क्रमांकाची प्रतिज्ञा गैर लागू ठरतात. उर्वरित १३ प्रतिज्ञा मात्र बुद्ध धम्माच्या आचरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या ठरतात. या तेरा प्रतिज्ञां पैकी क्रमांक ९ व १० च्या प्रतिज्ञा बुद्धाच्या धम्माची समानता प्रस्थापित करण्याशी असलेली बांधिलकी स्पष्ट करणाऱ्या आहेत तर क्रमांक ११ ते १८ या प्रतिज्ञा अष्टांगिक मार्ग, पंचशील व पारमिता यांचे पालन करण्या विषयी आहेत. या प्रतिज्ञा बौद्ध धम्माचे अविभाज्य अंग असल्याने या प्रतीज्ञाना बाबासाहेबांनी "बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथात स्थान दिले आहे.

मात्र हिंदू धर्माचा धिक्कार करणाऱ्या क्रमांक १ ते ८ च्या प्रतीज्ञाना बाबासाहेबांनी "बुद्ध आणि त्याचा धम्म" या ग्रंथात स्थान दिलेले नाही. याचाच अर्थ धर्मांतर करणारी व्यक्ती जर हिंदू व्यतिरिक्त अन्य धर्माची असेल तर या प्रतिज्ञा त्यानुसार बदलल्या जाऊ शकतात. या आठ प्रतीज्ञांचे स्वरूप व्यक्तीची पूर्व धारणा बदलण्या संदर्भातील आहे. ही पूर्व धारणा काहीही म्हणजेच हिंदू, मुस्लिम, सिख, ख्रिस्चन, पारसी किंवा अन्य पंथाला मानणारी किंवा निधर्मी असू शकते. या पूर्व धारणेचा बुद्धांची स्वतंत्र ओळख किंवा संस्कृती निर्माण करण्याशी काहीही संबंध नाही. यामुळे हिंदू किंवा अन्य कोणत्याही धर्माशी संबंधित बाबीं विषयी बौद्ध व्यक्तीची भावना वैरत्वाची नव्हे तर उपेक्षेची असली पाहिजे.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

● बौध्दांनी हातचे सोडून पळत्या मागे लागू नये.

● बौध्दांनी हातचे सोडून पळत्या मागे लागू नये.

लेख -
सतीश कांबळे : कोल्हापुर

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

सोशल मिडीया वापरणाऱ्या आंबेडकरी बांधवांना माझी विनंती आहे. प्रत्येक समाजाने आप आपले महापुरुष वाटून घेतलेत. आपणच कुठल्याही समाजाचा विनाकारण उदोउदो करणे सोडायला हवे. माझे हे बोलणे कदाचित आवडणार नाही, पण सत्य आहे. गरज नसताना आपण भावुक होत असतो, हा पण माझा तो पण माझा हे चूक आहे. आज वरचा ईतिहास पाहिला तर बौध्दांना संघर्षा शिवाय काही मिळत नाही. आपण उदार होवुन दुसऱ्यांसाठी संघर्ष करतो, पण ते लोक नंतर आपल्या वरच उलटतात. कोणतीही सामाजिक घटना पहा. जिथे आपला काहीच संबंध नसतो तिथे ही आपण रिऍक्ट होतो व धावती गाढवं अंगावर घेतो. मला वाटते की ज्याची लढाई त्यानेच लढावी. आपण करतो काय की दुसऱ्यांना दळुन देतो. नको असलेले विषय चघळत राहतो. आरक्षण, ऍट्रोसिटी हे केवळ आपल्याकरता आहे का? तरीही या विषयी आपण लोक कमालीचे प्रतिक्रीयावादी बनतो. विरोधकांचे टार्गेट बनतो. जे ईतर आरक्षण घेतात ते आपली मजा पाहत असतात. गोळीला आपण व पोळीला सगळे असा सगळा मामला असतो. हे कुठे तरी थांबायला हवे. आरक्षणाची गरज केवळ आपल्यालाच आहे का? ऍट्रोसिटीची गरज केवळ आपल्यालाच आहे का? जर केवळ आपल्यालाच गरज असेल तर त्यावेळी आपल्या साथीला कोण असते का? कधी कुठल्या समाजाने बौध्दांना पाठिंबा म्हणुन एखादा मोर्चा काढलाय का?निदर्शने केली आहेत का? तेव्हा आपण एकटे लढत असतो. बाकीचे फक्त आपली मजा घेत असतात. परोपकार करावा पण परोपकारासाठी आपले आयुष्य खर्च करु नये.

मी माझा अनुभव सांगतो. चळवळीतील ईतर समाजाच्या लोकांना मदत केली तेच आज आपल्या समाजा विषयी निट बोलत नाहीत. बाबासाहेब, बुध्द व धम्मा विषयी तिरस्कार बाळगतात. आपल्याला गरज असते तेव्हा ते टांग वर करतात. हा माझा अनुभव आहे. आपण परोपकारी गंपु होणं सोडायला हवे. आपल्या प्रश्नांबद्दल आपल्यालाच जर संघर्ष करायचा आहे तर मग दुसऱ्यांची मढी घेवुन रुदाली का बनायचे? माझा हा विचार काही लोकांना स्वार्थीपणाचा वाटेल, याचा राग ही येईल. काहींना वाटेल की आपण जागृत आहोत म्हणुन त्यांच्या प्रश्नांवर रिऍक्ट होतो, त्यांना मानसिक बळ मिळण्यासाठी त्यांचा संघर्ष आपण करतो पण तुम्ही कधी ऑब्झर्व्ह केलेय का? जेव्हा एखाद्या समाजाच्या प्रश्नांविषयी आपण रस्त्यावर येतो व नंतर तो प्रश्न निकाली निघाल्या वर ते लोक त्याची जाण ठेवतात का? मंडल आयोगापासुन किंवा त्या आधीच्या प्रश्नांबाबत ही बारकाईने तपासा. बघा कधी कुठला समाजाने आपल्या मदतीची जाण ठेवली आहे का?

समाज व्यवस्थेशी, जातीयतेशी, अन्याय, अत्याचार, बलात्कार व ईतर प्रश्नांवर रिऍक्ट होण्याचा आपण ठेका घेतला नाही. सहानुभूती ठेवा पण त्याला ही मर्यादा असू द्या. सहानुभूती या शब्दामुळे आपले खुप नुकसान झाले आहे. नको तिथे, नको त्याला, नको तितकी सहानुभूती देवुन आपण विरोधकांच्या रडार वर येतो. तसे ही आपण लोक संख्येने कमी आहोत. आपण सरकार बदलु शकत नाही की सरकार मध्ये कोण लोक असावेत हे पण ठरवु शकत नाही. जितके आपले पक्ष आहेत त्यातुन आपण एक खासदार निवडून आणु शकलो नाही गेल्या काही वर्षात आपल्यातील काही पक्ष व नेते विरोधी गोटात आहेत. तिथुन त्यांना मोक्याच्या जागा भेटतात. ते फायद्यात असतात. तिथे त्यांना आवश्यक असणारे बुस्टर मिळत असते. कधी पैशा बाबतीत तर कधी सत्तेच्या वाट्याच्या स्वरुपात, पण ते पुरेसे आहे का? तशी प्रलोभने म्हणजे कुत्र्याच्या पुढे टाकलेल्या हड्डी सारखे असते. ते चघळणारे महान आहेत. असो तो विषय वेगळा आहे. जो वेळ, श्रम, पैसा आपण ईतरांच्या भानगडी निस्तारण्यात वाया घालवतो ते सगळे आपण आपल्या समाजासाठी वापरु या. आपण जातीसाठी माती खावी असे म्हणने नाही माझे पण आपण आपल्या समाजासाठी, ग्रंथालये, आरोग्य सेवा, नोकरी व व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन, कलागुणांची जोपासणुक यासाठी प्रयत्न करु शकतो. आपले बरेच पक्ष व संघटना अस्तीत्वात आहेत, पण कुणी ही अशा पध्दतीची कामे करताना दिसत नाहीत. पक्ष वाढीसाठी, संघटन मजबूत होण्यासाठी असे प्रयत्न होणे गरजेचे असते. चौका चौकात बॅनर लावणे किंवा बोर्ड लावणे म्हणजे समाज सेवा नव्हे. सर्वास पोटास लावणे आहे, हे शिवरायांचे वाक्य आहे. यानुसार जर काम केले तर पक्ष, संघटना का वाढणार नाही?

आपल्यातील बरेच युवक स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ग्रंथालये उभी करताना दिसत आहेत. ही एक चांगली बाब आहे. अशा प्रकारची कामे व्हायला हवीत. धम्म प्रसारासाठी खेडोपाडी जावुन जन जागृती करायला हवी. नव नवीन लोक जोडायला हवेत. तरुणांना संघटित करायला हवे. बौध्द आळीतुन बाबासाहेब, बुध्द व धम्म गावाच्या प्रत्येक काना कोपऱ्यात पोहचायला हवा. आपण तसे खुप हुशार आहोत  पण ती हुशारी अशा कामांमध्ये दाखवत नाही. ते व्हायला हवे. आज खेडोपाडी प्रत्येक जयभीम नगरात, बौध्द वस्त्यांमध्ये धम्म पोहचवणे आपले कर्तव्य आहे. त्यासाठी काय करता येईल ते पहावे. जितके शक्य असेल तितके करत रहावे. सोशल मिडीया द्वारे जर सरकार निर्मिती होत असेल तर राज्यभरात ग्रंथ चळवळ, व्यवसाय मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन का होवु शकत नाही? केवळ ईतरांच्या समस्या, नेतृत्व, आदर्शां बाबत किती बोलायचे? आपण आपल्या समस्या सोडवुया मग बघू ईतरांकडे. बरोबर ना?

ज्यांना आपण मदत करतो तेच लोक धम्म चिकीत्सेच्या नावा खाली द्वेष करतात. "बुध्द आणि त्यांचा धम्म" कधी वाचलेलाच नसतो, तरीही त्यावर ही टिका करतात. बाबासाहेब व संविधान यावर ही टिका करतात. काही जन तर आरक्षण मुद्यावर विरोधी भूमिका मांडताना दिसतात.२२ प्रतिज्ञा कालबाह्य झाल्याचे ही म्हणतात. या सगळ्याला आपल्यातले ही काही महाभाग साथ देतात. आपल्यातील तथा कथित महान पुढारी हे पण सध्या टिकाकाराच्या भुमिकेत दिसतायत. बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा, संविधान यावर गरज नसताना सोशल मिडीया व खाजगी रित्या ही बोलताना दिसतात. या बोलण्याने आपण नकारात्मकता पसरवत असतो व विरोधकांच्या हाती आयतेच कोलीत देत असतो याचे भान ठेवायला हवे ना, पण तसे होताना दिसत नाही. सध्या आपल्याला गरज काय हे ओळखावे. नेहमीच आपल्या विरुध्द षडयंत्र सुरु असताना आपल्यातील लोक आपलेच पाय ओढताना दिसतात. त्यांना बाजूला करायची वेळ आली आहे हे नक्की.

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
सतीश कांबळे उर्फ सतीश भारतवासी
(लेखक, विचारवंत एवं युवा मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

● भारतीय पत्रकारितेतील ब्राह्मणी प्रवृत्ती

● भारतीय पत्रकारितेतील ब्राह्मणी प्रवृत्ती

लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

भारत हे जगातील सर्वात मोठे लोकशाही राष्ट्र आहे असे आपण गौरवाने म्हणतो. लोकशाही व्यवस्थेचे सर्वात प्रमुख लक्षण हे असते की या व्यवस्थेत सर्व शक्तींचे केंद्रीकरण कोणत्याही एका व्यक्तीकडे किंवा संघटनेकडे . झालेले नसते. असे केंद्रीकरण झाले तर ती व्यवस्था लोकशाही व्यवस्था न राहता हुकूमशाही व्यवस्था बनते. लोकशाहीचे वैशिष्ट्य हे असते की, या राज्य व्यवस्थेत परस्परांशी जोडलेले, परस्परांवर अंकुश ठेऊन असलेले परंतु परस्परांपासून स्वतंत्र अस्तित्व राखून असलेले, सत्ता आणि शक्तीचे तीन भाग ठळकपणे विभागलेले असतात. ते असे :

१) विधायिका -
म्हणजे कायदेकारी मंडळ. कायदेकारी मंडळात लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी समाविष्ट असतात.

२) कार्य पालिका -
म्हणजे कायद्यांची अंमल बजावणी करणारी प्रशासकीय व्यवस्था.

३) न्याय पालिका -
कायद्याच्या कलमांचे, शब्दांचे व कायद्या मागील भावनेचे मर्म ध्यानात घेऊन, त्या कायद्यांची अंमल बजावणी कार्य पालिकेकडून नीट झाली की नाही, हे बघणारी व्यवस्था म्हणजे न्याय पालिका.

लोकशाही व्यवस्थेची ही तीनही अंगे स्वतंत्र समजण्यात येतात. व्यवहारात मात्र असे दिसून येते की, कायदे मंडळात किंवा संसदेत ज्या प्रतिनिधींचे बहुमत असते ते सत्ताधारी मंत्री,आपल्या मर्जीतील नोकर शहांना पाहिजे त्या ठिकाणी नियुक्ती देऊन आपल्याला हवी तशी कायद्याची अमल बजावणी करून घेतात. कायदेकारी मंडळातील सदस्याच्या इच्छेशिवाय प्रशासकीय अधिकारी महत्वाचे निर्णय घेत नाही. न्यायपालिका स्वतंत्र असते, असे म्हटले जाते. पण न्याय पालिकेतील न्यायाधीशांची नियुक्ती प्रधान मंत्री, आणि नोकर शहा यांच्या मान्यतेनेच होते. यामुळे न्याय पालिका क्वचितच सत्ताधाऱ्यांच्या विरोधात निर्णय देते. यामुळे लोकशाही व्यवस्थेचे हे जे तीन स्तंभ आहेत ते परस्पर संलग्न आणि परस्परांची पाठ राखण करणारे असतात असे म्हणावे लागते.

• लोकशाहीचे चौथे अंग -

लॉर्ड मेकॉले यांनी त्यांच्या १८२८ साली प्रसिद्ध झालेल्या ‘कॉन्स्टिट्यूशनल हिस्टरी’ या निबंधात लोकशाहीच्या या तीन अंगा शिवाय एक चौथे अंग सुद्धा आहे अशी कल्पना मांडली. ते चौथे अंग म्हणजे पत्रकारिता होय. मेकॉलेनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ असा दर्जा दिला. सर एडमंड बर्क यांनी ‘मानवी जीवनाचे नियमन करणाऱ्या धर्म सत्ता (लॉर्डस स्पिरिच्युअल), राज सत्ता (लॉर्डस टेंपोरल) व लोक सत्ता (कायदे मंडळ) या तीन शक्तींप्रमाणे नव्हे, त्यांच्या पेक्षा ही अधिक महत्वाची शक्ती म्हणजे पत्रकारिता (प्रेस गॅलरी) होय, असे नमूद केले आहे.’ यावरून लोकशाही व्यवस्थेत पत्रकारितेचे महत्त्व आणि स्थान कोणत्या प्रकारचे आहे ते स्पष्ट होते. भारतामध्ये मात्र जगातील प्रगत देशात पत्रकारितेचे असलेले महत्व व कर्तव्य काय आहे हे विसरून सत्ताधाऱ्यांचा अनुनय, नायक पूजा, प्रचंड खोटारडेपणा, दिशाभूल, जातीय पक्षपात, यालाच पत्रकारिता म्हणून प्रस्थापित केले आहे. भारतीय पत्रकारीते बाबत आपले मत व्यक्त करताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर म्हणतात - “एखाद्याला नायकत्व बहाल करणे आणि त्याचे पूजन करणे हेच आपले परम कर्तव्य असल्याचे भारतीय पत्रकारितेने ठरविले आहे. सनसनाटी निर्माण करण्याच्या कुहेतुने बेजबाबदार वृत्त देणे,सहेतुक स्वार्थ ठेऊन लोकांच्या भावनेशी खेळणाऱ्या तर्कहीन अफवा पसरविणे यात भारतीय पत्रकारिता रममाण झाली आहे. भारतीय पत्रकारिता म्हणजे वाजंत्र्यांनी आपल्या नायकाचा गाजावाजा करण्यासाठी ढोल बडविणे होय. भारतीय पत्रकारितेने नायकपूजेसाठी इतक्या मुर्खतम पातळीवर जाऊन देशाच्या हिताशी यापूर्वी कधीच सौदा केलेला नव्हता.आजचा भारत नायक पूजेच्या कैफाने आंधळा झाला आहे व त्यास भारतीय पत्रकारिता जबाबदार आहे." (BAWS, Vol 1, P. 227) बाबासाहेबांनी हे विचार १८ जानेवारी १९४३ रोजी व्यक्त केले आहेत. मात्र आज ही ते तेवढेच संयुक्तिक आहेत.

• भारतीय पत्रकारांचा ब्राह्मण वर्चस्ववादी जातीय दृष्टीकोन -

अमेरिकन आणि युरोपियन राष्ट्रांमध्ये पत्रकारिता जेवढी प्रगल्भ आहे त्याच्या आसपास ही भारतीय पत्रकारिता फिरकत नाही. अमेरिकन आणि युरोपियन वृत्त पत्रांच्या आणि वृत्त वाहिन्यांच्या मालक - संपादकांनी स्वतःवर लिखित स्वरूपात काही नैतिक बंधने लादून घेतली आहेत. त्याच प्रमाणे आपल्या पत्रकार - कर्मचाऱ्यांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे निश्‍चित केली आहेत. अमेरिकन पत्रकारितेच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या आस्थापनेत (प्रि - ऍम्बल) पत्रकाराच्या तत्त्व निष्ठेवर आत्यंतिक (integrity) भर देण्यात आला आहे. या संहितेच्या पहिल्याच कलमात सांगितले आहे की, ‘‘वार्ता मिळविणे आणि त्या पसरविणे व त्यावर मत प्रदर्शन करणे या क्रियांचा पहिला उद्देश लोक कल्याणाचा राहील. त्यांनी पुरविलेल्या माहितीच्या आधारे लोकांना त्या त्या घटनेचे मूल्यांकन करता आले पाहिजे. जे पत्रकार स्वार्थ साधनेसाठी त्यांना मिळालेल्या सामर्थ्याचा उपयोग करतात, ते स्वत:च्या व्यवसायाशीच द्रोह करीत असतात. अमेरिकेत पत्रकारितेला जे स्वातंत्र्य, घटनेने बहाल केले आहे, त्याचा उद्देश केवळ माहिती पुरविणे किंवा चर्चा घडविणे हा नाही. त्याचा उद्देश समाजात जी शक्तिकेंद्रे आहेत, त्या केंद्रांच्या अधिकार्‍यांच्या वागणुकीची ही नि:पक्षपाती चिकित्सा करणे, हा आहे.’’ भारतात मात्र पत्रकार आपली नैतिकता गुंडाळून ठेऊन आपल्या जात वर्गाचे हित संबंध जपण्यासाठी अत्यंत हीन स्तराला जातात हे अनेक प्रकरणात दिसून आले आहे. अनुसूचित जाती - जमातीच्या अत्याचारांशी संबंधित वृत्त, सामाजिक न्यायाच्या बाबी, ब्राह्मणेत्तर नेत्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे इत्यादी बाबतीत पत्रकारांचा ब्राह्मण वर्चस्ववादी जातीय दृष्टीकोन अत्यंत बटबटीत रूपाने पुढे आल्याचे दिसते.

• भारतीय पत्रकारितेतील अनैतिकता -

‘‘वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य (Freedom of the Press) हे खर्‍या अर्थाने लोकांचे स्वातंत्र्य आहे. सरकारी असो अथवा खाजगी, क्षेत्राकडून, लोकांवर होणार्‍या आघातांपासून त्या लोक स्वातंत्र्याचे रक्षण पत्रकारितेला करता आले पाहिजे. आपण देत असलेली बातमी सत्य आहे आणि अचूक आहे याची सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली पाहिजे. पत्रकार, त्यांच्या बातमीचे जे स्रोत आहेत, त्यांच्या दडपणा खाली नसले पाहिजेत.’’ ही तत्वे अमेरिकन व युरोपीय वृत्तपत्राच्या नैतिक कर्तव्यात समाविष्ट आहेत. ही तत्त्वे ध्यानात घेऊन वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी आपल्या बातमीदारांसाठी काही पथ्येही सांगितलेली आहेत. त्यातले एक पथ्य हे की, बातमीदारांनी भेट वस्तू स्वीकारू नयेत. वृत्तपत्रांनी, त्यांच्या बातमीदारांच्या प्रवासाचा व भोजनाचा ही खर्च केला पाहिजे. ब्रूस स्वेन या लेखकाने लिहिलेल्या ‘रिपोर्टर्स एथिक्स’ (वार्ताहरांचे नीति शास्त्र) या पुस्तकात, निरनिराळ्या वृत्तपत्रांनी आपल्या संपादकांसाठी निर्धारित केलेली तत्त्वे, परिशिष्टात दिलेली आहेत. शिकागो सन् टाईम्स, डेस मॉईनेस रजिस्टर, ट्रिब्यून, लुई व्हिले कोरियर जर्नल, स्क्रिप्स हॉवर्ड न्यूज पेपर्स, वॉशिंग्टन पोस्ट इत्यादी वृत्तपत्रांनी आपल्या कर्मचार्‍यांसाठी केलेल्या नियमांचा आणि पथ्यांचा त्यात अंतर्भाव आहे. यातील काही बाबी खालील प्रमाणे आहेत.

१) मोकळ्या मनाने आणि पूर्वग्रह न बाळगता काम करण्याची त्यांनी (वार्ताहरांनी) प्रतिज्ञा घेतलेली आहे.

(२) ज्यांचा आवाज निघत नाही त्यांचे म्हणणे जाणून घेणे, उद्धटपणाच्या कृती टाळणे आणि सभ्यतेने व मोकळेपणाने जनतेला समोरे जाणे ही त्यांची जबाबदारी आहे.

३) आमचा खर्च आम्ही करणार. वृत्तांच्या स्रोतांकडून कोणती ही भेटवस्तू घेणार नाही, आम्ही फक्त आमच्या वृत्तपत्राशी बांधलेले आहोत, सत्ताधारी, कार्पोरेट किंवा इतर कुणाशीही आमची बांधीलकी नाही.

४) चूक होऊ नये, याची आम्ही काळजी घेऊ. ती झालीच तर ती लगेच दुरुस्त करू. अचूकता हे आमचे लक्ष्य आहे आणि निष्कपटता हा आमचा बचाव आहे.

भारतातील राष्ट्रीय म्हणविणाऱ्या एक ही वृत्तपत्रांनी किंवा वृत्त वाहिनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी अशी आचार संहिता तयार केलेली नाही. यामुळेच पत्रकारांनी लाच घेऊन बातम्या देणे, खंडणी वसूल करणे, मंत्री, लोक प्रतिनिधी, उद्योग पती, नोकर शहा यांच्या कडून भेट वस्तू स्वीकारणे, ओली पार्टी घेणे हे प्रकार भारतीय पत्रकारितेचे अविभाज्य भाग बनलेले आहेत.

• ब्राह्मण - बनियांचे हित जपणे हा भारतीय पत्रकारितेचा उद्देश -

सद्यस्थितीत भारतीय पत्रकारितेने सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची व प्रधान मंत्री मोदी तसेच भाजपाध्यक्ष अमित शहा यांची जी चाटू कारिता चालविली आहे ती पत्रकारितेच्या स्वतंत्र अस्तित्वाला नाकारणारी,अत्यंत उबग आणणारी आहे. सरकार व वृत्तपत्रे यांचे संबंध कसे असावेत यावर प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार बिल मॉयर्स, यांनी ‘प्रेस अँड गव्हर्नमेंट’ या निबंधात अत्यंत मौलिक विचार व्यक्त केले आहेत. बिल मॉयर्स, हे जॉन केनेडी तसेच लिंडन जॉन्सन या अमेरिकेन अध्यक्षाचे प्रमुख प्रसिद्धि अधिकारी होते. पुढे त्यांनी ‘न्यूज् डे’ या नावाचे स्वतःचे वृत्तपत्र काढले. ते लिहितात - ‘‘पत्रकारिता आणि सरकार हे परस्परांचे मित्र नाहीत; प्रतिस्पर्धी आहेत. दोघांचा ही उद्देश लोकहित हाच असला पाहिजे. यात प्रत्येकाचे विशिष्ट स्थान आहे. आपल्या संविधानानेच राष्ट्रपतीचे स्थान निर्माण केले आहे, तर त्याच संविधानाने पत्रकारितेला संरक्षण दिलेले आहे. पत्रकारांनी हे ध्यानात घेतले पाहिजे की, राष्ट्रपतीला राज्य करण्याचा जनादेश मिळालेला आहे आणि राष्ट्रपतीने हे मान्य केले पाहिजे की, पत्रकारितेला, आपण कसे राज्य करतो हे शोधून काढण्याचे स्वातंत्र्य आहे. दोन्ही कशा रीतीने कार्य करतात, यावर जी आपली मुक्त आणि स्वतंत्र व्यवस्था (लोकशाही) आहे, तिची परिणामकारकता अवलंबून आहे.’’ (Mass Media in a Free Society, Oxford & IBH Publishers) भारतीय संदर्भात बिल मॉयर्स यांचा दृष्टीकोन तपासला तर असे दिसून येते की, भारतीय वृत्तपत्रांनी आपले स्वातंत्र्य सत्ताधाऱ्यांच्या चरणावर अर्पण केले आहे तद्वतच भारतीय पत्रकारितेचा उद्देश लोकहित हा नसून आपल्या ब्राह्मण - बनिया जात भाईंचे हित जपणे आहे.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान सुनील खोब्रागडे
(संपादक : दैनिक जनतेचा महानायक, मुंबई)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।