शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

● संविधान निमिर्ती आणि आपण केलेली लोकशाहीची व्याख्या (लेख)

● आमचे मित्र "सारिष डोळस" यांची मुलगी "भूमिका डोळस" हिला संविधान विषयावर संशोधणात्मक निबंध हवा असल्यामुळे हा प्रपंच प्रयत्न म्हणून माझ्या तर्फ करण्यात आला.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         ● संविधान निमिर्ती आणि आपण
             केलेली लोकशाहीची व्याख्या
                 लेखक :- यतिन जाधव

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

         आज शासन म्हणजे लोकशाही अशी साधी सोपी लोकशाहीची व्याख्या असली तरीही लोकशाही ज्या चार खांबावर उभी आहे, ते खांब मजबूत असणे गरजेचे आहे. नाहीतर समाज विघातक कृत्य, अराजकता, विध्वंसक वर्ग, संघर्ष, सामाजिक दुष्परिणाम पाहायला मिळाल्या शिवाय राहणार नाही. हे आपणास माहीतच आहे. ज्यांना माहीत नसेल त्यांनी ही लक्षात घेतलं पाहिजे. संविधान नेमकं काय आहे? लोकशाही म्हणजे नेमकं काय आहे? त्याची आपण चिकित्सा करूया.

संविधान म्हटले की प्रथम ओठी नाव आंबेडकरांचेच येईल. ते भारतीय संविधानाचे शिल्पकार, घटनाकार म्हणून सर्वत्र ज्ञात आहेत. संविधान निमितीसाठी कोण कोणाला काय कष्ट घ्यावे लागले याकडे वळूया. भारताचे संविधान तयार करण्यासाठी सर्व प्रथम घटना समिती (संविधान सभा) स्थापन करण्यात आली. संविधान सभेत सुरुवातीला २९६ सदस्य होते, भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यात फेरबदल होऊन ही संख्या २९९ झाली. ९ डिसेंबर १९४६ रोजी संविधान सभेची पहिली बैठक झाली. ११ डिसेंबरला डॉ. राजेंद्र प्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. १३ डिसेंबर रोजी जवाहरलाल नेहरुंनी घटना समितीत मांडलेल्या उद्देश पत्रिकेच्या आधारे घटनेचा सरनामा / प्रास्ताविक तयार करण्यात आले. पुढे त्या प्रास्ताविकेच्या चौकटीतच घटनेची निर्मिती करण्यात आली. घटना समितीने घटना निर्मितीच्या कामांसाठी ८ मुख्य समित्या व १३ उपसमित्यांची रचना केली. 

२९९ सदस्यांना वेगवेगळ्या समित्यांमध्ये कामे वाटुन देण्यात आली. घटना समितीने राज्य घटना तयार करणे, देशासाठी कायदे तयार करणे, भारताच्या राष्ट्रकुल सदस्यत्वाला अनुमोदन देणे, भारताचा राष्ट्र ध्वज, राष्ट्र गीत, राष्ट्र गान स्विकृत करणे, पहिल्या राष्ट्रपतींची निवड करणे आणि निवडणुका होईपर्यंत तात्पुरती संसद म्हणुन कार्यभार पाहणे ही कामे केली. इंग्रजांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचे निश्चित झाल्यानंतर १९४६ ला कॅबिनेट मिशनची स्थापना झाली. मिशनच्या शिफारशींनी भारताची राज्य घटना समिती तयार करण्याची पद्धत ठरली. राज्य घटना तयार करण्यासाठी प्रातिनिधिक संविधान समिती निर्माण झाली. या समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद होते. त्या अंतर्गत बावीस समित्या होत्या. त्यापैकी अतिशय महत्त्वाची समिती मसुदा समिती होती. या समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. घटनाकारांनी सांसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. ही शासन पद्धती जनतेच्या संमतीवर आधारलेली असते आणि त्यात विचार, आचार, संचार, उच्चार व संघटनेचे स्वातंत्र्य असते.

मसुदा समिती ही घटना निर्मितीतील मुख्य समिती होती. त्यामध्ये ७ सदस्य होते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मसुदा समितीचे अध्यक्ष होते. इतर समित्यांनी केलेल्या तरतुदींचा विचार करुन घटनेचा मसुदा तयार करण्याचे काम मसुदा समितीने केले. त्यांनी घटनेचा पहिला मसुदा फेब्रुवारी १९४८ मध्ये सादर केला. भारतीय जनतेला त्या मसुद्यात सुधारणा सुचविण्यासाठी ८ महिने वेळ दिला. जनतेची मते, सुचना,  टीका विचारात घेऊन ऑक्टोबर १९४८ मध्ये दुसरा मसुदा सादर करण्यात आला. त्यावर चर्चा होऊन नोव्हेंबर १९४८ मध्ये तिसरा अंतीम मसुदा घटना समितीत मांडण्यात आला. त्या मसुद्यातील प्रत्येक कलम विचारात घेऊन वर्षभरात एकुण तीनदा वाचन झाले. या टप्प्यात एकुण ७५६३ सुधारणा सुचविल्या गेल्या, त्यापैकी २४७३ सुधारणांवर घटना समितीत प्रत्यक्ष चर्चा घडुन आली. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी युक्तिवाद केला.

मसुदा बनविण्याचे प्रमुख (Chief Draftsman) म्हणुन एस. एन. मुखर्जी यांनी काम पाहिले. भारताची राज्य घटना ही संघराज्य पद्धतीने लोकशाही जोपासणारी आहे. संविधानाचे जनक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताची ही घटना २६ नोव्हेंबर १९४९ रोजी लिहून पूर्ण केली आणि २६ जानेवारी १९५० ला संविधान भारतात लागू करण्यात आले. भारतीय राज्य घटना लिहिण्यास २ वष्रे ११ महिने आणि १७ दिवस लागले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अतिशय परिश्रमाने ही राज्य घटना लिहिली. त्यात त्यांनी स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय या बुद्ध तत्त्वांचा समावेश केला. मसुदा समितीत एकूण सात सदस्य होते.

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्य घटनेच्या मसुद्याचा ठराव संमत करण्यात आला. २९९ पैकी उपस्थित असणाऱ्या २८४ सदस्यांनी राज्य घटनेवर सह्या केल्या. सदस्य सह्या करत असताना बाहेर पाऊस सुरु झाला हे शुभसंकेत असल्याचे बोलले गेले. २४ जानेवारी १९५० रोजी पुन्हा एकदा घटना समितीने राज्य घटनेवर सर्वांच्या स्वाक्षऱ्या केल्या. घटनेचा अंमल २६ नोव्हेंबर १९५० पासुन सुरु झाला. हा दिवस निवडण्या मागचे कारण म्हणजे काँग्रेसच्या १९२९ च्या लाहोर अधिवेशनातील ठरावानुसार २६ जानेवारी १९३० हा दिवस भारताचा “पुर्ण स्वराज्य दिन” म्हणुन साजरा करण्यात आला होता. २६ जानेवारी १९५० हा दिवस घटनेच्या प्रारंभाचा दिन म्हणुन ओळखला जातो. तो दिवस प्रजासत्ताक - गणराज्य दिन म्हणुन साजरा केला जातो. 

२६ जानेवारी १९५० पासुन घटना समिती संपुष्टात आली. भारतीय संविधान अंमलात आल्यापासुन भारतीय स्वातंत्र्याचा कायदा १९४७, भारत सरकार कायदा १९३५ व त्याचे सर्व पुरक कायदे रद्द करण्यात आले. एका सदस्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. एका सदस्याचे निधन झाले होते आणि एक सदस्य समितीत आलेच नाहीत. एक सदस्य अमेरिकेत राहत होते. एक सदस्य राज्याच्या कारभारात होते आणि दोन सदस्य दिल्लीच्या बाहेर राहत होते. तसेच ते तब्येतीमुळे मसुदा समितीत हजर राहात नव्हते. त्यामुळे एकटेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर भारतीय संविधानाचे काम करीत होते. राज्य घटना लिहिण्याचे कार्य हे दिनांक ९ डिसेंबर १९४६ रोजी सुरू झाले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर नावाच्या आधुनिक बुद्धाने मानवतेच्या कल्याणासाठी आपले संपूर्ण आयुष्य झिजविले आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करूणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून त्यांनी भारताच्या संविधानाची निर्मिती केली.

भारतीय राज्य घटना कशी चालवावी? पक्ष आणि प्रशासन व्यवस्था, कायदे यंत्रणा, निरनिराळ्या योजना व राज्य, केंद्र शासनाची कर्तव्ये, न्यायालयाची कर्तव्ये व वेगवेगळय़ा आयोगाची कर्तव्ये, राष्ट्रपती, पंतप्रधान, मुख्यमंत्री, राज्यपाल, सांसद लोकसभा, राज्यसभा यात निवडून येणाऱ्या लोकांच्या भूमिका आणि कार्य-कर्तव्ये काय आहेत, यांचे संपूर्ण नियोजन भारतीय संविधानात नमूद केलेले आहे. ती योग्य प्रकारे देशातील जनतेच्या हितासाठी, समृद्धीसाठी व विकासासाठी राबवावी हे भारतीय संविधानाचे उद्दिष्ट आहे. नव समाज व नव भारताची निर्मिती करण्याकरिता मी प्रथमत: भारतीय आणि शेवटी ही भारतीयच आहे. असा महान संदेश या देशाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेला आहे. प्रत्येक जाती धर्माच्या लोकांना त्यांच्या इच्छेप्रमाणे जगण्याची मुभा घटनेने दिली. तसेच कोणत्याही धर्मावर जबरदस्तीने धर्मातर न करण्याची अट ही घातली आहे. 

भारतीय संविधानात प्रत्येक माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे धर्म स्वीकारण्याची व बदलण्याची मुभा दिलेली आहे. भारतीय संविधानात वेळ प्रसंगी कायद्याच्या कलमांमध्ये बदल करण्याचा अधिकार ही दिलेला आहे. संविधानाची अंमल बजावणी जर यथायोग्य झाली तर या देशाचे कल्याणच होईल. पण भारतात हजारो वर्षापासून ब्राह्मणी वर्ण व्यवस्थेचा पगडा असल्यामुळे जैन, ख्रिश्चन, मुसलमान, इसाई, शिख व अन्य धर्म, पंथ यांची ही मानसिकता हिंदु धर्माला पोषक आहे. या देशात बौद्ध धम्म आणि हिंदू धर्म यांचा संघर्ष हजारो वर्षापासून चालतच आहे आणि पुढे ही असाच चालू राहणार आहे. कारण धम्म आणि धर्म यात फरक आहे. भारताची घटना निर्माण करण्यासाठी घटनाकर्त्यांनी जगातील जवळपास ६० देशांच्या घटनांचा विचार केला. घटना निर्मितीसाठी जो कालावधी लागला. या कालावधीत घटना समितीने ११ सत्रात १६६ दिवस काम केले.

मसुदा समितीने १४१ दिवस काम केले. घटना निर्मितीसाठी एकुण ६३ लाख ९६ हजार ७२९ रुपये खर्च आला. भारतीय राज्य घटनेचे मुळ इंग्रजी हस्तलिखित सुंदर आणि वळणदार अक्षरात दिल्लीच्या प्रेम बिहारी नारायण रायजादा (सक्सेना) यांनी लिहले. त्याच्या प्रत्येक पानावर चित्रकार नंदलाल बोस यांच्या नेतृत्वाखाली शांतिनिकेतन मधील इतर कलाकारांनी आकर्षक नक्षीकाम केले आहे. प्रास्ताविकाचे नक्षीकाम बिओहर राम मनोहर सिन्हा यांनी केले. हिंदी मुळ हस्तलिखित वसंत वैद्य यांनी लिहले. त्याला नंदलाल बोस यांनी आकर्षक असे नक्षी काम केले.

भारतीय संविधानाची इंग्रजी व हिंदी मुळ प्रत भारतीय संसदेच्या लायब्ररीत हेलियम पेटी मध्ये सुरक्षित ठेवण्यात आली आहे. भारतीय संविधानाची हिंदी व इंग्रजी प्रत देहारादुन येथे छापण्यात आली. घटना समितीची निशाणी म्हणुन हत्ती स्विकृत करण्यात आला होता. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २२ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटना दुरुस्त्या झाल्या आहेत. प्रजासत्ताक दिनाला राष्ट्रपती देशाला संबोधित करतात. भारतरत्न, पद्मभुषण, किर्तीचक्र पुरस्कार प्रजासत्ताक दिनी दिले जातात. प्रजासत्ताक दिनाच्या संचलनामध्ये “Abide with me” हे गीत गायले जाते.

आज भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. जगातील सर्वात मोठी राज्य घटना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला दिली आहे. भारतात अनेक जाती, धर्म, पंथ, वंश, समुदाय, गोत्र, भाषा राहणीमान, प्रांत असतांना सुद्धा सर्वाना भारतीय राज्य घटनेने एका सूत्रात बांधून सर्वाना भारतीय लोकशाही प्रणाली बहाल केली आहे. सांसदीय लोकशाहीचे भवितव्य विषद करताना लोक नितीमान असणे ही पूर्वअट आहे. वर्तमानातील लोक नितीमान नसल्यामुळे, राजकीय साक्षर किंवा राजकीय दृष्टी नसल्यामुळे तसेच काही लोकांच्या महत्त्वाकांक्षी धोरणात हिरवा राष्ट्रवाद किंवा भगवा राष्ट्रवाद असल्यामुळे आणि या तत्त्वज्ञानाची पाळेमुळे खोलवर रुजविण्यासाठी त्यांच्या सांस्कृतिक तत्त्वाला अडसर असणारी सांसदीय लोकशाही आणि संविधान त्यांना नको आहे. अशी विचारसरणी असलेल्या लोकांचा आरंभापासूनच भारतीय संविधानाला विरोध आहे. म्हणूनच या ना त्या कारणाने भारताच्या संविधानांतर्गत सांसदीय लोकशाहीवर अनेक स्तरातून आक्रमणे होताना दिसून येतात. त्यामुळे भारतात धर्म, भाषा, पैसा, पक्ष प्रदेश वादाची भावना प्रज्ज्वलित करण्यात येथील प्रसार माध्यमे अग्रेसर आहेत.

आज या देशात भ्रष्टाचारामुळे सत्ताधारी आणि त्यांचे हित चिंतक अधिक श्रीमंत होताना दिसत आहेत आणि गरीब अधिक गरीब होताना दिसत आहेत. सांसदीय लोकशाही प्रणाली आजही धोक्यात आलेली आहे. खासगीकरण, बेरोजगारी महागाई, यांनी तर कळसच गाठला आहे. म्हणून लोकशाहीला वाचविण्या करिता सामान्यातील सामान्य माणसाने आपल्या शरीरातील रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत लढायला पाहिजे. आपले संविधान ही असेच.. तुमचा विश्वास नसला तरी काम करत राहील. त्यामुळेच ते उपयुक्त ठरत राहील. भारताचे संविधान म्हणजे केवळ त्यातील शब्द नव्हेत, तर या देशातील व्यक्ती केंद्रस्थानी मानून, स्वातंत्र्य आणि समतेची आस धरणारा एक जिवंत दस्तावेज आहे.. संविधानाची पायाभूत मूल्ये न्याय पालिकेने जपलीच; पण ती लोकांमध्ये नागरी समाजात ही रुजायला हवीत.

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

◆ फेसबुक पेजवर एकदा नक्की भेट द्या.

• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

  ◆ YATIN JADHAV : 9967065953 ◆

सादर कोणत्याही सत्कार, उत्सव, सामाजिक, धार्मिक कार्यक्रम किंवा परिषद अन्य कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम असल्यास आम्हाला कळवावे. आपण आम्हाला ऐतिहासिक, प्रबोधनात्मक, मार्गदर्शक माहिती तसेच आपण स्वतः लिहलेले विविध लेख, कविता किंवा आरोग्य विषयक माहिती, वैज्ञानिक माहिती, अन्य कोणतीही माहिती तसेच आपण राहत असलेल्या ठिकाणी घडलेल्या बातम्या किंवा घडामोडी, झालेले कार्यक्रम त्याचे छायाचित्रे (फोटो) किंवा विडिओ आम्हाला पाठवू शकता. आपण पाठवलेल्या कोणत्याही प्रकारच्या माहितीला प्रसिद्धी दिली जाईल. (यतिन जाधव : ९९६७०६५९५३) फक्त वरील दिलेल्या क्रमांकावर व्हाट्सएप मेसेज द्वारे संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

 ◆ BSNET NEW & OLD HELPLINE :
      7738971042 or 7718962406
 (Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group (म्हणजे समूहात) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

           रमेश भोसले : ९७७३३३८१४४     
      कोणत्याही अधिक माहितीसाठी वरील  
         क्रमांकावर फोन वरून संपर्क करा.