मंगळवार, २६ सप्टेंबर, २०१७

● २८ बुद्ध संकल्पना : शंका, आशय आणि तर्क

● २८ बुद्ध संकल्पना : शंका, आशय आणि तर्क

लेख -
आयुष्यमान आनंद आरकडे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

२८ बुद्ध ही संकल्पना मुळ बौद्ध तत्वज्ञानाचा भाग नाही. २८ बुद्धांची संकल्पना प्रथमतः सिंहल देशात (श्रीलंका) बुद्धवंस. ह्या पद्य (महाकाव्य) ग्रंथात मांडली गेली. बुद्धवंस हा ग्रंथ इतिहास दर्शक ग्रंथ नसून हा एक पद्य काव्यात्मक ग्रंथ आहे. कवी कल्पनांना मर्यादा नसतात असे मानले तर, ऐतिहासिक दृष्ट्या यातील उक्त केलेल्या व्यक्ति रेखांना कितपत महत्व द्यावे हे प्रथम ठरवावे लागेल. हा ग्रंथ सिंहल देशात (आजचा श्रीलंका) रचला गेला. हा ग्रंथ इ. स. पूर्व दुसऱ्या ते तिसऱ्या शतकात रचला गेला असे मानले जाते. पुढे त्याच्यात दीर्घ काळापर्यंत भर घालण्यात आली. हा काळ विशेषतः ध्यानात घेणे गरजेचे आहे. हा तोच कालखंड आहे ज्याकाळात महाभारत, रामायण आणि दशावतारावर आधारित अनेक ग्रंथ रचले गेले. म्हणजेच हा कालखंड अवतारवादाने भारलेला होता. अवतारातील व्यक्ति रेखा लोकांच्या मनो धारणा ठरवीत होत्या. या महाकाव्यांनी भारतीय समाज व्यवस्थेला आकार देण्याचे काम केले. २८ बुद्ध ह्या संकल्पनेचा मूळ स्त्रोत प्रस्तुत ग्रंथात काव्यात्मक पद्धतीने रचल्या गेलेल्या जातक कथा आहेत. यातील २८ बुद्धांच्या नावांचे बारकाईने अध्ययन केल्यास असे निदर्शनास येते कि - यातील काही व्यक्ति रेखांची नावे बुद्धांच्या आयुष्यात घडलेल्या घटनांतील पात्रांच्या नावांशी साधर्म्य दर्शवतात. उदा. कौंडिण्य बुद्ध, सुमेध बुद्ध, काश्यप बुद्ध इत्यादी.

दुसरा मुद्दा असा त्यात आहे कि, यातील एक बुद्ध ज्याचे नाव 'तिष्य' आहे, या नावाची व्यक्ति रेखा सिंहल देशात सर्वात मोठ्या असलेल्या सम्राट पियदस्सी 'तिष्य' या राजाच्या नावाशी साधर्म्य दर्शवणारी आहे. यात या सम्राटाचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने त्याचे नाव टाकले असावे. महामहेंद्र आणि संघमित्राने जेंव्हा सिंहल देशात आगमन करून बौद्ध धम्म तेथे त्यांनी स्थापित केला, तेंव्हा सम्राट तिष्य नावाचा राजा तिथे अस्तित्वात होता. त्यामुळे अश्या अनेक विसंगतीमुळे २८ बुद्ध यांच्या ऐतिहासिक आधारावर शशांकता वाटते.

२८ बुद्धांचा काळ हा तो काळ आहे ज्या काळात रामायण, महाभारत, दशावतार इत्यादी सारखे अवतार कथांवर आधारित ग्रन्थ रचले गेले. हा काळ बौद्ध धम्माच्या ऱ्हासाच्या सुरुवातीचा काळ आहे. त्याकाळात जैन दर्शन आणि बौद्ध धम्म यांच्यात अघोषित अशी स्पर्धा होती. ज्याप्रमाणे जैन मान्यतेत २४ तिर्थकारांची संकल्पना आहे, त्याप्रामणे बौद्ध धम्माची पडती बाजू सावरण्या करिता बौद्ध धम्मात देखील अवतारवादावर आधारित २८ बुद्ध अशी संकल्पना असावी, जेणेकरून बौद्ध धम्मास गत वैभव प्राप्त होईल ह्या विचारांनी प्रेरित होऊन काही साहित्यिक भिक्खुंनी केलेला हा फसलेला प्रयत्न असावा. पंचशील ध्वजाचे जनक, जेष्ठ बौद्ध अभ्यासक आणि अनागरिक धम्मपाल यांचे सहकारी पुरकातत्व शास्त्रज्ञ, कर्नल एच एस अलकॉट (१८८१) म्हणतात - "असा पारंपरिक विश्वास आहे की, सनातन कार्यकारण भावाच्या परंपरंपरेनुसार युगानयुगे बुद्ध जन्मास येवून मानव जातीस सत्याचा मार्ग दाखवितात. दंत कथेनुसार २८ बुद्ध होऊन गेले म्हणतात. परंतु, ऐतिहासिक रित्या सिदार्थ बुद्ध हे एकच बुद्ध होऊन गेले आहेत." (कर्नल. एच. एस.ऑलकॉट, सं: बुद्धिस्ट केटेसीजम [Buddhist Catechism] पृ. १०५, प्रकाशक: सांस्कृतिक मंत्रालय, श्रीलंका}

त्यानंतरच्या रचल्या गेलेल्या काही बौद्ध ग्रंथात प्रत्येक बुद्धाचा काळ नोंदवला आहे. ककुसंध बुद्ध (इ. स. पूर्व ३१०१), कोणा गमन बुद्ध (इ. स. पूर्व २०११), कश्यप बुद्ध (इ. स. पूर्व १०१४) अश्या प्रकारे बिनचूक कालखंड काही ग्रंथकार देतात, तो देत असताना हे ग्रंथकार "बुद्ध वंश" ह्या ग्रंथाचा संदर्भ देतात. मला असे वाटते, एखाद्या प्राचीन वस्तूचा अचूक काळ कुठला? हे जाणून घेण्या करिता Carbon Dating हे तंत्रज्ञान वापरले जाते. त्याकाळी अश्या प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध नसताना 'बुद्धी वंश' आणि तत्सम ग्रंथ लिहणाऱ्यांनी २८ बुद्धांपैकी सर्व बुद्धांचा काळ अचूक कसा लिहून ठेवला? हे अनाकलनीय आहे.

बौद्ध मतानुसार तार्किक दृष्ट्या विचार केल्यास असे जाणवते कि - कुठल्याही गोष्टीचे अस्तित्व तेंव्हाच प्रमाणित होत असते जेंव्हा त्या गोष्टीचे अस्तित्व प्रत्येक्षात प्रमाणित जरी होत नसले तरी, अप्रत्येक्षपणे अन्य माध्यमातून त्याचे अस्तित्व प्रमाणित व्हावे लागते. जसे बुद्धाचे अस्तित्व तेंव्हाच प्रमाणित होते जेंव्हा बुद्धाने केलेल्या सामाजिक क्रान्ति नंतर लोकांच्या मनोधारणा बदलल्या आणि चंद्रगुप्त मौर्य सारखे कनिष्ठ जातीतील राज घराणे उदयास आले. याचाच अर्थ असा होतो, बुद्धाच्या सामाजिक विचारांमुळे लोकांची कनिष्ठ जातीच्या राज्याचा स्वीकार करणारी मानसिकता निर्माण झाली.

आता आपण विषयाकडे वळूयात, जातक कथा नुसार इत्यादी. पूर्व १०१४ साली बुद्धाच्या आधी कश्यप नावाचा बुद्ध होऊन गेला, तो ज्या अर्थी बुद्ध आहे त्या अर्थी त्याचा प्रभाव युगानुयुगे जाणवणे गरजेचे आहे. मात्र डॉ. आंबेडकर लिखित 'प्राचीन भारतातील क्रांती आणि प्रतिक्रांती' या ग्रंथानुसार बुद्ध पूर्व भारतातील जीवन हे अनैतिकता पूर्ण होते. लोकांची जीवन जगण्याची नैतिक पातळी रसा तळाला जाऊन पोहचली होती. बुद्ध पूर्व काळात यज्ञयाग, कर्मकांड, अनैतिक व्यवहार याने परिसीमा गाठली होती. कश्यप नावाच्या बुद्धाचा प्रभाव असताना असले प्रकार व्हायला नको हवे होते. मात्र परिस्थितीचे विसंगत दर्शन होते. याचाच अर्थ असा होतो, कि बहु बुद्ध हा सिद्धांत काल्पनिक तथा काल्पनिक दृष्ट्या तकलादू आहे. कल्पना करुत कि, उद्युक्त केलेले वरील चार बुद्ध, हे बुद्धा प्रमाणे सम्यक संबद्ध जरी नसले तरी देखील ते बुद्ध होते, असे जरी गृहीत धरल्यास बुध्दत्व प्राप्त झालेली व्यक्तीस महापुरुषांच्या पली कडील प्रज्ञा निश्चितच प्राप्त असणार. आणि त्यांची जागतिक कीर्ती देखील अफाट असणार यात शंका नाही, अश्या अलौकिक बुद्धीमत्ता, प्रज्ञा आणि कीर्ती असणाऱ्या व्यक्तींचा इतिहास हा पुरातत्व विभागाच्या उत्खननात उजेडास न येणे हे पटण्या सारखे नाही. २८ बुद्धांचे नखभर पुरातत्व नाही जे यांचे अस्तित्व सिद्ध करू शकेल. अगदी हडप्पा संस्कृतीच्या काळापासूनचे म्हणजेच इ. स. पूर्व ३५०० - ४००० काळापासूनचे पुरातत्व आढळले आहेत, मात्र "बुद्ध" ह्या पदी पोचलेल्या व्यक्तीचे पुरातत्व आढळून न येणे हे कुठेतरी ह्या निष्कर्षा प्रति पोचवते कि - बहू बुद्ध सिद्धांत हि दंत कथांची देण आहे.

काही बुद्धांचा इतिहास हा हरप्पा मोहेंजोदडो संस्कृतीच्या आधीचा आहे असे जर मानले, तर पुरातत्वाचा एक नियम इथे लागू पडतो , तो असा कि ५००० - ६००० च्या प्रचंड मोठ्या कालावधीत, काळाच्या ओघात सर्वच गोष्टी नामशेष होत असतात. मग सदर ग्रंथकारांनी, बुद्धांच्या अस्तित्वाचा इसवी सन पूर्वी घडलेला प्रचंड मोठा कालखंड कश्याच्या आधारे दर्शवीला? बरं.. २८ वा बुद्ध याचे नामकरण देखील अश्या ग्रंथकारांनी आधीच करून ठेवले, त्याला 'मैत्रेय' नाव देऊन टाकले. भारताचा इतिहास हा बौद्धवाद आणि ब्राह्मणवाद यातील संघर्ष आहे असे बाबासाहेब म्हटले होते. मग असे असेल तर सिदार्थ गौतम बुद्ध यांचे ऐतिहासिक आणि तात्त्विक महत्व कमी करण्या करिता प्रतिक्रांती वाद्यांनी रचलेले हे कुभांड तर नाही ना ? याबाबत चाचपणी करणे देखील महत्वाचे ठरते. या २८ बुद्धांच्या सिद्धांताला बाबासाहेबांनी आपल्या बौद्ध तत्वज्ञानात कुठेच स्थान दिले नाही. या सर्व बाबींचा सखोल विचार करता, असा निष्कर्ष निघतो कि, बौद्धांनी २८ बुद्धाच्या तत्वज्ञानाला मूठमाती देऊन, एकाच बुद्धाला म्हणजेच सम्यक संबद्ध गौतम बुद्धांना सरणं जावे.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
आयुष्यमान आनंद आरकडे
(लेखक, विचारवंत एवं अभ्यासक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

रविवार, २४ सप्टेंबर, २०१७

● पुणे करार : समज आणि गैरसमज

● पुणे करार : समज आणि गैरसमज

१९२० अखेरीस बाबासाहेब आंबेडकर हे अस्पृश्य जनतेचे एक नामवंत राजकीय नेते बनले होते. जाती संस्थे विरुद्ध काहीही न करणाऱ्या पक्षांना त्यांनी आपल्या टीकेचे लक्ष बनवले. गांधीजी आणि अखिल भारतीय काँग्रेस यांच्या वर अस्पृश्यांना दयनीय परिस्थितीत ढकलल्याचा आरोप केला. ब्रिटिश सरकारावर ही ते नाराज होते व त्यांनी अस्पृश्यांसाठी एक नवीन राजकीय आघाडी काढली. ८ ऑगस्ट १९३० साली मागास वर्गीयांच्या सभे मध्ये बाबासाहेबांनी आपला राजकीय दृष्टिकोन लोकांसमोर जाहीर केला, मागास वर्गीयांनी काँग्रेस व ब्रिटिश यांपासून स्वतंत्र झाल्या शिवाय ते सुरक्षित होणार नाहीत असे सांगितले. या भाषणात त्यांनी मिठाच्या सत्याग्रहाचा समाचार घेतला. या टीकेमुळे सनातनी प्रचंड संतापले.

२४ सप्टेंबर १९३२ दिवस शनिवार, सकाळी पुणे करारा बाबत चर्चा चालु झाली. शेवटी १४८ राखीव जागा देण्याचे ठरले व स्पृश्य हिंदुंच्या जागांपैकी १०% जागा अस्पृश्य वर्गाला देण्यात येतील असे ठरले. आता मात्र राखीव जागा रद्द करण्याचा कालावधी किंवा सर्वमत यावरुन खडा जंगी होऊ लागली. गांधीजींच्या समर्थकांनी १० वर्षासाठीच राखीव जागा असासाव्यात या मताला लावून धरले तर बाबासाहेबांनी कुठल्या परिस्थीतीत कालावधी ठरवू नये. अस्पृश्यांचे सार्वमत घेऊनच राखीव जागा रद्द करण्याची अट घातली. या चर्चेतून काहीच परिणाम निघत नाही असे दिसु लागल्यावर शेवटी बाबासाहेबांनी गांधींची भेट घेतली. गांधीजी सोबत झालेली चर्चातर अधिकच बिन बुडाची व तर्क विसंगत निघाली. गांधींनी ५ वर्षातच सार्वमत घेण्याचे बोलून दाखविले. बाबासाहेब मात्र आपल्या मतावर ठाम होते. शेवटी गांधी चिडून जातात अन निर्णायक आवाजात गरजतात, “५ वर्षात सर्वमत घ्या किंवा माझा जीव घ्या.”

गांधींचा अविचारीपणा बाबासाहेबाना अजिबात आवडला नव्हता. ते तडक उठून बोलणीच्या ठिकाणी आलेत व शेवटी त्यानी रोकठोक भूमिका मांडली, सार्वमत कमीत कमी १० वर्षानी घ्यावे किंवा बोलणी थांबवू या असे जाहीर केले. बाबासाहेबांचा निर्णायक सुर ऐकून गांधीवादी नेत्यांचे धाबे दणाणले. दबावाचे सर्व तंत्र निष्क्रीय करण्यात बाबासाहेबांनी आघाडी घेतली. आता मात्र त्यांचे सर्व अस्त्र निकामी झाले होते. शेवटी सर्वमताचा मुद्दा बाजूला सारुन मुदतीचा नाम निर्देश न करता करार करावा असे ठरले.

दुपारी ३ वाजता राज गोपालाचारी यानी ही माहिती तुरुंगात जाऊन गांधीजींना सांगितली. गांधीजींनी आशिर्वाद दिला. चर्चेच्या ठिकाणी आनंदाच्या कारंज्या उडाल्या. लगोलगो कराराचा मसूदा तयार करण्यात आला. पुणे करार आणि त्यातला संक्षिप्त मसूदा असा होता.

१) प्रांतीय विधान सभा मध्ये साधारण निवडणूक क्षेत्रांमधील जागांपैकी अस्पृश्य वर्गासाठी राखीव जागा ठेवण्यात येतील. त्या येणे प्रमाणे : मद्रास - ३०, मुंबई व सिंध मिळून -१५, पंजाब - ७, बिहार व ओरिसा - १८, मध्य भारत - २०, आसाम - ७, बंगाल - ३०, मध्य प्रदेश - २० अशा प्रकारे एकूण जागा १४८ अस्पृश्यांसाठी देण्यात आल्या.

२) या जागांची निवडणूक संयुक्त निवडणूक संघ पद्धती द्वारे प्रकारे केली जाईल. प्रत्येक राखीव जागेसाठी अस्पृश्य वर्गातील ४ उमेदवारांचे पॅनल निवडले जाईल. या चार उमेदवरांतुन ज्याला सर्वाधिक मते मिळतील तो विजयी उमेदवार जाहीर होईल.

३) केंद्रिय कार्यकारिणी मध्ये अस्पृश्य वर्गाचे प्रतिनिधित्व वरिल कलम दोनच्या नुसार होईल.

४) केंद्रिय कारिणी मध्ये अस्पृश्य वर्गाच्या राखीव जागांची संख्या १८% असेल आणि त्यांची निवड वरील प्रकारे होईल.

५) उमेदवारांच्या पॅनलच्या प्राथमिक निवडींची व्यवस्था केंद्रिय तसेच प्राम्तीय कार्यकारिणींसाठी ज्यांचा वर उल्लेख केला आहे. पहिल्या १० वर्षा नंतर समाप्त होईल.

६) प्रांतीय व केंद्रिय कार्यकारिणी मध्ये अस्पृश्यांच्या जागांचे प्रतिनिधीत्व जसे वरील कलम १ व ४ मध्ये दिले आहे. तो पर्यंत अंमलात असेल जो पर्यंत दोन्ही संबंधीत पक्षां द्वारा आपसात समझोता होऊन त्यास हटविण्याची सर्व संमत निर्णय होत नाही.

७) केंद्रिय व प्रांतिक कार्यकारिणींच्या निवडणूकीत अस्पृश्यांचा मतदानाचा अधिकार लोथियन समीतीच्या अहवालानुसार असेल.

८) अस्पृश्यांना स्थानीक निवडनूका व सरकारी नोकरीसाठी जातीय करणामुळे डावलल्या जाऊ नये. पात्रता असलेल्या प्रत्येक अस्पृश्यास नोकरीत घ्यावे.

९) सर्व प्रांतात शैक्षणीक अनुदान देऊन अस्पृश्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे काम करण्यात यावे.

मसुदा तयार झाला, आता सह्या करण्याची वेळ आली तेवढ्यात मद्रासच्या अस्पृश्यानी एम. सी. राजा यानी करारावर सही केल्यास आम्ही बाबासाहेबांना सही करु देणार नाही अशी विरोधाची भूमिका घेतली. कारण या एम. सी. राजानी मुंजे सोबत जो करार केला होता, तो अस्पृश्यांचा घात करणारा होता. त्यामुळे अशा अस्पृश्य द्रोहीनी या करारावर सही करु नये. अशी मद्रासच्या अस्पृश्यांची मागणी होती. शेवटी यात ही तडजोड करण्यात आली व सह्या करण्यात आल्या. अस्पृश्य वर्गाच्या वतीने बाबासाहेबांनी मुख्य सही केली तर सवर्णांच्या वतीने पंडित मदन मोहन मालवियाने सही केली. इतर सर्व सभासदानी ही सह्या केल्या. अन तिकडे तुरूंगात ही एकच जल्लोष उडाला. गांधीनी उपोषण सोडले. त्यांनी बाबासाहेबांचे अभिनंदन केले.

२५ सप्टे १९३२ रोजी सर्व पुढारी करार मंजूर करण्यासाठी मुंबईत आले. ब्रिटिश महा राज्यपालाना या कराराची माहिती तारेने कळविण्यात आली. मुंबई राज्यपालांच्या कार्यवाहांना दोन्ही पक्षाच्या पुढाऱ्याने प्रत्यक्षपणे माहिती दिली. २६ सप्टे १९३२ रोजी ब्रिटिश मंत्री मंडळाने पुणे करार मंजूर करुन घेतला. त्यावर मंत्री मंडळाने शिक्का मोर्तब केले. तिकडे दिल्लीत हिंदु महासभेने ही आपली मंजूरी दिली, असा होता पुणे करार.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
निलेश यशवंत आंबेडकर : नाशिक
(लेखक, विचारवंत एवं युवा मार्गदर्शक)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

गुरुवार, २१ सप्टेंबर, २०१७

● ध्यानी जरा ठेवा (कविता)

● ध्यानी जरा ठेवा

खरच ते शब्द,
भिमाचे ध्यानी जरा ठेवा ।

समतेचा हा मार्ग,
तुम्हाला आज दिला नवा ।।धृ।।

जातो सोडूनी आज,
तुम्हाला प्रवास ईथला ।

आता संपला विझू लागला,
जीवनाचा हा दीवा ।।१।।

संघटीत व्हा शिक्षण घेऊन,
संघर्षाचा माथी टीळा ।

हा लाऊन मिळू द्या,
समाधान या जीवा ।।२।।

मी जाता मागे नका फुटू रे,
पंगती मधूनी नका ऊठू रे ।

दिला मंत्र हा कवी वसंता,
जपून ऊरी ठेवा ।।३।।

कवी -
वसंत हिरे ऊर्फ वसंत देवरगांवकर

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

● सनी म्हणे (कविता)

● सनी म्हणे

कळस गाडीला हिंदू संस्कृतीने,
हेच पर्यायाने बोलावे लागे ।।धृ।।

गरबा खेळा तुम्ही जोमाने,
परंतू प्रेमाने सनी म्हणे ।।१।।

बोलण्याचा अर्थ खूप काही सांगे,
विकृति दावे तीच्या शब्दात ।।२।।

धन्य संस्कृती, धन्य परंपरा,
भारताचा चेहरा विद्रुप करी ।।३।।

नव रात्रीचे खेळा नव रंग,
मानवता भंग करू नये ।।४।।

काय द्यावा धडा येणाऱ्या पिढीला,
आपुल्या मनाला "अनिल" विचारी प्रश्न ।।५।।

कवी -
अनिल विक्रम जाधव : रायगड
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

बुधवार, २० सप्टेंबर, २०१७

● नवरात्र सण अर्थात दांडिया म्हणजे शारीरिक आकर्षणाचा 'डिस्को' नाच

● नवरात्र सण अर्थात दांडिया म्हणजे शारीरिक आकर्षणाचा 'डिस्को' नाच

सूचना -
सर्व वाचकांना नम्र विनंती हा लेख वाचून इतरांना नक्की शेअर करा.

उद्देश -
डॉ. बाबासाहेबांच्या महान विचारांचा आदर करून या वर्षाच्या दांडिया उत्सवात कोणी ही बौद्ध तरुण - तरुणी नाचणार नाहीत, याचा नक्की संकल्प करतील, अशी माझी खात्री आहे. आपणच यावर सुसंस्कृत विचार करून विज्ञान दृष्टीकोन मोठा नक्कीच कराल.

लेख -
राजेश सावंत

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

भारतात मनुवादी विचारांनी काल्पनिक देवांची अनेक रूपं निर्माण करून नुकताच धंदे वाईक विनायकाला पाण्यात विसर्जन करीत नाही तो पर्यंत काल्पनिक सरस्वती, शारदा माता येण्याच्या तयारीत असून त्या मातेच्या नावाचा जयघोष करीत नऊ दिवस पूजेला लावून तिला सुद्धा जल समाधी देणार. असे कसे यांचे देव? पूजेला लावायचे काळा पैसा जमवायचा व माणसानेच बुद्धीच्या कला कृतीच्या जोरावर बनविलेला मातीच्या देवाला पाण्यात टाकून द्यायचा? स्वतःच्या हातानं बनविलेल्या कलाकाराला खरतर देव मानायला हवं बरोबर ना? या हिंदुस्थानात नेमकं उलट आहे हो. या मातेचा जागर करण्यासाठी रातभर गेल्या अनेक वर्षापासून दांडिया जल्लोषाला, पुर्वीचा गरबा, धार्मिकतेच्या कळसाची टोक पार करून अधर्मिकतेच स्वरुप प्राप्त झाले आहे. त्यामुळे दांडिया घरातून मैदानात आला व त्यात झालेले बदलही लोकांनी अति उत्साहाने स्विकारले. त्यातुनच पंचातारिक हॉटेल मध्ये होणारा व ऐकलेला शब्द "डिस्को 'आता काल्पनिक देवीचा थाट मांडून तिच्या समोर नऊ दिवस “डिस्को दांडिया” च्या स्वरुपा मध्ये गाण्याच्या तालावर ज्यांना नाचता येत नाही ते सुद्धा हातात काठी टेकत टेकत जाऊन काट्या फिरवायला लागलेत. दांड्या हातात घेऊन नाचायला लागलेत व त्यांच्या काट्या नको तिकडे नकळत फिरायला लागल्यात.

पुर्वी हडप्पा मोहन्जाडो कालीन संस्कृती मध्ये काही पुरावे पहावयास मिळतात. त्याकाळी नुकतीच मशागत होऊन लावणी लावलेली आहे. शेत काही दिवसात अमाप पिक देणार आहे. सुगीचे दिवस जसे जसे जवळ यायला लागतात. त्यावेळी शेतकरी हा आनंदाने बेभान होऊन नाचत - गात अभिनया सोबत स्त्रिया व पुरुष नाच, नृत्य ही करायचे. अशी खरी पार्श्वभूमी आहे. आज ही अनेक ठिकाणी शेतीचे काम करताना गाणी म्हटली जातात. नाच केले जातात तो केवळ आनंद म्हणूनच! खरतर शरीराचा क्षीणपणा निघून जावा, नवीन जागृती संचार निर्माण व्हावा.

आज मात्र काल्पनिक देवीचं स्थान पक्क करून तिच्या अवती भवती गोळा होऊन ढोल नगारे वाजवून नको ते अंग विपक्षेप करून नाचायला लागलेत. हाच दांडिया सामाजिक पातळीचा तळ शोधून धार्मिकतेच्या नावावर काळा पैसा कमवण्याच्या हेतू स्वरुपात साजरा केला जाऊ लागला. याला कल्पनिकतेचा अंधश्रद्धेचा कळस म्हणा अथवा किती प्रभाव या मनुवादी व्यवस्थेने जागृत करून ठेवला आहे. त्यामध्ये केवळ बहुजन समाजातले लोक श्रदेच्या नावाखाली भरडले गेले आहेत. त्यात हुशार ब्राम्हणांची जात हातावर मोजण्या एवढेच असतात.

साधारणत: तीस वर्षापुर्वी खेळला जाणारा गरबा हा धार्मिक स्वरूपाचा होता. तसेच त्याचे स्वरुप ही छोटे खाणीच असायचे. त्यावेळी आजच्या सारखे व्यापक स्वरुप नव्हते. वस्ती अधिक असलेल्या वसाहतीत, त्या - त्या क्षेत्रा पुरते मर्यादित असे. त्या ठिकाणी स्त्री - पुरुष पारंपारिक गरबा नृत्य करायचे. आज ज्या पध्दतीने गरबा आयोजित केला जातो, ज्या पध्दतीने गरबा नृत्य केले जाते त्याचा सारासार विचार करता त्यामागे धार्मिक, पवित्र भावनांचा आणि सांस्कृतिक विधींचा लवलेशही सापडणे दिवसें दिवस दुरापास्त होत चालले आहे. अर्थात आज - कालचे गरबाला असणारे धार्मिक पवित्रतेचे वलय बाजूला पडून त्याठिकाणी एका “मस्त मस्त डिस्को दांडियाने” ती ती जागा घेतली आहे. याच दिवसात तरुण - तरूणींची देखील एकच धावपळ तेवढ्याच जोमाने चालली असते.

खास नविन विकत आणलेली चनीया चोली, लिप्स्टीक, त्याच शेडची नेलपेंट आणि खास ब्युटि पार्लरमधे जाऊन सेट केलेली केशरचन अशी सारी जय्यत तयारी सकाळ पासून चाललेली आहे. सोबतच रात्रीला रंगलेली दिसावी म्हणुन सकाळीच हातावर काढून घेतलेली मनमोहक मेहंदी देखील बऱ्या पैकी रंगलेली असते. ही सारी जय्यत तयारी आहे ती रात्रीच्या गरबा दंडियाची! आणि हो हा सारा खटाटोप केवळ एका रात्री पुरता कशासाठी?

अशा धावपळी मध्ये आपण जर का एखाद्या तरुणीला प्रश्न केला ‘का ग एवढं सारं कशासाठी?’ तर ती नक्कीच आपल्याला शेलकी प्रतिक्रिया देत म्हणेल, कशासाठी म्हणजे काय? वर्षातून एकदाच तर येतो दांडिया सॉलिड धम्माल येत. दहा दिवसात एक तरी दिवस पुरस्काराची लॉटरी ही लागते. पण जेंव्हा या दिवसात चुकून आयुष्याची बरबादी न सांगता येऊ शकते हे तिला कळत नाही. असे अनेक अनैतिक प्रकार घडले जातात. याकडे मात्र कुणी ही लक्ष देत नाही. या सर्व सुंदर दिसण्याच्या प्रयत्नात व दांडिया खेळण्याच्या नादात स्वतःची दांडीगुल होऊन त्यातील अनेक तरूणींच आयुष्य जीवन बरबाद झालेले आहे. दरवर्षी अशा अनेक घटना घडत आहेत. काही वर्षा पूर्वी फोर्ट भागातील विद्यालायतील विद्यार्थिनीवर पाशवी अत्याचार झाला होता तो या दिवसातच. असा पहाटे पर्यंत दांडियाचा जल्लोष चाललेला असतो. आजूबाजूला असणारी रुंग्नालय अधिक डेसिमल असणाऱ्या कर्कश आवाजामुळे भरडून जातात. आजारी माणूस अर्धमेला असलेला शेवटच्या घटकेला येऊन थांबतो. याची चिंता दांडिया खेळणाऱ्या लोकांना नसते. अशी केविलवाणी अवस्था हिंदूसणा मध्ये होते. गुजरात मधून महाराष्ट्रामध्ये आलेल्या या दांडियाने तरूण-तरूणींना अगदी वेडं करून सोडलं आहे. त्यांना मोठया प्रमाणात एकत्र बांधून ठेवलं आहे.

विविध मंडळे या उत्सवाचे आयोजन मोठया प्रमाणात करीत असतात. मात्र आज या उत्सवातील भक्ती बाजूला सारली जाऊन तिथे दिखाऊ वृत्ती प्रस्थापित होऊ लागली आहे. दांडिया रास म्हणजे केवळ भारी वेशभुषा करून, टिपऱ्या हातात घेऊन विद्युत रोषणाईत, मोठया आवाजात डिस्को दांडियाचे नावाखाली कसल्या ही प्रकारचा नृत्य प्रकार करायचा हे प्रमाण वाढीस लागले आहे.तसेच या दांडिया मध्ये सहभागी होणारी जास्तीत - जास्त तरूण मंडळी ही १८ ते २५ या वयोगटातीलच असतात. ह्या नवरात्रीच्या नऊ दिवसा मध्ये तरूण - तरूणी मोठ्या आनंदाने. उत्साहाने दांडियाच्या निमित्ताने एकत्र येतात. आणि याचवेळी अचानक दोन भिन्न लिंगी मन एकत्र येतात. एकमेकांशी खुप मन मोकळ्या गप्पा मारतात. बेधुंद होऊन दांडिया खेळतात, आलेले बरे - वाईट अनुभव एकमेकांना सांगतात. एकमेकांजवळ मनं मोकळी करतात. हळूहळू त्यांच्य़त चांगली मैत्री निर्माण होते. आणि दिवसेंदिवस ह्या नऊ दिवसा मध्ये त्यांच्यातील सहवास वाढत जातो. आणि पुढे कालांतराने आपली जवळीक प्रेमात बदलत असल्याचे त्यांना जाणवू लागते.

प्रेम म्हणजे नेमके काय? हे कळत नसतांना ही किशोर वया मध्ये एकमेकां विषयी वाटणारं आकर्षण म्हणजे प्रेम नसतं. ती एक शारीरिक ओढ असते. हे किशोरांना माहित नसतं आणि म्हणूनच ते यास प्रेम समजून बसतात. याच काळा मध्ये त्यांच्या मध्ये लैंगिक बदला विषयी एक आकर्षण जिज्ञासा वाढिस लागलेली असते. त्यांच्या मध्ये वारंवार लैंगिक अनुभव घेवुन बघण्यास प्रवृत्त होतात. ही प्रवृत्ती रोखणे महत्वाचे असते. परंतू प्रेम म्हटले की त्यातून उद्भवणारी लैंगिकता टाळता येत नाही.

‘सोळावं वरीस धोक्याचं म्हणतात ने काही उगीच नाही’ कारण येथे उद्याच्या चांगल्या वाईटाचा विचार नसतो. अशा अनधिकृत प्रेम संबंधातूनच लैंगिक आकर्षण वाढत जाऊन ते शारीरिक सुख उपभोगण्या मध्ये मशगूल होऊन जातात. आणि यातुनच मग घडते ते विकृत प्रेमास बळी जाण्याचे प्रकार आणि बऱ्याचदा अनेक जण नशा करून ही दांडियात सहभागी होत असतात. तरूणींची छेडछाड होते पारंपारिक संस्कृतीच्या नावाखाली चंगळवादाला खतपाणी देणाऱ्या तरुणांमुळे वातावरणातील पार बिघडून जाते . आज दांडिया म्हणजे एन्जॉय असं समीकरण झालं आहे. या एन्जॉयच्या माध्यमातून प्रकाशात दिसणारी अंधकाराची, वाईट विचार प्रवृत्तीची बीजे पेरली जाऊ लागली आहेत. आणि हीच संकल्पना रूढ रुंदावत चालली आहे. प्रत्यक्षात समाजातील अविवेकी, अविचार व असंस्कृत कु - प्रवृत्तिचा दाट अंधार डोळ्या समोर जाणवत आहे.

पूर्वीचे राजे महाराजे या नाच गरब्यातून एखादी आवडत्या स्त्रीला उपभोगण्यासाठी सुद्धा वापर करीत असत किंवा तिला कायमची रखेली म्हणून ठेवत असतं. तसे आजही त्याचेच अनुकरण होत आहे. आणी तीच विकृती वाढीस लागली आहे. गेल्या वर्षी केवळ मुंबईत या दांडिया नऊ दिवसात लाखोच्या घरात निरोध मेडिकल दुकानातून विकले जातात त्याच बरोबर लाखाच्या घरात गर्भपाताच्या केसस समोर येतात असा हा दांडियाचा किळसवाना प्रकार या गुजरात पासून देशभर 'डेंगी" सारखा पसरतो आहे. याच्या वर कोणाचे ही नियंत्रण नाही. त्यामुळे अधिकच गंभीर प्रश्न निर्माण होत आहेत. याकडे सरकार न्यायालय लक्ष देईल का? दांडिया याचा खरा अर्थ दांडी मारणे. उदा: शाळेला दांडी मारणे, दांडिया म्हणजेच वाईट गोष्ट करणे,चाट देणे फसविणे. याचाच अर्थ या दांडिया माध्यमातून आपण कुणाला तरी फसवत आहोत, फसवून स्वतः बरोबर दुसऱ्या कोणाचे तरी आयुष्य बरबाद करण्याचा प्रयत्न करीत आहोत. कुणाला तरी बदनाम करण्याचा हेतू या दांडियाच्या नऊ दिवसात घडणार आहेत. कोणाचं तरी आयुष्य कायमच लोप पावणार आहे. कोणाच्या तरी कुंटुबाला बदनामीला तोंड द्यावे लागणार आहे. अनेक अनैतिक प्रकार घडणार आहेत. याचा विचार मनापासून केला तर सहज वाटायला लागते. या क्षणाला आता, आजच हे सारं थांबणे महत्वाचे आहे. आपण जुन्या प्रथांना कवटाळुन बसावं की टाळावे?

या सर्व विकृतीतून, प्रकारातून मुक्त होणं म्हणजेच देशातील गरीब लोकांच्या सहवासात राहणे त्यांचा विचार करणे होय. प्रत्येक नऊ दिवशी नवीन कपडे घालता त्यापैकी एक दिवसाचा कपडा अनाथ आश्रम किंवा गरीब शिकणाऱ्या मुलांना द्याल किंवा त्याला लागणारी शाळेची पुस्तके द्याल तर कदाचित तो या देशाचा निस्वार्थी अनुयायी बनेल कदाचित या देशाच, राज्याच, गावाच, घराच, नेतृत्व तो करेल ही भावना, आस्था, संकल्प आपण प्रत्येकानी आपल्यात निर्माण केला तर हा देश विज्ञान युग म्हणून आकाशात गरुड झेप घेतल्या शिवाय राहणार नाही, तो घेणारच! असा आत्म विश्वास स्वतः पासून निर्माण करा क्षितीजाला ही काही क्षणात जवळ कराल.

●◆●

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
राजेश सावंत (लेखक, कवी एवं युवा मार्गदर्शक)
"आसरा शैक्षणिक आणि सामाजिक संस्था"

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।