गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

● "भारताच्या संविधानाचा अंमल" करणे आवश्यक...

● "भारताच्या संविधानाचा अंमल" करणे आवश्यक...

लेख -
अॅड. शाम तांगडे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

मित्र हो सप्रेम जयभीम,
जाती ग्रस्त व धर्म ग्रस्त भारताच लोक कल्याणकारी राष्ट्र निर्मितीचं मॉडेल म्हणजेच "भारताचे संविधान" ही अनमोल राष्ट्रीय ज्ञान दानाची देणगी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हा भारतीयांना प्रदान केली. भारताच्या प्रत्येक नागरिकाला "भारतीय संविधानाच ज्ञान असणं बंधकारकच असायला हवे. आज देशात महिलांवर लैंगिक अत्याचाराने टोकाची सीमा पार केली आहे, ज्यांना लोकांच्या कल्याणासाठी मंत्री बनविले तें हप्ता वसुली, कल्याणकारी योजनेतील टक्केवारी, विशेष उपक्रमाच्या योजना कागदावर रेखाटून सर्व रक्कम चोरणे, बॅंकातील गोर गरिबांच्या पैशाचा अपहार करणे, या कामात व्यस्त आहेत. असे चोर आम्ही सत्ता केंद्रावर बसवतो आणि त्यांच्या अशा कृतिची कळ लागल्यावर जोर जोराने बोंबलतो, आरडा - ओरडा करतो. अशा समयी हेच चोर मदतीचे नाटक करीत धावून येतात.

जाती - जातीत भांडण लावून त्यावर वेश्या समान राजकारण (Political prostitution) करणे हीं आजच्या राजकारण्यांची जीवन शैली बनलेली आहे. जितक्या जाती, जितके धर्म, जितके प्रांत, जितक्या भाषा, तितके राजकीय पक्ष निर्माण होणार. देशात जाती - धर्माच अराजक निर्माण होणार. जाती - धर्मातील लोक जो पर्यंत गुलामी मानसिकतेत जगतात तो पर्यंत राजकीय सत्ताधारी चोर सुरक्षितपणे आपली लुटपाट करु शकतात. परंतु हीच लुटपाटीची कला हे गुलाम लोक जागे होऊन शिकतात तेव्हा हे लोक लुटपाटीच नवीन तंत्र घेऊन राजकारणात प्रवेश करणार. तेव्हा परिस्थिती नियंत्रणा बाहेर गेलेली असेल.

महिलांवरील अत्याचार हा अशा गलिच्छ राजकारणाचा दुष्ट परिणाम आहे. हे आकलन सहज लक्षात येण्यासारखं नाही. कारण आज भारतीय समाज जीवन जाती आणि धर्म ग्रस्ततेने विकार ग्रस्त झालेले आहे. यावर जालीम उपाय म्हणजे "भारताच्या संविधानाचा अंमल" आज अश्लीलता, भ्रष्टाचार, जातीवाद, धर्मांधता, अशा विकाराने कळस जवळ केला आहे. यातून भारताचे संविधान मूल्येच तारू शकते.

धन्यवाद !

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
अॅड. शाम तांगडे : अंबाजोगाई
(लेखक, वकील एवं आंबेडकरी विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV : 8767048591
(Use Only WhatsApp Massage,.)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

● इंग्रजांच्या काळातील रूढी, जाती निवडा आणि संविधान निर्मिती निमित्ताने थोडे काही...

● इंग्रजांच्या काळातील रूढी, जाती निवडा आणि संविधान निर्मिती निमित्ताने थोडे काही...

लेख -
अॅड. शाम तांगडे

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

क) स्पृश्य हिंदू - Touchable Hindu.
ख) अस्पृश्य हिंदू - Untouchable Hindus
ग) मुसलमान - Mohammedans
घ) ख्रिश्चन - Christians.
ङ) पारशी - Parsees
च) ज्यूव - Jews.

इंग्रज भारतात (इंग्रजांच्या काळात) हे समाजातील धर्म रुढीनूसार विभाजन होते. जंबुद्विपा वर इंग्रज अधिपत्त्य स्वातंत्र्याचे आंदोलन सुराज्या पासून स्वराज्या पर्यंत विकसित होत होते. समग्र समाज विविध धर्म आणि रुढी परंपरांने विखण्डित होता. सरकारी हिस्सेदारीचे दावे - प्रतिदावे सुरु झाले. राजकीय संघटना निर्माण करुन सत्तेतील हिस्सेदारीचा दावा करु लागल्या.

१) हिंदूंच्या प्रतिनिधीत्त्वाचा दावा करणारी काँग्रेस

२) मुसलमानांचे नेतृत्त्व करणारी मुस्लिम लिग

३) अस्पृश्य वर्ग (आम्ही हिंदू पासून वेगळे आहोत, असा माणनारा बहिष्कृत वर्ग)

यात प्रामुख्यांने हे तीन प्रवाह स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात आपापल्या अस्तित्व आणि हक्कासाठी संघर्षरत झाली. या पैकी हिंदू आणि मुसलमान लोकमान्य धार्मिक समाज घटक होते. त्यांचे नेतृत्त्व बदल झाला तरी जनाधार धार्मिक मान्यता प्राप्त असल्यामुळे कायम होता. परंतु अस्पृश्य वर्गाला हिंदूंच्या गुलामीतून वेगळ होऊन आपलं स्वतंत्र अस्तित्त्व सिद्ध करण्यांसाठी संघर्ष करावा लागल होता.

इंग्रज सरकार समोर हिंदू - मुस्लिमांचे प्रतिनिधित्व करणारे दोनच ओळख प्राप्त सामाजिक प्रवाह होते. त्यात तिसऱ्या बहिष्कृत समाज घटकाची भर पडली. इंग्रज भारतातील लोकांच्या सहभागाने लोकप्रिय सरकार चालवू इच्छित होते. बहिष्कृत वर्ग हा हिंदू पासून वेगळा करुन त्यांना अल्पसंख्यांचा दर्जा देण्यात येऊ नये. अशी मागणी हिंदूंच प्रतिनिधित्व करणारे नेतृत्वांने इंग्रजाकडे केली. यासाठी त्यांनी मुस्लिम नेतृत्वाची जरुर तिथे मदत घेतली.

गोलमेज परिषदेत बहिष्कृत वर्गाला हिंदू पासून वेगळा समाज घटक म्हंणून मान्यता मिळून १७ आॅगष्ट १९३२ ला "जातीय निवाडा" जाहिर करुन अस्पृश्य हे हिंदू नसून स्वतंत्र समाज घटक असल्याचे जाहिर केले. आता हे अस्पृश्य कोण कोण आहेत, त्यांच्यात ही हिंदूंचा हिस्सा नसतांना जाती कशा प्रभावाने निर्माण झाल्या हा भाग वेगळा अभ्यासू. त्यांची एक जातीसूची बनवविली. सुची बद्ध जातीच्यां समुहाला तो अस्पृश्य म्हणून बेइज्जत केला गेलेला चातूर वर्ण च्या परिघा बाहेर असलेला अल्प संख्यांक वर्ग म्हणून मान्यता मिळाली. असाच दुसरा जो जंगलात राहून आपला निर्वाह करतो तो Tribe म्हणून सुचीबद्ध झाला. यांची १९३५ च्या कायद्याने सुचींना कायद्याचा आधार मिळाला. म्हणजे जे हिंदू आहेत, ज्यांना जातीची ओळख आहे. यांना प्रतिनिधित्वांत सवलत दिलेली नाही. हे प्रथम आपण समजून घ्यायला हवे. पुढे १९३५ चा कायदा बाद करुन नवीन संविधान लिहण्याचा घाट घातला. फाळणी होऊन मुसलमानांना पाकिस्तान देण्यात आले.

नवीन संविधान कसे असावे? हे ठरविण्यासाठी संविधान सभा निर्माण करण्यात आली. फाळणीमुळे मुस्लिमांचा प्रतिनिधित्वाचा प्रश्न निकाली निघाला परंतु SC, ST चा Settle झालेला प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. त्यासाठी सक्षम बाजू मांडणारा संविधान सभेत नसेल तर आता पर्यंतच्या बहिष्कृत वर्गाच्या विकासाच्या तरतूदी वर पाणी फेरल जाईल. परंतु डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेत पोहचून तेच तत्व कायम ठेवण्यात व नवभारत घडविण्याची व्यवस्था निर्माण करण्यात यशस्वी पण झाले.

आता संविधान संमत भारत समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायाच्या तत्त्वावर चालण्याची हमी देत असून अस्पृश्यता नष्ट करण्याचा मुलभूत अधिकार सर्व नागरिकाला बहाल केला आहे. आरक्षणाची जी तरतुद करण्यात आली ती पुर्वा स्पृश्य व Tribe ला आहे जातीला नव्हे आणि ते ही अल्प संख्यांक आहेत. म्हणून State and Minorities या ग्रंथाची प्रस्तावना स्पष्टतेसाठी वाचावी.

धन्यवाद !

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
अॅड. शाम तांगडे : अंबाजोगाई
(लेखक, वकील एवं आंबेडकरी विचारवंत)

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV : 8767048591
(Use Only WhatsApp Massage,.)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।

सोमवार, ६ नोव्हेंबर, २०१७

● कुटुंब नियोजन : "पुरुष नसबंदी" विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मांडलेली मते

● कुटुंब नियोजन : "पुरुष नसबंदी" विषयी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि मांडलेली मते

लेख -
दिपक महादेवराव वानखेडे

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

पुरूष नसबंदी बाबासाहेबांनी सुचवली. तेव्हा ही गांधींनी विरोध केला. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी कुटुंब नियोजन आणि लोकसंख्या वाढीचा प्रश्न या सारख्या ज्वलंत विषयावर आपले परखड विचार मांडले होते आणि काही पर्याय सुचवले होते जे आज सुद्धा लागू पडतात. लोक संख्या वाढ आटोक्यात आणली तरच आर्थिक नियोजन आणि प्रगती चांगल्या प्रकारे होऊ शकते, असे त्यांचे म्हणणे होते. बाबासाहेबांनी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण करायचे असेल तर "कुटुंब नियोजन" हा एकाच प्रभावी पर्याय आहे हे ठासून सांगितले; उपलब्ध साधन सामग्रीचे समान वितरण हे गरिबी दूर करण्याचा पर्याय होऊ शकत नाही. जो पर्यंत लोकसंख्या आटोक्यात येत नाही आणि तसा ही ठराविक समाजाला समान वितरणाचा फायदाच होणार आहे, त्यामुळे गरीब आणि शोषित समाजाला जर आर्थिक प्रगती करायची असेल तर कुटुंब नियोजन हा एकमेव पर्याय आहे, असे बाबासाहेब सुचवतात, ३ अपत्य च्यावर जर जन्मदर गेला तर गरिबी दर आणि मृत्यू दर सुद्धा वाढेल असे त्यांचे ठाम मत होते.

आज सुद्धा "हम दो हमारे दो" वरून "एक किंवा दोन बस्स" पर्यंत हा जन्म दर कमी करावा लागतोय. "एकच मुल सुंदर फुल" अशी वेळ आज दाम्पत्यांवर आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतातील पहिले व्यक्ती होते. ज्यांनी लोक संख्या वाढी सारख्या अती महत्वाच्या प्रश्नांवर विचार मांडले आणि पाठ पुरावा केला. भारताच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि महासत्ता होण्यासाठी बाबासाहेबांची धडपड, तळमळ त्यांच्या प्रत्येक कामातून दिसून येते. बाबासाहेबांनी १० नोव्हेंबर १९३८ साली मुंबई पालिका सभागृहात आपले सहकारी श्री रोहम यांच्या वतीने लोकसंख्या नियंत्रणावर एक विधेयक सादर केले होते.

जन्म दर आटोक्यात यावा म्हणून बाबासाहेबांनी विवाहितांना पद्धती सुद्धा सुचवल्या होत्या आणि आपला मुद्दा लोकांपर्यंत पोहोचावा, म्हणून बाबासाहेब एक प्रश्न विचारात "काय महत्वाचे आहे जनामाला येणे कि जगणे?" तुम्ही जर मुलांना जन्मच देत राहिलात तर आर्थिक नियोजन आणि प्रगती कशी करणार? असा वैचारिक प्रश्न ते करत असत लोक संख्या वाढ हि परिमाणात (संख्या) नसावी तर गुणवत्तेत असावी. असे ते नेहमी सांगत, हे वैश्विक सत्य त्या काळात बाबासाहेबांनी मांडले होते जे आज सुद्धा फार गरजेचे आहे. आपल्या देशातील लोक, अशिक्षित असले तरी आता त्यांना गर्भ टाळण्यासाठी झालेले नवनवीन संशोधन माहित असावे.

"पुरुष नसबंदी" (VASECTOMY) हा पर्याय आपल्या देशात उपयुक्त ठरू शकतो. असे बाबासाहेब सांगत आणि त्यासाठी सरकारने माहिती आणि सुविधा पुरवाव्यात असे ही ते सुचवत असे. जात, धर्म, वंश, भाषा यांचा विचार करता प्रत्येक भारतीयाने जन्म दर आणि लोकसंख्या नियंत्रणावर लक्ष द्यायला हवे. परंतु बाबासाहेब दलित आणि मागास वर्गीयांनीया पद्धतींचा अवलंब करून कुटुंब नियोजन करावे यावर ते भर देत असे. बाबासाहेबांना स्त्रियांच्या आरोग्याची विशेष काळजी होती. त्यामुळे गर्भ धारणा टाळण्यासाठी त्यांनी स्त्री नसबंदी न सुचवत पुरुष नसबंदी सुचवली होती, अशी नोंद आहे. बाबासाहेबांनी हे विधेयक संसदेत मांडले. परंतु राजकीय पक्षांनी या बिलाला जास्त महत्व दिले नाही.

बाबासाहेबांनी तरुणांना चेतावणी वजा इशारा दिला होता "हे कायमचे लक्षात ठेवा. जास्त मुल जन्माला घालणे म्हणजे सामाजिक अपराध आहे." बाबासाहेबांच्या मते मानवाचे जीवन हे प्राण्यांप्रमाणे नसावे, तेच जर सुशिक्षित आणि सुसंस्कृत असेल तर लोकसंख्या नियंत्रण करण्यासाठी सोपे जाते आणि बेरोजगारी, सामाजिक व आर्थिक मागासलेपण, वेश्या व्यवसाय, चोरी, खून, गुन्हे आटोक्यात आणण्यास मदत होते. गांधीं यांच्या मते गर्भ धारणा हि स्वतःच्या संयमावर अवलंबून आहे आणि त्यासाठी कुठल्या ही गर्भ निरोधची आवश्यकता नाही , बाबासाहेब आणि गांधी यांची या विषयावर सुद्धा जुगल बंदी झाली होती.

गांधीनी जन्म दर कमी करण्यासाठी उशिरा लग्न, स्व - संयम या मालथूस यांच्या पर्याया पेक्षा "स्व - संयम" यावर भर दिला परंतु बाबासाहेबांनी गांधींच्या या विचारणा असहमती दर्शवली होती आणि निरोगी आणि आनंदी आणि एकमेकांवर खूप प्रेम करतात. अशा विवाहित जोडप्या कडून संयमाची अपेक्षा करणे म्हणजे मानवाच्या नैसर्गिक स्वभावाकडे दुर्लक्ष केल्या सारखे होईल आणि हा एक प्रकारे शारीरिक आणि मानसिक अन्याय ठरेल. निरोगी विवाहितांना गर्भ धारणा रोखण्यासाठी संयम बाळगण्यास सांगणे म्हणजे गैरसमज आणि भ्रम निर्माण करण्या सारखे आहे. असे बाबासाहेब म्हणत आणि गर्भ धारणा रोखण्यासाठी गर्भ निरोधक वापरणे हाच एकमेव उपाय आहे, असे ते खडसावून सांगत. बाबासाहेबांना वैज्ञानिक संशोधनावर पूर्ण विश्वास होता आणि म्हणून ते गर्भ निरोधकांचा आग्रह धरत असत. परंतु अशा कृत्रिम गर्भ निरोधकांच्या वापराला समाजात खूप विरोध होता.

भारतीय समाज हा अध्यात्मिक आहे आणि हिंदू धर्म ग्रंथात कुटुंब नियोजनाचा स्वयं संयम सारखे उपाय सुचवले आहेत. असा पवित्र लोकांनी घेतला होता. बाबासाहेब अशा लोकांना सांगत, एक दिवस संयम पाळल्याने सुद्धा वर्षभरात गर्भ धारणा टाळता येणार आहे का? बाबासाहेब अध्यात्मिक शिकवणीच्या विरोधात होते, लोक अजिबात धार्मिक किंवा अध्यात्मिक नसतात. परंतु ते तसे असल्याचा निव्वळ दिखांवा करतात आणि धर्माच्या नावाखाली स्वतःचे इप्सित, स्वार्थ साध्य करून घेतात. बाबासाहेब भारताचा विकास करण्यासाठी चतुरस्त्र विचार करणारे एकमेव भारतीय होते, स्वतंत्र्या पुर्वी भारताच्या लोक संख्येबाबत चिंता व्यक्त करताना आपण केलेल्या चुकीचे उदाहरण देताना बाबासाहेब म्हणाले - ‘माझी चुक निसर्गाने सुधारली.'

बाबासाहेबांनी इंग्लंड आणि भारताच्या लोकसंख्या वाढीचा सखोल अभ्यास केला होता आणि तेथील लोकानी लोकसंख्या नियंत्रणासाठी किती मेहनत घेतली आहे हे ते आपल्या भाषणात नेहमी सांगत असत बाबासाहेबांच्या मते लहान कुटुंब म्हणजे कल्याणकारी संस्कृतीची सुरुवात आणि आज सुद्धा हे तितकेच उपयुक्त आहे असे नाही वाटत तुम्हाला? "भारताच्या सर्वांगीण विकासासाठी लोकसंख्या नियंत्रित ठेऊया. बाबासाहेबांचे स्वप्न साकार करूया. "मुलगा किंवा मुलगी एकच !

◆◆◆

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
दिपक महादेवराव वानखेडे
(लेखक, कवी एवं आंबेडकरी विचारवंत)

संदर्भ -
Geographical Thought of Doctor B.R. Ambedkar

❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖❖

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

═══════════════════════

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

◆●◆••◆●•◆●◆••◆●◆•◆●◆••●◆••◆●◆

• YATIN JADHAV :
9967065953, 8767048591
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा

धन्यवाद ।