बुधवार, १ मार्च, २०१७

● दगलबाज शिवाजी

● दगलबाज शिवाजी 
(SHIVAJI - THE DIPLOMAT)

लेखक - 
केशव सीताराम ठाकरे

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•

"There is always a sacred veil to be drawn over the beginnings of all governments" - Edmund Burke

महाराष्ट्र पुरताच विचार कला, तर आज हिंदूंची तहतीस कोटी देवाची फत्ष्टश पेन्शनीत निघून, त्या सर्वाव्या ऐवजी एकटा शिवाजील छत्रपती परमेश्वर म्हणून अखिल मऱ्हाठ्यांच्या हृदयासनावर विराजमान होऊन बसला आहे. शिवाजी म्हणजे मऱ्हाठ्यांचा फुलस्वामी आणि महाराष्ट्रचा राष्ट्रदेव. 'God Save THE KING' या राष्ट्रगीताचे सूर बँड मधून निघताच इंग्रेज लोकांत जे एक वर्णनीय चैतन्याचे वारे चटकन थरारते. तेच चैतन्य एका शिवाजी या नामोच्चारांत अवघा महाराष्ट्र अनुभवतो. वंदे मातरम् या राष्ट्रगीताला सुद्धा अजून मऱ्हाठ्यांची अंतकारणे काबीज करता येत नाहीत; याचे कारण शिवाजी शिवाय इतर कसल्या ही भावनेला तेथे जागाच उरलेली नाहीं. एवढे ज्या शिवरायाचे महात्म्य, त्याला 'दगलबाज' हे विशेषण लावणेचे धाडस प्रबोषनकार सारख्या जातीवंत मऱ्हाठ्यांने करावे, हि वस्त्रगाळ निमक हरामी होय! अशा शंकेचे काहूऱ याचकाच्या वृत्तीत उठल्या शिवाय खास राहणार नाही. शिवराया सारख्या राष्ट्रवीराची कुचेष्टा करून, आपली प्रतिष्ठा वाढवण्याचा प्रबोघनकाराचा हा बाष्कळ प्रयत्न तर नसेल? असा ही कित्येक तर्क बांधतील सर्व शकिंताना आम्ही आगाऊच ग्वाही देऊन ठेवली की प्रबोधकराच्या खाणीच्या इतिहासात निमक हरामी आणि आत्म प्रतिष्ठा आज पर्यंत कोणालाही आढळलेली नाही. लेखन संस्काराच्या गंधाक्षता प्रथम वाहून शिव चरित्राला चिरजीव करण्याची आद्य कामगिरी याच खाणीतल्या बखरकारांनी बजावलेली आहे. कालौघाने शिवरायाच्या शिव चरित्रावर लौकिंकी कल्पनांनी जर भलभलत्या रंगांचा मारा करून, त्याचे खरे उज्वल रूप विकृत केले असेल, अगर ते तसे झाले असेल, तर त्याचा सप्रमाण मुद्देसूद निरास करून, लोकमताच्या बाजवी प्रबोधनासाठी प्रबोधनकाराने अपने शिव प्रासादिक कलमास्त्र परजणे, त्याचे कर्त्तव्यच आहे. हे कडू कर्त्तव्य आहे. कल्पनेने अंधश्रद्धेने काढलेले शिवरायाचे चित्र बाजूला सारून, त्या राष्ट्रवीराची खरी खुरी प्रतिमा धिटाईने लोकापुढे मांडणे, म्हणजे लोकक्षोमाला बळेच आव्हान देण्या इतकेच भयंकर काम आहे. पण ते कोणी तरी केलं तरी केव्हा प्राप्त असल्यामुळे, लोकक्षोमाची पर्वा न बाळगता हौसेने ते आम्ही आपल्या शिरावर घेतले आहे.

• शिवरायास आठवावे :

शिवरायास आठवावे का आठवावे? आम्हाला तो नित्य आठवतोच का? विसरु म्हटले तरी तो का विसरला जात नाही? शिवरायाने केले तरी काय, की त्याचे महाराष्ट्राने आमरण स्मरणच करावे? माणसांची माणुसकी त्यांच्या राष्ट्रीय स्वातंत्र्याने होत असते.

• हिंदू म्हणजे ह्यूमन कॅटल :

ज्या राष्ट्राला स्वातंत्र्य नाही, परक्रीयांच्या राजसत्तेखाली जे जगत असते, त्या राष्ट्रातल्या माणसांना 'ह्यूमन कॅटल : Human Cattle’ (माणशी गुरेढोरे) हीच संज्ञा यथा योग्य शोभते. शिवाजीच्या हृदयात राष्ट्र धर्माच्या या तीव्र भेदाची विद्युल्लता चमके पर्यत, सतराव्या शतकाव्या मध्या पर्यत, महाराष्ट्रातला हिंदू म्हणजे ह्यूमन कॅटल बनलेला होता, तोंड असून मुका, कान असून बहिरा, डोळे असून आंधळा आणि माणूस असून परकीय मुसलमानी सत्तेच्या खाली वाहणारा बैल होऊन राहिला होता. गुलामगिरीचा पेंडा कडबा खाऊन खाऊन हा बैल सुद्धा इतका मस्तवाल बनला होता, की इस्लामी मान पानाव्या नक्षीदार झुकी चुंगुरमाळांनी नटलेंल्या त्यांच्या अनेक मुक्ती नदी बैलांनी शिवाजीच्या राष्ट्रीय प्रबोधन कार्यात शेकडो वेळा शिगे खुपण्यास कमी केले नाही. महाराष्ट्राला माणुसकी देण्याच्या सहकार्यात विरोधाचे जितके जितके बाण शिवाजो गरुडाच्या काळजात नसते, तितक्या तितक्या बाणांचा पिसारा स्वकीयांच्याच पंखाचा होता. दारच्या प्रतिमा पेक्षा घरच्या विरोधकांशी झगडण्यातच शिवाजीव्या अर्ध्या अधिक हिंमतीचा होम करावा लागला. अशा अवस्थेत ही शक्ती युक्तीची पराकाष्ठ करून, शिवाजीने महाराष्ट्रला स्वतंत्र हिंदवी स्वराज्यचा सोहळा दाखवून, मराठ्यांना पशू वृत्तीतून माणसांत आणून बसविले. जी गोष्ट एका काळी अखिल महाराष्ट्राला अशक्य वाटत होती, आज ही जी पुन्हा अशक्य म्हणून परिस्थिती आम्हाला दटावून बजावीत आहे, लीच नेमकी गोष्ट शिवाजीने शक्य करून दाखविली. या एकाच कारणासाठी महाराष्ट्राने शिवरायाला अखंड आठवले पाहिजे आणि तसा तो आठवीत ही आहे परंतु शिवरायाव्या चरित्राकडे महाराष्ट्र आज ज्या दृष्टीने पाहात आहे ली आमच्या हाडीमासी भिनलेल्या अवतार कल्पनेने आरपार बुरसटुन गेलेली असल्यामुळे, शिवरायाव्या विकृत चरित्र चित्राच्या भजनी आमची टाळकुटी भावना फुक्ट खर्ची पडत आहे. हतकेच नव्हे, तर त्पामुळे शिवाजीच्या राष्ट्रोद्धारक विराट व्यूहाबद्दल आम्हाला फारसा गंभीरपणा ही वाटेनासा झाला आहे. शिवाजीचा स्वराज्योपक्रम म्हणजे ईश्वरी संकेताने आणि 'समर्थाच्या' कृपेमुळे सहजगल्पा घडून आलेला एक गबलाईंचा चमत्कार, इतक्या हलक्याफूल भावनेने आम्ही त्या प्रचंड प्रबोधनाकडे पाहत आहो. पुराणांच्या पारायणाने पंगु बनलेल्या आमच्या मनोवृत्तीला, शिव चरित्राची कमावणी कसकसल्या भयंकर दिव्यातून होत गेली, याची जागीव ही होईनाशी झालेली आहे. शिव चरित्रतील मोठ मोठे प्रसंग म्हणजे जाल कृष्णाच्या पूतनाकर्षाण प्रमाणे "इंश्वर लीला’ वाटतात.

• अवतार कत्पनेचा सफेदा :

कोणत्याही पुरुषोत्तमाच्या चरित्रावर एकदा का अवतार कत्पनेचा सफेदा चढला आणि त्याची सर्व लहान मोठी बरी वाईंट कृत्ये "ईश्वरी लीला' सदरात पडली की त्या चरित्रापासून आत्योद्धारार्थ लागणारे स्पिरिट मनुष्याला केव्हाही प्राप्त होत नसते. राम कृष्णाच्या उज्वल चरित्रे आज आमच्या व्यवहारांत कवडीमोल होऊन बसली आहेत, याचे तरी कारण हेच. राम विजय, जारे विजय, पांडव प्रताप हे ग्रंथ म्हणे चातुर्मासांत सोवळ्याने वाचायचे आणि श्रात्यांनी झोपांच्या डुलक्यात ऐकायचे का? तर म्हणे तेवढेच पुण्य गाढी! मराठी महाभारत कपाटाच्या शोभला. टिळकांचे गीता रहस्य देव घरात फक्त पूजेला. का तर टिलक म्हण शेषशाथी चतुर्मुज़ भगवान! टिळकांना भगवान बनविल्या जर, शिवाजी परमेश्वराचा परमेश्वर तरी ठरविलाच पाहिजे. याशिवाय आम्हा नादान हिंदूंच्या भाविक पणाचा भाव कसा वाढणार?

• पौराणिकी दृष्टीचा अडथळा :

जिकडे पाहाल तिकडे पौराणिकी दृष्टीचा अडथळा. शिवाजीचा काळ होऊन आज अडीचशे वर्ष आली, तरी देखील त्याच्या चारित्र याला जगाची एकमुखी मान्यता अजून मिळालेली नाही. महाराष्ट्राला तो परमेश्वरावत्तार वाटत असला, तरी एकता हिंदू शिवाय इतर सर्व जगाला तो दगलबाज, डोंगरांतला उभार, उपट शूभ असाच वाटतो. पुण्यात कै. शाहू महाराज करबीरकरांनी शिवाजी मेमोरियलचा धाडसी प्रयोग केल्या दिवसा पासून राज्यकर्त्या इंग्रजी नोकरशाहीची शिवाजी विषयी भाषा किंचित नेमलेली आहे. निदान ओठांवर तरी बरीच साखर चमकते, मग पोटात काय असेल न पात्र जाणे! परंतु शिव छत्रपतीची जग मान्यता अजून जवळ जवळ साशंकावस्थेतच आहे असे कबूल केल्या शिवाय सुटका नाहीं याचे कारण काय, राष्ट्रवीरांची कीर्ती जग विद्युत करण्याची कामगिरी वास्तविक इतिहासकारांनी करावयाचा असते, परंतु आमचे मऱ्ह्याठी इतिहासकार अथपासून इतिपर्यत्त एकजात पुराणिक. पौराणिकी साच्या शिवाय त्यांची विद्वत्ता कशात ही ठाकठिक बसायची नाहीं प्रथम शिवाजीला ते परमेश्वराचा अवतार बनवतील, कौसल्ये प्रमाणे जिजाबाईला दिल्लीपती मोंगलाच्या वधाचे डोहाळे पाडतील, तेव्हा कोठे त्यांना 'शिव संभव' दिसायचा. थोडासा सत्याचा धागा, त्यावर यांच्या कल्पनेच्या कोलांट्या उड्या! ना त्यांत विवेक, ना चिकित्सा, ना साक्षेप. येधून तेथून भावनावशतेचा खरकटवाडा, शक्य शक्यतेचा विकार नाही, परिस्थिती परिक्षणाची दृष्टी नाही, पार काय पण, मानवी स्वभाव ओळखण्याची हि अक्कल नाही. काय म्हणे,

"शिवाजी सोळा वर्षाचा झाला नाहीं
तोच त्याने आडदांड लोकांची संगत 
धरून देशात पुंडाई आरंभिली."

ही आमच्या शिवरायाच्या चरित्राची सुरुवात आणि ती क्रमिक इतिहास पुस्तकांतृन आमच्या मुलांना  पढवायची! आडदांड लोकांची संगत धरुन देशात पुंडाई आरंभणाऱ्याला जा स्वराज्य स्थापन करता येते, तर आज गावा गावचे गुंड राष्ट्रवीर का बनत नाहीत? या सर्व दोषामुळे आमज्या जुन्या बखरी आणि मध्याचे इतिहास ग्रंथ शिवाजीच्या जग मान्यतेच्या कामी नालायक ठरलेली आहेत. आमच्या लाडवया हिरो बद्दल कोणी वाईट बोला तर त्याच्या विधानाला समर्थक प्रत्युत्तर देण्या ऐवजी आम्ही नुसत्या शिव्या श्रापांवरच आमच्या इतिहास विषयक प्राविण्यांचे प्रदर्शन करतो. नाहीतर आमचा हिरो ईश्वरावतारच असल्यामुळे त्याच्या सर्व बऱ्या वाईट कृत्यांना पुराणांच्या पोतड्यातील राम कृष्णाच्या तत्सम कृत्यांचा पाठ पुरावा दाखवून, 'या देवाच्या लीला, माणसांना कसच्या कळणार!' म्हणून शेरा ठोकून स्वस्थ बसतो. शिवाजीला कोणी दगलबाज म्हटले की आमच्या नाकारा शेंडा फुरफुरू लागतो. पण शिवाजी दगलबाज कसा नव्हे? का असू नये? तो याचा मात्र विवेक शुद्ध विचार आम्हाला कधी सुचायचा नाही. रूढ पौराणिकी मताची पर्वा न करता हा विचार खुला ठेवा आज चर्चेला घेतला आहे.

• शिवाजीवर अहिंदूचे आरोप :

शिवाजीवर अहिंदूचे आरोप तरी काय आहेत? याची यादी प्रथम घेऊ या शिवाजीचा पहिला आणि ठळक आरोप म्हणजे राजद्रोहाचा. त्याने विजापूरच्या आदिलशाही विरुद्ध म्हणे बंड उभारले. कोणत्या तरी प्रस्थापित राजसत्तेला मूठमाती देऊन तेथे नवीन सत्ता स्थापनाऱ्या कोणत्याही चक्रवर्तीचा आणि सम्राटाची या आरोपातून सुटका होणे शक्य नाही. इंग्रजांनी तरी मऱ्ह्याठी साप्राज्य घशात घालताना काय अशा मोठ्या हुतुतूच्या लढाया दिल्या, तर युद्धतील विजयाला निर्णय त्यांची या आरोपातून सुटका होती त्यांनी तर मऱ्ह्याठयांच्या घरात शकडो कटांची पोखरण घालून. आज याला फोड उद्या त्याला बनव, परवा तिसऱ्याला - चवथ्याच्या उरावर घाल. अशाच बालमेली केल्या ना! मग इंग्रजांनी मऱ्ह्याठ्यांचा राजद्रोह केला. अशी भाषा का पुढे येत नाही! तर आज हिंदुस्थानात इंग्रेजी राज्य जबरदस्त आहे. नवीन राज्ये कमविणारांवर राज़द्रोहाचा आरोप करणाऱ्या मतिमंद मूर्खाना इतके तरी लक्षात ठेवावे का नवीन देऊल बांधताना जुन्या देवळाला आमूलाग्र उलथून पडावेच लागते. ब्रिटीश रक्ताच्या बिटिशांनीच अमेरिकेतून ब्रिटीश सत्तेची उचल बांगडी करून नवीन संयुक्त अमेरिकन संस्थानांची स्थापना केली मग जॉर्ज वाँशिंग्टन हा सुद्धा मोठा दगलबाज राजद्रोही मानला पाहिजे.

नंबर २ -
शिवाजीने अफझुल खानाचा 'खून' केला. जणू काय अफझुल खान म्हणजे एखादा बावला किंवा श्रद्धानंदच!

नंबर ३ -
शिवाजी आग्र्याच्या बादशाही कैदेतून पळाला, म्हणून तो दगलबाज असले हे आरोप केवल बुद्धि भ्रष्टता अगर जातिवंत दुष्टावा यातूनच निर्माण होत असतात. राजद्रोह, दगलबाजी, विश्वासघात इत्यादी आरोप करणारे ही शहाणे स्वत:ची भूमिका तर विसरतातच, पण हे आरोप कोणी कोणावर कोठे? केव्हा? आणि का करावे? याचा विवेकी त्यांच्या गायी नसतो.

• इंग्रज म्हणजे न्यायाचा सागर :

मुसलमानांनी शिवाजी विरुद्ध हात बोटे चोळली तर त्यात काही तरी वाजवीपणा आहे कारण, शिवाजीने दक्षिणेतल्या मुसलमानी सत्तेच्या चांदताऱ्यालाच आचंद्रार्क अर्धचंद्र दिला! पण इंग्रज म्हणजे न्यायचा सागर आणि हिस्टोरिकल परस्पेक्टिवचा आगर! त्यांनी शिवाजी वर खुनाची आणि दगलबाजीची एवढी आग का पाखडावी? असा एक सुद्धा इंग्रज इतिहासकार आढळत नाही की जाने अफझुल खानाच्या वधाचा पराचा पारवा क्ररून शिवाजीवर शिव्यांची लाखोली वाहिलेली नाही. प्रतापगडव्या मुकाबल्यात्त अफझुल खानाने आपल्या प्रतिज्ञेच्या संकेता प्रमाणे शिवाजीचाच कोथळा काढला असता, तर त्या विषयी निस्मृहपणाची मिजास मारणाऱ्या इंग्रज इतिहासकारांनी काय उद्गार काढले असते, याची कल्पना सुद्धा बरीच मनोरंजक हाईंल. इंग्रज हा असा एक विलक्षण प्राणी आहे की त्याला इतरांच्या डोळ्यातील कुसल चटकन् दिसते, पण स्वत:च्या डोळ्यातील कुसल मात्र मुळीच दिसत नाही, न्याय बुद्धीची यांची घमेंड जग प्रसिद्धच आहे; परंतु त्यात एक मख्खी आहे. आप मतलंबातील इंग्रजी न्याय कधी पृथ्वी इतका फुगेल, तर कधी सूईच्या डोळ्यातून सफाईत निसटुन टाचणीच्या टोकावर तांडव नृत्य करील. शिवाजी एक वेळ राहू द्या; बालून चालून तो हिंदू पण नेपोलियन बोनापार्ट तर युरोपियनच नारे त्याच्या चारित्र्याचे सार काढताना विद्यमान सुप्रसिद्ध इतिहासकार एच. जी. वेल्स आपल्या 'औटलाइन्स ऑफ थी हिस्टरी आँफ धी वर्ल्ड' नामक महाग्रंथात काय अक्कल पाघळतात ती पहा.

It would be difficult to find a human being less likely to arouse affection. One reads in vain through the monstrous accumulatios of Napoleonic literature for a single record of self forgetfulness. Laughter is one great difference between men and lower animals, one method of our brotherhood, and there it no evidence that Nepoleon ever laughed. Nor can we imagine another of the most beautiful of human expressions upon the face of this satumine egotist, that expression of disinterested Interest that one sees in the face of an artist or artisan 'lost', as we say, in his work. Out of his portraits he looks at us with a thin scom upon his lips, the scom of the criminal who believes that he can certainly cheat such fools as we are, and With a certain uneasiness in his eyes. That uneasiness haunts all his portraits. Are we really convinced he is quite right? Are his Iaurels straight? He had a vast contempt for man in general and men in particular, a contempt that took him at last to St. Helena, that same contempt fills our jails with forgers, poisoners end the like victims of self-conceit. There are no proof that this unbrotherly, unhumorous egolist was ever sincerely loved by any human being. The Empress Josephine was unfaithful to him as he to her. His young Austrian wife would not accompany him to Elba. A certain polish countess followed him thither but not, it would seem, for love, but an account of the son she had home him. She wanted settlements. She stayed only two days with him. He had never even a dog to love him. He estranged most of his colleagues and fellow generals He had no familiar friend No one who knew him felt safe with him in his intimacy, his unflinching self. concentration must have been a terrible bore. His personal habits were unpleasant, the moodiness of bad health came early. True it is that is  solders, who save Iorarare melodramatic encounters saw nothing of his idolized their “Little Corporal" But It was not hurt they ldollzed. but a carefully fostered legend of an incredibly clever recklessly brave llttle man, a little pet of a man, who was devoted to France and them. - p.499

लोकशाहीची प्राण प्रतिष्ठा करण्यासाठी युरोपस्थ राजेशाहीला नेस्तनाबूद करणानऱ्या सवाई सिकंदर नेपोलियन चक्रवर्तीला विसाव्या शतकातलें हे इंग्रज इतिहास पंडित जर बाबू चष्मावाल्याच्या वर्गात ढकलतात, तर १८ व्या आणि १९ व्या शतकातल्या यांच्या व्यवसाय पूर्वजांनी शिवाजीला उनाड टप्पु दरोडेखोराच्या सदरात मार्क्स, तर त्यात काय नवल? तरी बरे की इतरांवर घाणरडे आरोप करणाऱ्या या आम्ल चिकित्सकांच्या ब्रिटन राष्ट्राच्या साम्राज्य वर्धनाच्या खटपटी अगदीच काही धुतल्या तांदळाच्या नव्हेत.

• विलायती व गावठी वकील :

शिवाजी वरिल खुनाच्या आरोपाचे खंडन करणारे विलायती व गावठी वकील पाहिले तर त्यांची नंदी बैलातच गणना करावी लागेल. यांचा डिफेन्स आणि निधान पाहिली तर रडू येण्या पेक्षा हसूच पार येते. काय म्हणे शिवाजीने आत्म संरक्षणासाठी वाघ नखाचा उपयाग केला. आणखी काय? तर प्रथम वार कोणी केला, यावरच वाद विवादाची धुमश्चाक्री आणि अफझुल खानाने ज्या अर्थी, त्या पक्षी, त्या अन्वये, शिवाजीला प्रथम बगलेत दाबून त्याच्या मस्तकावऱ प्रथम तलवार चालवून आगळीक केली, त्या अर्थी, त्या पक्षो, त्या अन्वये, शिवाजीने आत्म रक्षणार्थ वाघ नखे चालविल्यामुळे, खुनाचा आरोप सिद्ध होत नाही. बाबलाने रिवॉल्वर प्रथम झाडले, का शफी हिलाने झाडले, असल्याचे क्षुद्र वादावर विलायती व गावठीं वकिलाची भिस्त जणु काय, अफझुल खानाच्या खुना बद्दल फाजल खानाने फिर्याद दिली आहे. आदिलशहीध्या शिफारसीने इंग्रजी रोशन कोर्टात शिवाजी वर खटला चालू आहे आणि हे विलायती गावठी बॅरिस्टर शिवाजीच्या तर्फ ब्रिटिश इंडियन पिनल कोडातील कलमांवर आपल्या वकिंलाईची कसरत करीत आहेत! शिवाजी हा कोण, त्याचे ध्येय काय, कर्तव्य क्षेत्र कोणते, त्याच्या कृत्याची परिक्षा कोणत्या दृष्टिकोणाने केली पाहिजे, इत्यादि महत्वाच्या मुद्द्यांची आणि या वकिलांची फारकतच असल्यामुळे, त्यांनी साध्या संसऱ्याला लागू पडणाऱ्या नीती नियमाच्या कक्षेत या राष्ट्र संसऱ्याला ओढावे. यात त्यांच्या बुद्धिमंद्याशिवाय विशेष काहीही निष्पत्र होत नाही. राष्ट्र संसऱ्याना कर्तव्य कर्तव्याची जी बिकट त्रांगडी सोड़वावी लागतात. तो ते कोणत्या भूमिके वरून कशी सोडवितात याचे परोक्ष ज्ञान या लौकिकी नीतिवंतांना नसल्यामुळेच, ते 'जन्माला आलाहेला. कसा तरी जगून मेला' अशा साध्या सूध्या संसाऱ्याच्या भूमिके वरून शिवाजी सारख्या राष्ट्र संसाऱ्याला कर्मा कर्माचे परीक्षण करण्याच्या पोरकट फांद्यात पडतात. सतत पाच वर्ष युरोपियन महायुद्ध मर्दकीने खेळविणाऱ्या जर्मन कायझर वर खटला भरण्याच्या पाचकल वल्गना असल्याच क्षुद्र बुद्धीची अवलाद होय. ही क्षुद्र बुद्धीची उर्फ नीतीची चाड बालगणाऱ्यांनी खुशाल धंदेवाईक पुराणिक म्हणून मिरवावे, पण त्यांनी स्वराज्य संस्थापक राष्ट्र वीरांच्या चारित्र्याची चिकित्सा करू नये ते त्यांचे क्षेत्र नव्हे. तो त्यांचा अधिकार नव्हे.

• वाकड्या दारांत वाकडी मेढ :

वाकड्या दारांत वाकडी मेढ ठोकणारेच पुरुषोत्तम राष्ट्रवीर होऊ शकतात. ते साधु संतांचे आणि 'सत्य सदा बोलावे’ वाल्यांचे तोड नव्हे. साधू वृत्तीने आणि संसारी वृत्तीने राज्ये कमाविल्याचा दाखला इतिहासात नाही. राज्याची प्राण प्रतिष्ठा म्हणजे टाळकुट्या साधू संतांची भजन प्रतिष्ठा नव्हे. त्यातल्या त्यात गुलाम बनलेल्या देशाची मोहरलेली मनोवृत्ती चैतन्यपूर्ण करून परकीय सत्तेच्या मूद्या वरून स्वराज्याचा पाया उभारणारा वीर साधू वृत्तीचा असून भागतच नाही. असे आज पर्यंत कधी कोठ घडले नाही. पुढे कथी कोठे घडले नाही "एका गालावर कोणी चापड मारली तर लागलाच दुसरा गाल पुढे कर' या क्रिस्त धर्माज्ञेप्रमाणे युरोपस्थ क्रिस्तीजन अक्षरश: वागते, तर त्यांना हिंदुस्तानाचे साम्राज्य कधीच मटकावला आले नसते. महंमद गझनी पासून तो थेट बाबर हुमायून पर्यटचे लोक जत नुसते माळा ओढणारे आणि नमाज पडणारे मुल्ला मौलवी असते तर मोगल साम्राज्याची स्थापना होतीच ना त्याच प्रमाणे सत्य, नीति, वचन, इमान असल्या साधू वृत्तीच्या फाजील फंदात रजपूत जर निष्कारण गुरफटले असते, तर त्याचाही अधःपात इतक्या लवकर खास झाला नसता आणि शिवाजी ज़र दगलबाजांतला दगलबाज, लुच्चांतला लुच्चा. खटांतला सवाई खट आणि उद्धाटांतला दिढी दुपटी उद्धट नसता तर त्पाला ही मऱ्हाठी स्वराज्य या जन्मांत स्थापन करता आले नसते.

•  सतीच्या घरी बत्ती :

नेहमीचा व्यवहार पाहिला तरी सतीच्या घरी बत्ती आणि वेश्येच्या घरी झुले हत्ती, हाच प्रकार चालू असतो. सत्य, न्याय, समता, प्रामाणिक पणा इत्यादी तत्वे पुराणांसाठीच जन्माला आलेली आहेत. लिहिण्या बोलण्यात त्यांची फोडणी फार खमंग लागते. एखाद्या गोमाजीच्या चारित्र्यावर थोरपणाची सफेदी चढवून, त्याच्या चरित्राचे ग्रंथ 'विक्रीला लायक' ठरविंण्याच्या कामी, ही तत्वे लेखक बखरकारांना जाई लेखणी इतकीच उपयुक्त असतात. परंतु, प्रत्यक्ष व्यवहारात या तत्वांनी आजवर एका ही मनुष्याचा भाग्योदय केल्याचे उदाहरण आढळणार नाही. अमक्या तमक्याने म्हणे ५ दिंडक्यावर भाजी विकण्याचा धंदा आरंभून १५ वर्षात तो लक्षाधीश झाला फलाण्याने डोक्यावर टोप्याचे शिप्तर घेऊन टोप्या विकता विकता, अमुक वर्षात फेरीवाल्याचा म्हणे कोट्याधीश झाला! गोम्या सोम्या म्हणे ररत्यावर खडीच्या पाठ्या वाहात होता, तो आज हिंदुस्थानातल्या सगळ्या रेल्वेचा कंट्राक्टर होय. रोल्स राँईंस शिवाय पाऊल बाहेर टाकीत नाही! दहा वर्षांपूर्वी हातात एक फुटका लोटा घेऊन नागडा उघडा भटकत आलेला मारवाडी म्हणे मोडतोड तांबा पितळवर आज अब्जाधीश बनला! आणि आणि लोकांना दाखवायचे भासवायचे काय? तर हे सगळे 'नरमणि सत्यं वद, धर्मचर' इत्यादि गुणांच्या भांडवलावर बडे भांडणलवाले बनले! हे सारे वस्त्रगाळ नीतिमत्तेचे पुतले. पाप म्हणून यांच्या गावी नाहीच. व्यवहाराच्या खाच खळग्यांवर जाताना ना कधी यांचा पाय पापाच्या पिसावर पडला, ना कधी घातपाताच्या वळणावर अडला. यांनी प्रत्येक कर्म देवा धर्माची जाणीव ठेवून केलेले. यांचे इमान? आहा! ते काय विचारावे? सगळे हरिश्चंद्राचे अवतारों स्वप्नात दिलेली वचने सुद्धा जागे झाल्यावर फडशा पाडणारे! पापभीरूत्वाच्या काचेच्या सील बंद बरणीतल्या या साऱ्या धर्मवीर सत्यवान्, नितिवान, शीलवान कापट्या! बिचाऱ्यांना पापाची नुसती झुळूक सुद्धा कधी चाटून गेलेली नसायची. किटसन दिव्याची मॅन्टलेच ही! आरपार उभा आडवा, खाली वर उजेडच उजेड आणि तेजच तेज.

वाचक हो, 
असल्या गप्पा लुच्च्या गप्पीष्ठांनी माराव्या, पोटभरू किंवा रिकामं टेकड्या लेखकांनी लिहून प्रसार कराव्या आणि बावळट श्रोत्या वाचकांनी नंदी बैला प्रमाणे माना हालवून मान्य कराव्या, यापेक्षा त्यात विशेष काहीच नसते. कोण गोमाजी द्रव्य प्राप्तीच्या शर्यंतीत काय काय लपंडावानी भरारतो, याचा तपशील पुष्कळांना अवगत असतो. परंतु व्यवहाराची मायाच अशी मायावी आहे की, त्या तपशिलांचा उच्चार कोणी फारसे करीतच नाही. त्यात पुन्हा त्या गोम्या सोप्याला लक्ष्मी प्रसन्न झालेली! मग काय, सर्व गुणा: कांचनमात्रयन्ते. अर्थात संपतीच्या झगझगटाखाली दडलेला पापांचा आणि घातपातांचा भगभगाट उकरण्याच्या आव्यापारेषू पडण्याची लोक सहसा तसदी देत नाहीत. वकिलांचे वाडे विद्वत्तेच्या विजयावर वसले जातात काय? स्मृती ग्रंथांत वकिलांच्या वृत्ती विषयी घातलेले नीति निर्बंध जा अक्षरश: पाळले जाते आणि विद्यमान संस्कारांनी ठरविलेल्या वकिली फीच्या कोष्टकातच जर त्यांचे द्रव्य प्राप्तीचे प्रमाण मर्यादित राहते, तर बाराबंदी बंडी, मांडपंचा आणि गांधी टोपी पलीकडे एका ही वकिलांचे ऐश्वर्य फुगले नसते. नोकरी चाकरी किंवा अथोंत्पादनाचा कसला ही लौकिकी धंदा न करता, फक्त 'देशभक्त’ म्हणून व्याख्यान बाजी आणि लेंखन बाजी करीत जगणाऱ्या अनेक ब्राह्मण लोकांनी ठिक ठिकाणी मोठे मोठे वाडे बांधले आहेत, आणि सावकाऱ्याही सुरू केल्या आहेत, त्या काय साऱ्या 'वंदे मातरम्' राष्ट्रगीत पारायणाच्या तात्कालीक फल श्रुत्याच मानायच्या की काय? अंगावर खादीच्या चिंध्या पांधरून देशासाठी भिक्षा मागत गावोगाव व खेडोपाडी भटकणाऱ्या संभावित भिक्षुकांच्या सौभाग्य वती गोटपाटल्यांत चमकताना दिसतात, त्या काय खादीच्या आडव्या उष्ण ताण्याच्या तणावावर की काय? लिमिटेड कंपन्यांची आणि देशी बैकांची दिवाली वाजवून, कफ़ल्लक अवस्थेत नादारीची सनद पटकविणाच्या 'थोर’ माणसांच्या नशिबी नादारोत्तर काळी सुद्धा मोटारी, जंगले, शेत वाड्याचे ऐश्वर्य तसेच चिकटून राहिलेले आढळल्यास, तो देखील नीतिमत्तेचा एक श्रुती स्मृती पुराणोक्त दिग्विजय मानायचा की काय? निति नियमाची पुराण आणि लौकिकी व्यवहारांची गुप्त अर्धगुप्त वा उघडगुप्त धोरणे, यांचा समन्वय लावण्याचे काम म्हणजे या जगातला एक ब्रह्म घोटाळाच होय!

तात्पर्य, लौकिक व्यवहार जसा दिसतो तसा वास्तविक मुळीच नसतो, म्हणूनच बावलट माणूस बोलता बोलता सपशेल फसतो. जीवो जीवस्य जीवनम्. मोठ्या माशाने धाकट्या मासोळीला मटकावून जगावे. ज्ञान्यांनी अज्ञान्यांची घरेदारे लुटुन आपले वाडे शुंगारावे. जबरदस्तांनी कमवितांना जिंकून दास बनवावे. सत्य, न्याय, प्रेम, अहिंसेची कास बळकट धरणाऱ्या नामर्द षंढांना युक्तिबाज़, दगलबाज बाजीरावांनी हसत हसत चिरडून जमीनदोस्त करावे. ज्याव्या हाती शिकार त्याने पारधी म्हणून मिरवावे. हाच जेथे सृष्टीत चाललेल्या 'जगण्याच्या धडपडी' चा आत्माराम, तेथे एका चोराने दुसऱ्या चोरावर दगलबाजीचा आरोप करावा. ही तरी दगलबाजीच नव्हे काय?

• दगलबाज नाही कोण? :

दुनियाच जेथे जातीवंत दगलबाज, तेथे दगलबाजी शिवाय जगणारे प्राणी म्हणजे षंढ, हिजडे, नामर्द, विद्वान आणि गुलाम हेच होत. या लोकांशिवाय, नेटका प्रपंच करून मरण्यापूर्वी वेळ सापडलाच तर परमार्थ विवेकाचा फेरफटका करणारे छोटे दगलबाज संसारी, रोज़च्या संसारतल्या जगण्याच्या धडपडीत जे जे उत्पात करतात, त्यांचा विचार केला म्हणजे उलट्या काळजाच्या रंडीबाज (वारंगणेव) राजकारणातल्या बड्या दगलबाज दिग्गजांच्या उत्पातांचे प्रमाण सहज कळून येईल. साध्या सुध्या संसारांत एकमेकांच्या मुंड्या मूरगाळल्या शिवाय जर संसाऱ्यांना ज़गताच येत नाही; कापड मोजताना गजाला आणि माल तोलताना तराजूला हिसका दिल्या शिवाय जर आमच्या व्यापारातला अपमृत्यू टळत नाही; आणि खऱ्या खोट्याची भेसळ केल्या शिवाय न्याय देवतेने दिलेली न्यायाची कांजी पिण्याची जर मनुष्याच्या जिभला सवयच नाही; तर कोट्यवधी लोकांच्या संसाराच्या बरे वाईटपणाचा जिम्मा घेणाऱ्या राजकारणी संसाराच्या नायकाला शक्ती युक्ती बुद्धीची ठेवण कसल्या मनोवृत्तीच्या साच्यातुन ओतून काढणे अगत्याचे असते, याची कल्पनाच करावी.

जित जेतृत्वाची घडामोड घडविणारे राजकारण हेच मुळी जेथे हरामखोरीच्या सट्टेबाजीचे क्षेत्र, त्या क्षेत्रात स्वदेशाच्या भवितव्यतेचे खेळ मिळणाऱ्या खेळाडूंनी, इंद्र धनुष्याला ही चक्कर येईल असा भरमसाट चित्र विचित्र रंगांत, हरामखोरीचा आणि दगलबाजीची जुच्चेबाज रंगपंचमी खेळू नये, तर काय "सत्य बद धर्मंचर' वाल्या बेदर्द गोसावड्याप्रमाणे राखेच्या ढिगाराची फाल्गुनी पौर्णिमा करावी? ज़गात आज पर्यत अशी एक ही राज्यसत्ता झालेली दाखविता येणार नाही कि जिचा पाया दगलबाजीवर उभारलेला नाही. सत्यव्रताची आणि न्यायाची मिजासच मारायची, तर एका राष्ट्राने दुसऱ्या राष्टाला, गोऱ्या लोकांनी काळ्या लोकांना, आणि पाश्चिमात्य लोकांनी पौर्वात्य लोकांना हव्या त्या उपायांनी जिकून गुलाम करायचे, हा तरी कोठल्या गावचा न्याय? माणसांनी माणसांना ठेचून त्यांच्या गुलामगिरी कर स्वत:च्या जेतृत्वाची शेखी मिरविणे, हीच मुळी सृष्टीच्या नियमांची जेथे धडधडीत पायमल्ली, तेथे त्याच गुलामगिरीचे लोण सफाईत परतविण्यासाठी कोणी काट्यानेच काटा काढला, तर त्यात दगलबाजी ती कसली? जगाची रहाटीच जर उलट्या पाऊलांनी चालत आहे तर सुलटे चालण्यात शहाणपणा कोणता?

• करत्याची करणी आणि मारत्याची तलवार :

"करत्याची करणी आणि मारत्याची तलवार" हीच जगाते जगण्याच्या धडपडीची गुरुकिल्ली आहे. याच गुरुकिल्लीने शिवाजीने महाराष्ट्राच्या नशिबाला चिकटलेली इस्लामी गुलामगिरी उदृध्वस्त करून, आपल्या मातृभूमीला हिंदवी स्वराज्याच स्वातंत्र्य दिले. यात चुकलें कुठे? दगलबाजी ती कसली? अत्याचार कसले? खून तरी कसले? आणि विश्वास घात तरी कोठे घुसले? खटास खट भेटे, तेव्हाच मनीचा संशय फिटे. हिंदू लोक आचंद्रार्क मुसलमानी सत्तेचे गुलाम राहणार काय? शिवाजीच्या या प्रश्नाला तत्कालीन प्रस्थापित राज्यसत्तेने 'होय होय होय' अशा मगरूरीच्या प्रतिध्वनीने उत्तर दिले. त्यावर 'कल्पांत करीन, पण ही मगरूरी टिकृ देणार नाही. हिंदू स्वतंत्र झालाच पाहिजे.' अशी शिवाजाने धडाडीची उलट सलामी दिला. हिंदु स्थान आणि त्यावर राज्य सता म्हणे मुसलमानांची! या दगलबाज परिस्थितीचा नायनाट करण्यासाठी शिवाजीला सवाई दिढी दुपटी दगलबाज़ बनल्या शिवाय गत्यंतरच नव्हते. प्रस्थापित मुसलमानी राज्यसत्तेचा विध्वंस हीच ज्याने आपल्या कर्तव्याची दिशा ठरवली, ज्या कर्तव्यांत त्यान आपल्या वैयक्तिक स्वार्थाचा आमूलाग्र संन्यास केला आणि ज्या कर्तव्य सिद्धांवर कोट्यवधी जीवांचा ऐहिक मोक्ष अवलंबून होता, त्या कर्तव्यासाठी त्या गुलामगिरीचा कंठ काडकन् फोडताना, अफझुल खानच काय, पण शिके, मोरे, जाधवासारख स्वजातीय कंटक आडवे येताच, त्यांचेही खून पाडण शिवाजीच्या राष्ट्रधर्माला आणि राज़कारणी नात्याला मुळीच विसंगत नव्हते. फार काय, पण विजापूरातून अफ़झुल खान आला, त्याच प्रातिष्ठेने व तयारीने शिवाजी; प्रत्यक्ष बाप शहाजी जरी आला आता, तरी हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या महत्कर्तव्यासाठी शिवाजीने त्याचा ही कोथळा फोडून, आपल्या हाताने आपल्या मातोश्रीच्या कपाळाचे कुंकू पुसायला कमी केल नसते. राष्ट्रोद्धाराच्या पवित्र कर्तव्य क्षेत्रात ध्येयाच्या सिद्धीसाठी "आडवा आला कि काप" हाच जेथे नातीचा दण्डक आहे, तेथे 'मातृदेवो भव, पितृदेवो भव' या संसारा लोकांच्या आंबट वरणी नीताचे नियम काय होत?

• दगलबाजी शिवाय राज्यसत्ता नाही :

दगलबाजी शिवाय राज्यसत्ता नाही आणि उलट्या काळजाशिवाय राजकारण नाहीं स्वराज्य स्थापनेसाठी आणि परदेश र्जिकून साम्राज्य वृद्धी करण्यासाठी आज पर्यत दगलबाज्या केल्या नाहीत कोणी? सर्वानी केल्या. कोणीही नाकाला जीभ लावण्याचा खटाटोप करू नये. स्वतंत्र अमेरिकन संस्थानांची प्राण प्रतिष्ठा; बिटीश रक्ताच्या लोकांनी ब्रिटीश सत्तेला उलथूनच केली ना? कोठे गेला तो रक्ताचा जिव्हाळा त्या वेळी? हे आर्यानी जसा अनार्याचा बीमोड करून हिंदुस्थानात तंगड्या पसरल्या, तद्वत् याच अमेरिकन वसाहत वाल्यांनी रेड इंडियनांच्या कत्तली व विध्वंस केला, तो शुद्ध युनिव्हर्सल ब्रदर हुड (विश्व बंधुत्व) च्याच भावनेने काय? मुसलमानांनी' सत्तामदाच्या धुंदीत हिंदूंवर केलेल्या अत्याचारांचे बीच तिखट मिठाचे वर्णन आपण बखरी; नाटके, कादंबऱ्यांतून वाचतो. परंतु गोर्तगीज, डच, इंग्रेज, फ्रेंच या ख्रिस्ती राष्ट्राच्या अरेरावींनी हिंदुस्थानात केलेल्या अत्याचारांपुढे ने क:पदार्थ ठरेल. पोर्तुगीजांचा प्रपितामह "वास्को द गामा' याने आपल्या दुसऱ्या सफरीत झामोरीच्या वतीने स्वागत देण्यास आलेल्या ब्राह्मण वकिलाचे कान कापून तेथे कुत्र्याला कान शिवले. आपल्या पोर्तुगीज राष्टाचा दरारा दाखविण्यासाठी बेसावध कालीकट बंदरावर तोफांचा भडीमार केला. बंदरांतील जहाजे लुटून, त्यांच्या ८०० नावाड्यांचे नाक - कान कापले, सोट्यांनी दात पाडले. तोडलेंले सर्व अवयव ताटात भरून त्या ब्राह्मण वकीला बरोबर 'याची भाजी करून खा' या निरोंपा सह झामोरीनकडे पाठविले. शिवाजीने अशा प्रकारची राक्षसी कृत्ये कधी कोठे केलेली असल्यास त्याच्या र्निदकांनी खुशाल पुरावे पुढे आणावे. आल्फान्सो अल्बुकर्कने तिमय्या गरसप्पा नावाच्या देशद्रोही हिंदू राजाच्या मदतीने गोवा काबीज केल्यावर, आपल्या सत्तेचा वचन दाखविण्यासाठी तेथल्या मुसलमान राहिवाशींची व निरपराधी बायका मुलांची सर्रास कत्तल करून दिल्लीच्या नादार शहालाही लाज आणली. खिश्चन धर्माच्या प्रसारार्य उरल्या सुरल्या अनाथ मुसलमान विधवांची पोर्तुगीज पुरुषांबरोबर बळजबरीची लग्ने ठोकून, गोव्यातील लोक विश्रुत हाफ कास्ट पोर्तुगीज प्रजा निर्माण केली. वेढ्यात सापडलेल्या किंवा लढाईंत जिंकलेल्या वृद्ध, मुले व स्रियांबद्दल शिवाजीचा दयावंत दण्डक मशहूरच आहे. हिंदु देवळांच्या विध्वंसनासाठी नोरोन्हाने केलेली साष्टीतली कत्तल ख्रिस्ती धर्माच्या व येशू खिस्ताच्या "प्रेम पूर्णत्वाला" कशी काय साजली शोभली, हे ख्रिस्ती धर्म मार्तडांनीच सांगावे.

• म्युझिक बिफोर माॅस्क :

मुसलमानांच्या मशिदीबद्दल शिवाजीने हेच खिस्ती धोरण ठेवले असते, तरच म्युझिक बिफोर माॅस्क मशिदी पुढे वाद्याचा प्रश्न आज निधात्यच नसता. पण शिवाजी म्हणजे हिंदु धर्माचा मूर्तिमंत मोहरा! पवित्र कुराण हाती पडताच तो त्याची पालखीत वाजत गाजत सम्मानपूर्वक परतवणी करीत असे. दक्षिणेतील कित्येक मशिदीना शिवाजीने दिलेली वर्षासने आज ही चालू आहेत. दुसरे पोर्तुगीज अरेराव म्हणजे आजविडो साहेब. "हिदुस्थानात त्याने केलेला दुष्टपणा अतर्क्स आहे. सिलोणातील जग प्राप्तीत त्याने आर्य कडून त्यांची मुले जात्यात घालून दळली, शिपायांकडून काही मुले भाल्याचे टोकांवर नाचवून, त्यांचे हाल पाहून तो आनंद मानी" धर्म प्रसारासाठी साधूचे पेहराव केलेल्या खिश्चन हरामखोरांचौ राजकारणी कृष्ण कृत्ये आम्ही पामर हिंदूने काय वर्णन करावी? युरोपियन संस्कृतीच्या व खिश्चन धर्माच्या तोडाला आचंद्रार्क कालीमा फासणाऱ्या इंक्विझिशनचे अत्याचार खिस्ती धर्मं व सत्ता प्रसारक अरेरावांनी हिंदी लोकांवर हीँ गाजविण्यास कमी केलेले नाही. डच लोकांनी आंबोचना येथे इंग्रज लोकांची केलेली कत्तल आणि टॉवरसन, बोमन्ट, जॉनसन, जॉन क्लार्क प्रभृतीवर केलेले पाशवी अत्याचार वाचले, तर दगडाला हि पाझर फुटेल. पलित्याने सर्वागाला डागण्या देणे, उलटे टांगणे, पायास, हातास, कोपरावर, खाकेत मेणबत्याचे चटके देऊन मांस बाहेर काढणे, त्या जखमा धुवायच्या नाहीत, औषध पाणी करायचे नाही, मग त्यात किडे पडून दुगंधी सुटायची व किडे सर्व शरीरावर वळवळत फिरायचे असत्य. "आंबोचना" अत्याचारांची इंग्रजांची आठवण कशाने बुजणार?

• दगडापेक्षा वीट मऊ :

पोर्तुगीज आणि डचांपेक्षा फ्रेंच आणि इंग्रज विशेष शहाणे. यांनी ही अत्याचार केले नाहीत, असे नाही. पण डावपेचाच्या दगलबाजी वर यांचा भर विशेष. शारीरिक अत्याचारांपेक्षा बौद्धिक अत्याचारावर त्यांची गोल फार. रॉबर्ट क्लाईंव्हने वाँटसन साहेबाची छोटी सही करून उमीचंदाला तर धडघडीत बनावट दस्तऐवजाने फसविले. वाँरन हेस्टिंग्जने अयोध्येच्या बेगमांचा केलेला छळ व इतर अत्याचार तर जग प्रसिद्धच आहेत.

• तू नाही तर तुझा बाप :

लॉर्ड डलहौसीने कलमांच्या फटकाऱ्याने आणि तू नाही तर तुझा बाप अशा सबबीवर मोठमोठी देशी राज्ये भराभर ब्रिटीश सत्तेच्या पचनी पडली. ५७ च्या बंडातल्या हिंदी लोकांवरील इंग्रजी अत्याचारांनी पोर्तुगीज डंचांच्या आठवणीला ही मागे सारलें. परवाची जालियनवाला जागेची कत्तल म्हणजे आंबोयनाचीच प्रतिमा नव्हे काय? या सर्व अत्याचारांव्या कृत्यघ्नते पुढे आणि क्रोर्या पुढे शिवाजीने केलेला अफझूल खानचा वध म्हणजे ढेकूण चिरडण्या इतकाच क्षुद्र ठरेल. शिवाजी वर किंवा सर्रास हिंदू नृपतीवर दगलबाजीचे आरोप करणाऱ्या इंग्रजी इतिहासकारांना रॉबर्ट क्लाईंव्ह, वॉरन हेस्टिंग्ज, लॉर्ड डलहौसी इत्यादि अनेक राजकारणी महापुरुषांची कारस्थाने साजरी गोजरी वाटण्याचे आम्हाला तरी एवढेच कारण दिसते की. त्यांनी 'दगलबाजी' या उर्दू - मराठा शब्दाला 'डिप्लोमसी' हा एक गोडस इंग्रजी शब्द प्रचारात आणलेला आहे. त्याच्या पोटात स्वर्ग - नारकासह सारे विश्व पचनी पडले तरी त्याला अजीर्ण म्हणून कथी व्हायचेच नाही.

• डिप्लोमसी ऊर्फ दगलबाजी :

"डिप्लोमसी ऊर्फ दगलबाजी" ही राज्यक्रांतीची जीवर्माविता आहे. हिच्या उपासनेने स्वराष्ट्राच्या भाग्य सिंधुला अपरंपार भरती आणणाऱ्या सर्व डिप्लोमॅटांची क्षुद्र लौकिकी नीतीच्या चव्हाट्या वर चिकित्सा करणे चिकित्साकांच्या क्षुद्र मनाचे द्योतक होय. डिप्लोमॅट ऊर्फ राजकारणी दगलबाजांना संसारी नीतीच्या दण्डका खाली खेचले, तर पृथ्वीवरील कोणत्याही चक्रवर्ती नृपतीच्या आणि लोकशाहीब्रुव राज्यसत्तेच्या तोंडाला फसायला काळ्या शिवाय दुसरा रंगच उरणार नाहीं अर्थात स्वराज्य संस्थापक आणि साम्राज्य प्रसारक राष्ट्रवीरांच्या चारित्र्याकडे पाहण्याची ही दृष्टीच चुकीची आहे.

• ही दृष्टीच चुकीची आहे :

स्वदेशाच्या सौभाग्याचे आणि स्वातंत्र्याचे अत्युच्च आणि व्यापक ध्येय साधण्या पलीकडे राष्टवीरांना स्वत:चा स्वार्थ असा काहीच नसतो. स्वार्थाचा संन्यास करून कोट्यवधी स्वदेश बांधवांच्या हितासाठी झगडताना, त्यांच्या हातून घडतील त्या बऱ्या वाईट कृत्यांचा परीक्षा संकुचित अशा संसारा नीतीच्या दुर्बिणीतून करणे, सपशेल चुकीचे आहे. पुष्कल वेळा राष्ट्र सेवेच्या व्यापक ध्येयासाठी झगडणाऱ्या जातीवंत क्षुद्राकडून अमानुष कृत्य घडतात, नाही असे नाहीं म्हणून काय या साऱ्या स्वराज्य व स्वधर्म सेवकांना क्षुद्र लेखायचे? हे अत्याचार त्यांनी काय स्वार्थासाठी केले? स्वार्थच मानायचा तर तो इतका महासागरासारखा आहे की, त्यांत त्यांच्या दोषांचे प्रमाण म्हणजे :दर्या में खसखसा' कोणत्याही राज्यसत्तेच्या पायातले दगड, धोंडे, माती उकरून पहा, स्थान खुन, रक्तपात, अत्याचार, विश्वास घात याशिवाय दुसरे काहीच आढळणार नाही. परराज्यांच्या मुंडक्या मुरगाळण्या शिवाय स्वराज्याची मान ताठ बसत नाही, परक्यांच्या घरादारांच्या होळ्या केल्याशिवाय आपल्या राजसत्तेच्या माहात्म्याची दिवाली साजरी होत नाही. 'बळी तो कान पिळी' कम दगलबाज ऊर्फ बेअक्कल लोकांनी सवाई सोट्या दगलबाज लोकांच्या सत्तेखाली निमूटपणे चेचले जावे, हा निसर्गाचा दण्डकच आहे. तात्पर्य, दगलबाजी हा यच्यावत सर्व राज्य संस्थापकांचा मुख्य सदगुण आहे. हा सदगुण त्यांच्या अंगी विशेष तेच पुरुषोत्तम प्रत्येक देशाव्या नवमनव्यंतराचे शक कर्ते म्हणून इतिहासात चिरंजीव होऊन बसले आहेत. विश्वास घात, बेईमान, खून, अत्याचार, जालपोळ इत्यादि गोष्टी पौराणिकी ग्रंथाच्या किंवा शाब्दिक वादाच्या क्षेत्रात अत्यंत अमानुष मानलेल्या असल्या, की राजकारणी क्षेत्रात त्यांची सद्गुणांतच गणना होत असते.

• शांतीसाठी महायुद्ध :

शांतीसाठी महायुद्ध ही शब्द योजना तरी किती परस्पर विरोधी? रक्तपात टाळावे म्हणून रक्तपात. चोऱ्या बंद व्हाव्यात म्हणून घरादारांवर दरोडे. राजावर प्रेम करावयास शिकवण्यासाठी राजद्रोहाच्या खटल्याची सत्रे. ही वाक्य सकृद्दर्शनी नागव्या विरोधाभासाची दिसतात, पण त्यातच वास्तविक राजकारणी दगलबाजीच्या सद्गुणांचे खरे बीज आहे. नदीच्या मुळाप्रमाणे आणि ऋषीच्या कुळाप्रमाणे कोणत्याही राजसत्तेचे मूळ शोधण्यात अर्थ नाही. या मुळात कसकसली खते पडलेली असतात, त्याचे पृथ:करण भल्याने करू नये. म्हणूनच राजकारणपटु आंग्ल मुत्सद्दी एडमंड बर्क याने 'सर्व राजसत्तांच्या उगमांवर पावित्र्याचा पडदा सोडून देणेच श्रेयस्कर आहे' असा इशारा दिलेंला आहे.

राजकारणात किती ही घातपात आणि दगलबाजी असली, तरी अखेर ते विजयी व्हावे लागते. ते विजयी झाले तरच त्या दगलबाजीवर आणि घातपातावर पडदा पडतो. इज्जत 'एक सूत्र आहे :- 'One murder makes a villain, thousands a warrior' एक खून केला की माणूस खुनी ठरतो, आणि त्याने हजार खून पाडले की तो विर योद्धा म्हणून गणला जातो. या छोट्या सूत्रांत बडा वेदान्त आहे. स्वदेशाच्या स्वातंत्र्यांसाठी राजकारणी दगलबाजीने झगडणाऱ्याला यशापयशाची पर्वा नसली, तरी त्याची केव्हाही हमी देता येत नाही. बोलून चालून ती सट्टेबाजी. "सरळ पडे दान, त्याची जगात ताठ मान, दान पडे वाकडे, त्याच्या जिवावर साकडे" यंग टर्की नावाची एक पार्टी काढून राजक्रांती करू पाहणारा केमाल पाशा सुरुवातीला "अपस्टॉर्ट अनार्किस्ट' उपटशुभ बंडवाला म्हणूनच मानला गेला होताना! पण त्याच्या सिकंदर नशिबाने त्याच्या तलवारीला सरळ दान देताच, आज त्याचा महिमा केवढा वाढला तो पहा आणि वाकडे दान पडलेल्या रिफांचा पुढारी अब्दुल करीम याची काय अवस्था झाली ती पहा. दोघांचे उद्देश एकच. दोघे ही मर्द लढवय्ये. दोघे ही पट्टीचे राजकारणी दगलबाज. पण यशापयशाच्या चढत्या पडत्या झोल्यात एक 'जवानमर्द मुस्तफा' बनला आणि दूसरा बाबू चष्मेवाल्याच्या सदरात पडला! शक्या मोठा शक कर्ता चक्रवर्ती नेपोलियन, साऱ्या युरोपातले राजेशाहींचे मुकुट टाचे खाली चिरडणारा लोकशाहीचा प्रणेता पण अखेर स्वदेश द्रोह्याच्या कारस्थानामुळे वाटरलूच्या समरांगणावर त्याचे हुकमी दान हुकताच इंग्रज जैत्यानी त्याची कशा काय विल्हेवाट लावली? इंग्रजी राजनीतिचे खरे स्वरूप या एकाच गोष्टीवरून फार स्वच्छ कळून येते. हिंदूंची राजनीति पडत्या प्रतिस्पर्धेचा सम्मान राखते, तर प्रतिस्पर्धी पराभूत होताच आंग्ल राजनीति त्याला रसातळाला नेते. भारतीय महायुद्ध संपल्यावर विजयी पांडवांनी धारातीर्थी पतन पावलेत्या कौरवांना श्रद्धापूर्वक तिलांलली व पिंडदान केले. इंग्रजांच्या सांस्कृतिक इतिहासात श्रद्धेची ही भावनाच नसल्यामुळे, ते कधी आपल्या पराभूत प्रतिस्पर्धेला पिंडदान तर करणार नाहींतच, पण दुसरा कोणी ते करील तर तेहीँ त्यांच्या प्रवृत्तीला परवडत नाही. नेपोलियन, जोन आँफ़ आर्क, शिवाजी वगैरे थोर थोर राष्ट्रवीर वीरांबद्दल आंग्ले इतिहासकार जे इतक्या क्षुद्रतेचे आणि उपहासाचे उद्गार काढतात, त्याचे मूळ या त्यांच्या आनुवंशिक संस्कृतीत आहे. आजला प्रत्येक देशी संस्थानाकडे क्षुद्रतेच्या दृष्टीने पाहण्याची जी एक प्रवृत्ती खुद्द हिंदू लोकांतच फैलावली आहे, ती सुद्धा या इंग्रेजी आनुवंशिक संस्कृतीच्या शाबरी संसर्गाचाच परिणाम होय.

• शिवाजी विजयी दगलबाज होता :

आयलंडच्या भवितव्यतेत क्रांती घडविणारा डि. व्हेंलैरा आणि इटलीच्या भाग्याची घटना करणारा मुसोलिनी यांच्या विषयी नित्य बाहेर पडणारे आंग्लोद्गार विचारात घेतल्यास परोत्कर्ष सहिष्णुता आणि इंग्रजी मनोवृत्ती यांची छतिशी स्पष्ट सिद्ध होते. या छतिशीत शिवाजी दगलबाज ठरला तर त्यात ही त्या राष्ट्रवीराचा सन्मानच होत आहे, कारण शिवाजी विजयी दगलबाज होता. हिंदुस्तानात एक वेळ दगलबाज आर्यानी कम दगलबाज अनार्याना पादाक्रांत केले. त्यानंतर हिंदू राज्यकत्यांची दाणादाण उडवुन मागलांनी आपली दगलबाजी वरचद ठरविली. पोर्तुगीज, फ्रेंच, डच व इंग्रज यांमध्ये ही परस्पर दगलबाजीच्या शर्यती लागून, त्यात अखेर इंग्रेजाचा घोडा पहिला आला.

• मऱ्हाठी दिढी दुपटी दगलबाज :

काही वर्ष दख्खनच्या मुसलमान शाह्या 'आम्ही पट्टीचे दगलबाज़' म्हणुन महाराष्ट्र भर आपल्या सत्तेचा धुमाकूळ घालीत होत्या. शिवाजीने बोल बोलता ल्या सत्तेला उदध्वस्त करून खुद दिल्लीच्या काळजाला हात घातला आणि मुसलमानांपेक्षा आम्ही मऱ्हाठी दिढी दुपटी दगलबाज आहोत, याची जाहीर नौबद रायगडावरून ठोकली. पुढे मऱ्हाठशाही दगलबाजीचा धैशा पेशव्यांनी थेट अटकेला नेऊन भिडविला.

• इंग्रज म्हणजे दगलबाजाग्रणी :

अखेर इंग्रेजांच्या मार्जार तपश्चयेंवर नियती देवीची बहाल मर्जी झाली. त्यांनी मऱ्हाठे, मोगल, शिख, राजपूत इत्यादि सर्व दगलबाजांना आपल्या तंत्र शक्तीने चीत करून ब्रिटीश सत्तेच्या बिनमुखी स्थापनेने, चालू युगात इंग्रज म्हणजे दगलबाजाग्रणी ऊर्फ मास्टर डिप्लोमॅटस हा सिद्धांत बिनतोड प्रस्थापित केला. आज इंग्रेजाच्या दगलबाजीला जोड नाही आणि तोड ही नाही. आज तिला अवघे त्रिभुवन थोडके पडले आहे. सर्व ज़गातले राजकारण आज इंग्रेजी दगलबाजीच्या पाणपोयी वरच आपल्या उलट सुलट पेचांचे पाणी पीत असते. या पाण्याला पाणी पाजण्याचे पाणी आज कोणत्याही नसल्यामुळे इंग्रजेतर सर्व राष्ट्रे पाण्यापेक्षा पातळ झालेली आहेत. आज पाश्चिमात्य इंग्रज लोक ठरवतील ते पूर्व ठरत आहे. ब्रिटीश साम्राज्याचा हा विस्तार व दुसरा प्रस्थापित करण्याच्या कामी लक्षावधी इंग्रजांनी स्वार्थाचा होम केलेला नसल्यामुळे, त्याच्या पायात पडलेला अनंत अत्याचारांना व घातपातांना आज मानवी स्मृती कवडीचे हीं महत्त्व देत नाही.

यावर कित्येक अशी शंका काढतील की जी कामे नीतिग्रंथांत अकर्मे अथवा कुकर्मे म्हणून गणली जातात, ती उघड मापने आचरून नरपती, हयपती, छत्रपती, चक्रवर्ती इत्यादि अत्युच्च पदाला पोहचणाऱ्या पुरुषांना थोर का मानावे? केवल ते जबरदस्त सत्ताथीश बनतात म्हणुन की काय? नीति, न्याय, सदाचार यांना लाथाडून मिळविलेल्या श्रेष्ठ पदाची महति जगाने काय म्हणून वानावी, आणि इतिहासाने ती मानावी? हव्या त्या अमानुष अत्याचारांवर व घातपातांवर केवल राजकारणाची सफेदी चढताच यांच्या क्रोर्याची आणि राक्षसीपणाची तीव्रता वितळून जाते तर मानवतेचा सुरक्षितपणा म्हणजे एक भयंकर धोक्याचा सौदाच म्हटला पाहिजे!

• नीतिशास्त्र म्हणजे नाटक का तमाशा? :

वाटेल ते कुकर्म राजकारणाचा शिक्का पडताच, चलनी नाण्याप्रमाणे जर जगाच्या बाजारात बिन तक्रार चालते, तर नीतिशास्त्र म्हणजे नाटक का तमाशा? सत्कर्म ते सत्कर्म आणि बदकर्म ते बदकर्म! सकृद्दर्शनी ही शंका वाजवी दिसते. परंतु त्यात 'परंतु' आहे आणि या ''परंतु'चे कोडे शेकडा ९९ प्रापंचिकांना उलगडत नसल्यामूळे, कर्म कोणत आणि अकर्म कशाला म्हणावे, याचा समाधानकारक निर्णय त्यांना लावता येत नाही. संसाराच्या रोजच्या क्षुद्र दलदलीत सुद्धा "हे बरे का ते खरे'', असे करू का तसे करू' आणि 'कस करू काय करू' याचा माणसाला उलगडा होत नाही. मोठ मोठ्या पंडितांची ही निर्णय शक्ती पुष्कळ वेळा लंजूर पडते. अशा वेळी मोह ग्रस्त माणूस वाटेल त्यावर वाटेल ते आरोप करून, आपल्या संशयी मनाचे कसे तरी समाधान करून घेतो. अहिंसा, सत्य, अस्तेय, काया, वाचा, मनाची शुद्धता आणि इंद्रिय निग्रह ही पांच सनातन नीति धर्माची तत्वे खरी; परंतु त्यांच्याही आचरणात अपवादाची अनेक स्थळे आहेत. सामान्य नियम आणि अपवाद यांचा पाया शुद्ध आणि विवेक मान्य विचार नीतीशास्त्राने मुळीच केलेला नाही, असे खास नव्हे. अहिंसा परमो धर्म: ही गोष्ट किती ही खरी असली तरी जगाच्या व्यवहारात कर्तव्याची अशी अनेक क्षेत्रे आहेत कि, तेथे हिंसा हाच परम धर्म ठरविणे प्राप्त असते; आणि नीतिशास्त्र यालाच आपली मान्यता देते.

• श्रीमदभगवदगीताशास्त्र अवतरले :

संसार मग तो एका कुटुंबाचा असो वा विशाल राष्ट्राचा असो. त्यांत नित्य भेटणाऱ्या कर्मा कर्माची त्रांगडी कशी सोडवावी, याचा बालबोध उलगडा अखिल मानवतेला व्हावा. एवढ्याचसाठी श्रीमदभगवदगीताशास्त्र अवतरले आहे. सवं उपनिषदरूपी कामधेनूचे अमृतमय दूध घुसळुन, श्रीकृष्ण भगवंताने गीतारुपी आत्म प्रबोधक नवनीत काढले. कै. बाळ गंगाधर टिळक यांनी अत्यंत कुशलतेने त्या नवनीतात आपल्या अलौकिक बुद्धिमत्तेची पत्रीची खडीसाखर मिसळून 'गीता रहस्य' नामक स्वादिष्ट आणि खमंग असा षोडसरसी मावा तयार केला. त्यातील 'धर्म जिज्ञासा' नामक प्रकरणावरून सत्य - असत्यांचा व हिंसा - अहिंसेची गीतोक्त मीमांसा येथे सारांशाने नमूद करीत आहे :

नीतिशास्त्र कितीही कडकडीत असले, तरी त्यात ही अपवादांचा विवेकाने विचार केलेला आहे. सामान्य नियमाला अपवाद हे असायचेच. सत्य बोलावे हा परम धर्म. त्याविषयी वादच नाहीं. परंतु, आजूबाजूचा कसला ही विचार न करता, परिस्थिती प्रसंग आणि परिणाम यांची दखल न बाळगता, केवळ परमोच्च धर्म म्हणून सत्य बोलणारा माणूस सत्याग्रही असला तरी पुष्कळ प्रसंगी स्वत: गाढव तर ठरतोच. पण इतरांच्या ही नाशाला अगर घाताला कारण होतो.गाईच्या मागे कसाई लागला आहे. पळत पळत गाय आपल्या दृष्टी समोर आडोशाला लपली. इतक्यात 'गाय कोठे लपली?' म्हणून कसाई तुम्हाला विचारू लागला तर त्या वेळी सत्याग्रहाच्या दिमाखाने तुम्ही सत्य सांगून गाईची हत्या करवाल, का असत्य सांगून तिचा प्राण वाचवाल? काही मनुष्ये दरोडेखोरांच्या हातून निसटुन, तुमच्या देखत दाट रानात कोठे तरी दडून बसली. मागाहुन तलवारी परजीत दरोडेखोर येऊन ती माणसे कोठे गेली, असे विचारू लागले, तर काय जवाब द्याल? सत्य बोलाल का धडपडीत 'मला माहीत नाही' असे असत्य बोलून त्या गरीबांचा प्राण वाचवाल? सत्य बोलणे हा परमोच्च धर्म, तर निरपराधी प्राण्याची हिंसा होत असेल तर त्याला हवे ते करून प्रतिबंध करणे, हा ही सत्या इतकाच परमोच्च धर्मा मग दोघांपैकी कोणता मार्ग पत्करावा? समजा, अखिल महाराष्टाच्या गुलामगिरीचे पाश कसे तोडावे, या एकाच ध्येयाला वाहून घेतलेले शिवाजी महाराज डोंगरी किल्ल्यांच्या एका गुप्त खलबत खान्यात काही मसलत करीत बसलें आहेत. बाहेर टेहळाणीसाठी एक घोंगड्या गुराखी बसविलेंला आहे. इतक्यात एक विजापूरचा कोणी तरी चिरुट सिगारेट खान तेथे येतो आणि तलवार काढून विचारते 'बताव कहा हे मरहठ्ठा सेवाजी?' तर त्या घोंगड्या टेहाळ्यांने, 'सत्य सदा बोलावे' म्हणून शिवाजीचा चटकन् पत्ता सांगून मोकले व्हावे, का कानावर हात ठेवून त्या चिरुट खानाच्या तलवारीला बळी पडावे? नितीशास्रातला विवेक दुसऱ्या प्रकाराला संमती देतो. "सत्य बोलने हे प्रशस्त होय; पण सत्यापेक्षा ही सर्व भूतांचे जाति हित अन्ति, ते बोलावे. सर्व भूतांचे ज्यात्त अत्यंत हित तेच माझ्या मते खरे सत्य होय." चिरूट खानाच्या क्रोधाला टेहळ्या बळी पडला तर त्यात विशेष काय उत्पात घडणार? काही नाही. एक सोडून लाखो टेहळे मिळतील, पण कोट्यावधी मऱ्हाठ्यांच्या राष्टीय भवितव्यतेचा विश्वकर्मा शिवाजी दुसरा मिळणे शक्यच नाही. शिवाजी ठार झाला की महाराष्ट्र मेला, अशा महत्वाच्या राष्ट्र नायकाला जर त्या टेहळ्याने दाखविला, तर त्याची ती वाणी अथवा करणी असल्याच्या व नीच नृशंसत्वाच्या सदराखाली येऊन साऱ्या ज़गाच्या छि - थू ला कारण होती. शांति पर्वात भाष्म युधिष्ठिरास सांगतात, "न बोलता मोक्ष म्हणजे सुटका होण्यासारखी असेल तर काही झाले तरी बोलू नये; आणि बोलणे अबश्यच असेल तर, किंवा न बोलल्यामुळे (दुसऱ्यास) शंका येण्याचा संभव असेल तर, त्या वेळी सत्यापेक्षा छोटे बोलणे अधिक प्रशस्त, असे विचारांती ठरलेले आहे." 'अहिंसा सत्यवचन् सर्वभ्रूतहितं परम्' (वनपर्व २०६ - ७३) इंग्रेजी नीतिशास्त्रवेते याच मताला पुष्टी देतात.

१) मी खोटे बोलण्याने प्रभूच्या सत्याचा महिमा जर अधिक वाढतो (म्हणजे ख्रिस्ती धर्माचा अधिक प्रसार होतो.) तर त्यामुळे मी पापी कसा ठरणार? (रोम ३ - ७ ख्रिस्ती शिष्य पाॅल)

२) माझ्या मते कोणत्याही कृत्याचा परिणाम काय होतो इकडे लक्ष पुरवूनच त्याची नीतिमत्ता ठरवली पाहिजे. खोटे बोलल्यानेच एकंदरीत अधिक कल्याण आहे, अशी जर माझी खात्री असेल तर सत्य बोलण्यास मी धज़णार नाहीं; आणि ही खात्री अशा प्रकारची ही असू शकेल की त्यावेळी खोटे बोलणे हेच माझे कर्तव्य आहे असे मी समजेन (लेस्ली स्टीफन)

अहिंसा परमो धर्म: हा सामान्य नियम बहुतेक सर्व धर्मानी मान्य केलेला आहे. पितृ वध, मातृ वध, मनुष्य वध हे हिंसेचे छोटे प्रकार. पण आता असे समजा की, आपला जीव घेण्यास, किंवा आपल्या पत्नीवर अगर कन्येवर बलात्कार करण्यास, अथवा आपल्या घरास आग लावण्यास, अगर आपली सर्व दौलत व स्थिर स्थावर हरण करण्यास एखादा दुष्ट मनुष्य हातात शस्त्र घेऊन सज्ज झाला व जवळ दुसरा कोणीही त्राता नाही, तर असल्या "आततायी' मनुष्याची आपण 'अहिंसा परमो धर्म:' म्हणून डोळे मिटून उपेक्षा करावी, किंवा दुष्टास तो सामोपचाराने ऐकत नसल्यास यथा शक्ती शासन करावे? मनु म्हणतो -

गुरुं वा बालवृद्धौ वा ब्राह्मणं वा बहुश्रुतम् ।
आततायोनमायांन्तं हन्यादेवविचारयन् ।।

"असला आततायी म्हणजे दुष्ट मनुष्य - तो गुरु आहे. म्हातारा अगर पोर आहे, विद्वान ब्राह्मण आहे, इकडे न पहाता - बेशक ठार करावा?" कारण, अशा वेळी हत्येचे पाप हत्या करणारास लागत नसून, आततायी आपल्या अधर्मानेच मारिला जातो (मनु. ८ - ३५०)

"भ्रूणहत्या म्हणजे कोवळ्या पोराची हत्या सर्वात अति गर्ह्य मानिली आहे; पण आडवे आले म्हणजे कापून काढावयास नको काय?" (कै. टिलक)

तात्पर्य, नीतीचे सामान्य नियम काहीही असले, तरी त्यात ही अपवाद असतात आणि आपल्या बोलण्याने किंवा वर्तनाने सार्वजनिक ऊर्फ सर्वभूत हितावर होणाऱ्या बऱ्या वाईट परिणामांवरून त्यांतील विवेका विवेक शोधला पाहिजे.

• शिवाजीचे ध्येय काय होते? :

शिवाजी जाय मुसलमानांचा द्वेष्टा होता? मुलीच नाही. तो कोणाचीच द्वेष्टा नव्हता. शिवाजीची मायभूमी गुलाम होती, त्या गुलामगिरीचा तो द्वेष्टा होता आणि गुलामगिरीचा देष करून, तिला रसातळाला नेण्याचा प्रयत्न करणे, हा तर प्रत्येक मनुष्याचा निसर्ग दत्त अधिकारच आहे. लौकिकी धर्मापेक्षा हा राष्ट्र स्वातंत्र्याच्या धर्म उद्दिष्टीत करणे, हे मोठे कौतुकास्पद कार्य होय. शिवाजीला हे महत्कार्य पार पाडावयाचे हाते. महाराष्ट्र माऱ्हाठ्यांचा. त्यावर इस्लामी सत्ता काय म्हणून? माऱ्हाठ्यांच्या राजकारणी स्वय निर्णयाचे हे इस्लामी मक्तेदार कोण? यांची मक्तेदारी आम्हाला साफ नको. मी माऱ्हाठ्यांना दास्यमुक्त करीन. या उदात्त महत्वाकांक्षेने बाल वयातच फुरफुरलेंल्या शिवाजीला प्रत्यक्ष कार्य करताना येणाऱ्या संकटांचा, अखिल महाराष्ट्राच्या भवितव्यतेच्या जबाबदारी कड़े एकाग्र लक्ष ठेवून, बनेल तसा फडशा पाडणे कर्तव्य प्राप्तच होते. त्याने अफझुल खानाचा कोथळा फोडला तो, तो मुसलमान होता म्हणून नव्हे. अशी समजूत करून घेणे हा गाळीव गाढवपणा होय. अफझुल खानाच्या स्वारीचा उद्देश, त्वान विजापुरास मारलेली पैज, येताना वाटेत केलेले अत्याचार, आणि शिवाजी विरुद्ध रचलेला व्यूह न जाणण्या इतका शिवाजी बावळट नव्हता. अफझूल खान म्हणजे महाराष्ट्राच्या उदयोन्मुख स्वातंत्र्यावर प्रस्थापित आदिलशाही सत्तेने फेकलेला बॉम्ब गोळाच होय, ही त्या तरुण राष्ट्रवीराची बालंबाल खात्री पटल्यामुळेच, शिवाजी आपल्या कर्तव्याची दिशा ठरवूनच, त्याच्या डावाशी प्रति डाव खेळला, आणि अखेर अतुल्य प्रसंगा वधानाने त्याने त्याला त्याच्याच युक्तीने गारद करून, शिवाजीचा महाराष्ट्र स्वातंत्र्याचा उद्योग म्हणजे सहज़गत्या टाचे खाली विझणारी ठिणगी नव्हे, हे त्याने विजापूरच्या प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले.

शेक्स पियरच्या हॅप्लटेला गीता शास्त्राचे पाठबळ नव्हते, म्हणून त्याच्या 'जगावे कि मरावे? या शंकचे पर्यवसान दुख पर्यंवसायी झाले. हिंदु जण गीतेशी बेईमान झाले, म्हणून आज त साऱ्या जगाच्या पखालीचे तेल बनले आहेत. प्रत्येक राष्ट्र संसाऱ्या पुढे 'जगावे कि मरावे?' हाच प्रश्न नेहमी पडत आलेला आहे आणि तो सोडविण्याच्या कुशलतेनेच त्या त्या राष्ट्राच्या उन्नती अवनतीचा इतिहास रंगविलेला आहे. आज प्रत्येक गुलाम राष्ट्राकडे हाच प्रश्न आहे. आपल्या पुढे तोच आहे, शिवाजी पुढे तोच होता आणि अर्जुनाला सुद्धा कर्म कोणते आणि अकर्म कोणते, हाच मोह पडला होता. त्याने मन साधुत्वाच्या कल्पनेने वितळू लागले होते. आणि राजकारणपटू मुत्सद्याग्रणि श्री कृष्णाने वेळीच त्यांच्या भ्रमाचे निरसन केले नसते तर अर्जुनाव्या कपाळी नामर्द षंढत्वाचा काळिमा कायमचा लागला असता. भारतीय महायुद्ध हिंदू हिंदूतले होते. एकाच राज घराण्यातल्या दोन 'चुलत' तटातले होते. आप्त स्वकियांतील रक्तपाताचा प्रसंग. कौरव किंवा पांडव यांपैकी कोणातरी एकाच विध्वंस झाल्या शिवाय भरत खंडाच्या राष्ट्रीय भवितव्यतेचा महत्वाचा प्रश्न सुटणारा नव्हता. अर्जुनाच्या समोर सारा गोतावल्वा युद्धासाठी सज्ज उभा. भिष्म, द्रोणा सारखे पूज्य गुरुवर्य ही सामन्याला समोर. अहिंसा परमो धर्म! मग यांच्यावर शस्त्र चालवावे की नाही? हा सारा गोतावला ठार मारून मी मिळवणार काय? भारत साम्राज्य? त्यापेक्षा संन्यास काय वाईट? युद्धातील रक्तपात व अत्याचार हे कर्म का अकर्म? असल्या लौकिकी विचारांनी अर्जुन भांबावून गेला. त्याला राजकारणी दगलबाजी म्हणजे मोठे पाप वाटु लागले. तो साध्या संसारी माणसा प्रमाणे महायुद्धाच्या उद्देश्याकडे व त्यातल्या अत्याचारांकडे पाहू लागला. त्यामुळे नीति, न्याय, धर्म, सत्य यांची विकृत रूपे त्याला दिसून, कर्तव्या कर्तव्याचा त्याला विवेकच उरला नाही. मिथ्या साधूत्वाच्या कल्पनेने अर्जुनाच्या पौरुषत्वाला अविवेकाची लागत असलेली वाळवी झाडण्यासाठी श्री कृष्णाला किती तरी प्रयत्न करावे लागले. नीति सांगितली, विवेक पढवला. अखर दमदाटी सुद्धा केली, तेव्हा कोठे हे धनंजय युद्धाला प्रवृत्त झालें. आता शिवाजीकडे पाहा. "हिंदवी स्वराज्य व्हावे हे श्रीच्या मनात फार आहे" या ध्येयाच्या सिद्धीसाठी झगडताना शिवाजीवर अनेक प्राणघातक व ध्येय विध्वंसक प्रसंग आले. परंतु, प्रत्येक मुकाबल्याला तो आपल्या कर्तव्याचा मार्ग स्पष्ट आखूनच त्याला बेधडक स्वत: छोड देत गेला. शाहिते खान वरील मुकाबला घ्या, अफझुल खानाच्या दगलबाजी वर केलेली मात घ्या, शहाजी राजाच्या सुटकेसाठी केलेंले कारस्थान घ्या, आग्र्याहून निसण्याची योजना घ्या, काय वाटलं तो प्रसंग घ्या, त्यात कर्तव्याची स्पष्ट कल्पना करून निधड्या छातीने शिवाजी त्याचा फडशा पाडीत गेला.

• बगलबाज अर्जुन आणि दगलबाज शिवाजी :

अर्जूना प्रमाणे शिवाजी कधी भांबावला नाही. कधी संन्यास घ्यायला उठला नाही. बगलचाज अर्जुन आणि दगलबाज़ शिवाजी या तुलनेत बिचारांचे ब्रह्यग्रेड आहे. भारतीय समरभूमी वरील अर्जुन आणि प्रतापगडावर अफझुल खान पुढे उभा ठाकलेला शिवाजी, यांची तुलना केली, तर अर्जुना पेक्षा शिवाजी शत्तपट श्रेष्ठ ठरतो. काका, मामा, अप्पा, बाबा यांना कसे मारू या क्षुद्र कल्पनेला बळी पडून, विहित कर्तव्याला बगल मारून पळू पाहणारा बगलबाज अर्जुन पहा आणि भेटीचे ढोंग करून दगा देण्यास आलेल्या दगलबाज अफ़झुल खानाला त्याच्याच युक्तीने गारद करणारा कर्तव्या कर्तव्य सवाई दगलबाज शिवाजी पहा, म्हणजे कर्तव्य कर्तव्याचे कोडे थोडे तरी सुटेल. अफ़झुल खानला ठार मारल्या शिवाय किंवा त्याच्या जाती शिवाजी जिवंत किंवा मेलेला सापडल्या शिवाय; त्या मुकाबल्याचा निर्णयच लागणारा नव्हता. अर्थात शिवाजी मारिन किंवा मरेन असा अटीतटीचा सामना देण्याच्या तयारीनेच प्रतापगड चढला, आणि त्याच्या अलौकिक प्रसंगावथानाने त्याने अशक्य गोष्ट शक्य करून दाखविली. हिंदवी स्वराज्याच्या प्राण प्रातिष्ठेसाठी स्वत:चा प्राण देणे अथवा अफ़झुल खानचा प्राण घेणे, यापेक्षा तिसरा मार्गच शिवाजी पुढे नव्हता. अर्थात ते कर्तव्य त्याने मोठ्या कुशलतेने पार पाडून, 'योग: कर्म कौशलम्' या गीतोक्तीप्रमाणे राजकारणी दगलबाजांतील योगीराज ही आपली कीर्ती जगजाहीर केली.

• दगलबाजांतील योगीराज :

श्री कृष्णाने गीता सांगितली अर्जुनाला, पण ती प्रत्यक्ष आचरणात आणून महाराष्ट्राचा राष्ट्रधर्म भगवदृगीतेत आहे, हे सप्रमाण सिद्ध केले शिवाजीने. गीतेचे पांग पांडवांनी फेडले नाहीत, ते शिवाजीने फेडले. महाभारतीय इतिहासाला आपल्या बुद्धी प्रभावाने रंगवून चिरंजीव करणाऱ्या दगलबाज श्री कृष्णाला अर्जुना पेक्षा दगलबाज शिवाजी हाच खरा शिष्य व अनुयायी लाभला, यात मुळीच संशय नाही. अर्थात "यत्न योगेश्वर: कृष्ण:" हा श्लोक यापुढे -

"यत्र योगेश्वर: कृष्णो यत्र शिवराय भूपती ।।
तत्र श्रीर्विजयो भूतीर्धुवा नितीर्मतिर्मंम ।।"

असाच वाचला पाहिजे, 
बोला दगलबाज शिवाजीचा जयजयकार.

•◆●■ समाप्त ■●◆•

लेखक -
केशव सीताराम ठाकरे

धम्म प्रचारक, अनुवादक एवं संग्राहक -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

• बुद्धभूमी फाऊंडेशन (आपले संकेत स्थळ)
Www.BuddhaBhoomi.Com

• मी भारतीय (आपले संकेत स्थळ)
Www.MiBhartiya.Com

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा