शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

● दि ग्रेट इंडियन - एक प्रखर देशभक्त

● दि ग्रेट इंडियन - एक प्रखर देशभक्त

उद्देश -
लहान ते वयोवृद्ध व्यक्तीपर्यंत जनहितार्थ मार्गदर्शक माहिती प्रसारित करणे, हे प्रत्येक व्यक्तीचे कार्यव्य असले पाहिजे.

लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

मनुष्य मात्रांच्या संपूर्ण स्वातंत्र्याचा उद्गाता, कोट्यावधी मानवाच्या जीवना मध्ये प्रकाश निर्माण करण्याचे काम डाँ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केले. मानवतेसाठी आपले सर्वस्व अर्पण करून असामान्य कर्तृत्व उभे केले अस्पृशांच्या आचार विचारा मध्ये अमूल्याग्र क्रांती केली. माणूस असूनही ज्याला माणसा प्रमाणे तर नाहीच पशू पेक्षा ही हिन जीवन जगत असलेल्या मनुष्य मात्रास समाजा मध्ये प्रतिष्टित करण्याचे महान कार्य बाबासाहेबांनी केले त्यासाठी बाबासाहेबांना अनेक आघाड्यांवर संघर्ष करावा लागला त्याचा हा संघर्ष, लढा संबंध मानव जातीच्या उत्थनाचा स्वाभिमान आंदोलनच ठरले. अस्पृश्यांच्या मुक्तीसाठीचा हा प्रारंभीचा लढा अस्पृश्यां पुरताच मर्यादित राहिला नाही. समाज, राष्ट्र यांच्या परिस्थितीना या आंदोलनाने केव्हाच ओलांडल्या. संबंध मानवी जीवन, विश्व कल्याणाचा मुलभूत विचार असणारे हे आंदोलन विश्वव्याप्ती बनले. अस्पृश्य समाजात जन्मल्यामुळे अस्पृश्यतेचे दाहक अनुभवाचे चटके बाबासाहेबांना लहानपणी बसलेच नंतर शिक्षण, नोकरी आणि सार्वजनिक जीवनात त्या अनुभवानी पाट सोडली नाही म्हणून त्यांच्या चळवळीचा मुख्य केंद्र अस्पृश्य समाजाचा उद्धार हा असणे श्यवहार्य आणि सामाजिक ठरतो. जसाजशी आंदोलनाची व्याप्ती वाढत गेली. तसा बाबासाहेबांच्या चळवळीचे केंद्र समाज, देश, विश्व व एकून मानवजात राहिली म्हणूनच अस्पृश्यांच्या उद्धाराचे मुख्य ध्येय असले तरी त्यांनी समाज, देशहिताकडे कधीच दुर्लक्ष केले नाही. आयुष्याच्या शेवटच्या क्षणार्धांत बाबासाहेबांनी समाज देश देशाची एकता व अखंडता, स्वातंत्र्य व समता याचाच विचार केला म्हणूनच बाबासाहेब प्रखर राष्टभक्त होते, राष्टवादी होते. आपल्या अस्पृश्य समाजामध्ये देखील तशीच राष्टभक्ती जोपासण्याचे कार्य बाबासाहेबांनी केले. म्हणून अण्णाभाऊ साठे सारखे साहित्यक बाबांची एका वाक्यात आठवण करून देतात ते असे -

"जग बदल घालूनी घाव ।
सांगून गेले मज भिमराव ।"

बाबासाहेबांच्या कर्तृत्वाच्या अनेक पैलूचा अभ्यास झालेला आहे. पण बाबासाहेबांचा राष्टवाद आणि त्यांचे देवप्रेम या विषयाला अद्यापही म्हणावा तसा न्याय मिळाला नाही. प्स्थापित इतिहासकार, विचारवंतानी जाणीव पूर्वक हा विषय सर्व व्यापक बनवला नाही उलट दुसरीकडे बाबासाहेबांच्या एखाद्या भूमिकेचा चुकीचा अर्थ काडून त्याचा मात्र प्रसार व प्रचार करण्यात येतो आहे. तसाच संदेश विद्यार्था पर्यत पसरवला जाऊन बाबासाहेबांनी देशाच्या स्वतंत्र्याबद्दल, देशभक्ती बद्दल फारसे काही झाले नसल्याचे विद्यार्थाना बिंबवले जाते. विशेषत काँग्रेसने तिच्या चळवळीत ज्यांनी भाग घेतला नार्ही, सहकार्य केले नाही त्या सर्वाना देश विरोधी आणि स्वातंत्र्य विरोधी ठरविले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डाँ. बाबासाहेब आंबेडकर यातून सुटले नाहीत म्हणूनच बाबासाहेबांची राष्टवादाची भावना त्यांचे देशप्रेम हा दृष्टिकोन सर्वव्याप्ती झाला नाही.

• बाबासाहेबांची राष्ट्रवादाची संकल्पना -

याकाळी काँग्रेस आणि तिच्याशी संलग्नीत असणाऱ्या संघटनांच्या नेत्याच्या राष्टवादाची संकल्पना आणि बाबासाहेबांचा राष्ट्रवाद ही संकल्पना यात फरक असल्याचे दिसून येते.

• स्वातंत्र्य कुणाचे -

बाबासाहेब देशाचे स्वातंत्र्य आणि जनतेचे स्वातंत्र्य अया दोन वेगळ्यच बाबी मानत. देश स्वातंत्र झाला म्हणजे देशातील जनतेला स्वातंत्र्य मिळते. असा अर्थ नाही. देश स्वातंत्र्य होवून हि देशातील जनता जर गुलामगिरीत आणि मुठभर लोकांच्या शोषणास बळी पडत असेल, विकासाची संधी मिळत नसेल, तर अशा स्वातंत्र्यास बाबासाहेब स्वातंत्र्य मानत नसत. या संदर्भात बाबासाहेब अमेरिकेच्या स्वातंत्र्य आंदोलनाचा संदर्भ देतात. ४ जुलै १७७६ ला अमेरिका ब्रिटिशांच्या वर्चस्वातून मुक्त झाला. अमेरिकेस स्वातंत्र्य मिळाले पण तेथील निग्रोंना मात्र स्वातंत्र्य मिळाले नाही. त्याला त्यानंतर कित्येक वर्ष गुलामगिरीत जगावे लागले. अमेरितेच्या स्वातंत्र्या नंतर निग्रोंना त्यांच्या स्वातंत्र्यासाठी, अधिकारासाठी संघर्ष करावा लागला. प्रदीर्घ संघर्षानंतर तेथे निग्रोंना अधिकार मिळाले, स्वातंत्र्य मिळाले. म्हणजेच देशातील सर्व सामान्य माणसास समतायुक्त आणि शोषण मुक्त जीवन जगता येत नाही त्यांस मानसिक, बौध्दिक, आर्थिक आणि सामाजिक स्वातंत्र्य नसेल तर देशाला केवळ राजकीय स्वातंत्र्य मिळून उपयोग नसतो. म्हणून स्वातंत्र्याचा असा उदात्त अर्थ बाबासाहेबांन अभिप्रेत होता आणि ब्रिटिश्यां विरुद्ध स्वातंत्र्याची मगणी करणारी काँग्रेस तर मुठभर लोकांचीच प्रतिनिधीत्व करते. आपल्या अनुयायांनी देखील त्यांनी स्वराज्य म्हणजे ते समजावून घ्यावे आणि ते मिळविण्यासाठी प्रयत्नशील असावे, असे आवाहन केले होते.

• सायमन कमिशन व डाँ. बाबासाहेब आंबेडकर -

येथील जातीवादी आणि मनुवादी लोकांनी बाबासाहेबांच्या द्वेषापोटी त्यांच्या हिताच्या आणि विशिष्ट बाबींना समोर ठेवून स्वातंत्र्य चळवळी बाबत बाबासाहेबांनी भूमिका मात्र अंधारात ठेवली. इतिहासातील अनेक घटनांचे विकृतीकरण करुन आम्हाला तोच इतिहास येथे शिकविला जातो. हा वेगळा आणि स्वातंत्र्य विषय आहे. भारतीयांना द्यावयाच्या राजकीय हक्का संदर्भात भारतीय संघटना, नेते यांच्याशी विचार विनिमय करण्यासाठी १९२७ ला भारतात सायमन कमिशन पाठविले. या कमिशनावर काँग्रेसने बहिष्कार टाकला. कारण असे सांगतात की, या कमिशनमध्ये सर्व सदस्य ब्रिटिश होते. पण बहिष्काराचे खरे कारण दुसरेच आहे. या दरम्यान भारतात विविध जातीधर्माच्या लोकांकडून आपापल्या समूहासाठी हित जोपासणाऱ्या मागण्या चालू होत्या आणि सायमन देखील त्यात अनूकुल होते त्यांच्या हिताच्या मागण्यांचा इंग्रजा कडून विचार होवू नये म्हणून काँग्रेसने सायमन कमिशनवर बहिष्कार टाकला.

या कमिशनला बाबासाहेबांनी मात्र सहकार्य केले. इंग्रजांकडून अस्पृश्य समाजाची बाजू मांडणे महत्वाचे वाटत होते म्हणून बाबासाहेबांनी सायमनला साक्ष दिली, लेखी निवेदने दिली. त्या निवेदनामध्ये बाबासाहेबांनी दुष्ट बुद्धिने घेतलेल्या निर्णयास विरोध केला. स्वातंत्र्य आंदोलनाची धार कमी करावी. हिंदू - मुस्लिमांत अंतर पडावा हिंदूना झोडपण्यासाठी मुस्लिमांचा उपयोग होईल अशा अनेक हेतूने सायमनने सिंध प्रांत निर्माण करण्याची शिफारस केली होती. जमातवादावर आधारित इंग्रजांच्या कारस्थानास बाबासाहेबांनी विरोध केला. भारतात जमातवाद आणि धार्मिक द्वेष वाढविण्याचा प्रयत्न इंग्रजांनी करु नये असे बाबासाहेबांनी सांगून निवेदना मध्ये स्पष्ट नमूद केले. येथील हिंदू - मुस्लिम किंवा सिंधी हे पण अगोदर हे सर्व भारतीय आहेत आणि नंतर ही भारतीय आहेत. त्यामुळे जमातवादी गट, जाणीव वाढेल असे काहीही प्रयत्न इंग्रजानी करु नये, असे बाबासाहेबांनी सायमन कमिशन समोर भूमिका घेतली.

• इंग्रजांवर प्रखर टिका -

डाँ. बाबासाहेब आंबेडकर सरकार नियुक्त अनेक समित्यांवर, गव्हर्नरच्या कार्यकरी मंडळात सदस्य असताना देखील त्यांनी इंग्रजांच्या अन्यायी, पक्षपाती आणि भारतीय जनतेच्या विकासास मारक ठरणाऱ्या धोरणावर जाहीर टिका केल्या, भूमिका घेतल्या. १९१९ च्या साऊथ बर समितीने जातवार प्रतिनिधित्व देण्याचे मान्य केले पण आवश्यक असलेल्या अस्पृश्यांना मात्र योग्य व प्रमाणशीर प्रतिनिधित्व दिले नाही म्हणून हे प्रतिनिधित्व देण्याचे धोरण अनुदारपणाचे व बेअकलीपणाचे आहे, अशी प्रचंड टिका त्यांनी केली. सायमन कमिशन वेळी बाबासाहेब मुंबई कौन्सिलचे सदस्य होते आणि सायमनला सहकार्य करण्यासाठी नेमलेल्या समतीचे ही सदस्य होते तरी पण बाबासाहेबांनी इंग्रजां विरुद्ध भूमिका घेऊन त्यांच्यावर प्रखर टिका केली. बाबासाहेबांनी पी.एच.डी. (PH.D) आणि डी.एस.सी. (DS.C) साठी जे प्रबंध लिहले. त्या प्रबंधा मधून देखील इंग्रजांच्या शोषणामुळे भारतात दरिद्र कसे वाढत गेले आणि शोषण कसे होते याचे सादर विश्लेषण करुन इंग्रजांचे अंतरंग उघडे करून दाखविले. ब्रिटिश सत्ता भारतात खिर झाल्यापासून भारता मध्ये अनेकदा दुष्काळ पडला त्यात अनेक लोक भुकेने मेले या उपासमारीचे कारण इंग्रजांचे धोरण. कारण आहे. येथे उद्योग व्यापार याची वाढ होवू द्यायची नाही व भारतातील व्यापारी पेठ सदैव खुली रहावी असे इंग्रजांचे राज्य कारभार करण्याचे धोरण आहे, असे न्या रानडे, दादाभाई नौरोजी प्रमाणेच बाबासाहेबांनी ही स्पष्ट केले. याचाच सलोख अभ्यास करुन अण्णाभाऊ साठे जाहिरपणे सांगतात कि -

"ये आजादी जूठी है ।
देश कि जनता भूखी है ।"

भारतीयांच्या अधिकारासाठी इंग्रजां विरुद्ध कायदेशीर लढाई बाबासाहेबानी प्रयत्न केले. १९३० च्या सविनय कायदे भंगाच्या चळवळीचा एक भाग म्हणून ठिक ठिकाणी जंगल सत्याग्रह करण्यात आले. पनवेल जवळ चिरनेर मध्ये असाच जंगल सत्याग्रह चालू असताना पोलिसांनी दडपशाहीचा अवलंब केला तेव्हा सत्याग्रही देखील आक्रमक बनले त्यामुळे हिंसक वळण लागले यात काही सरकारी कर्मचारी, एक मामलेदार ठार झाला. सरकारने अनेक सत्याग्रहींना अटक करून खटला दाखल केला. अटक सत्याग्रहींची बाबासाहेबांनी बाजू माडली. गोलमेज परिषदेसाठी सरकार कडून त्यांची नियुक्ती झाली होती तरी बाबासाहेब सरकारच्या विरोधात सत्याग्रहींच्या बाजूने उभे राहीले. सरकारच्या ध्येर्या पेक्षा जनतेचे न्याय्य हक्क आणि स्वातंत्र्य यांना जास्त प्राधान्य द्यावे अशी भूमिका घेवून बाबासाहेबांनी युक्तीवाद करुन सत्याग्रहींची मुक्तता केली.

• गोलमेज परिषदे मध्ये प्रखर राष्टवादाची प्रचिती -

डाँ. बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणत 'मी प्रथम भारतीय आहे आणि शेवटी ही भारतीय आहे.' १२ नोव्हेबर १९३० पासून सुरू झालेल्या लंडन येथील गोलमेज परिषदेसाठी अस्पृश्यांचे प्रतिनिधी म्हणून डाँ. बाबासाहेब आंबेडकर आणि डाँ. सोळंकी यांची नियुक्ती करण्यात आली. इंग्रजांच्या साम्राज्यात जाऊन त्यांच्या साम्राज्यवादा विरुद्ध बोलण्याचे साहस डाँ. बाबासाहेबांनीच दाखविले. या परिषदेत बाबासाहेबांनी भारतीयांना न्याय्य हक्क देण्यास आणि जबाबदार शासन पध्दती देण्यासाठी तयारी नसेल तर इंग्रजांनी भारत सोडून निघून जावे, असे स्पष्ट निर्भिडपणे इंग्रजांना सुनावणारे बाबासाहेब एकमेव प्रतिनिधी होते. ब्रिटिश राजवटी मध्ये अस्पृश्यांच्या स्थिती मध्ये कसली सुधारणा झाली नाही. त्यामुळे दलितांचा ब्रिटिशांनी विश्वासघात केला. अशा ब्रिटिशांनी भारतात लवकरात लवकर जबाबदार शासन पद्धती देण्याची मागणी गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी केली.

बाबासाहेब आपल्या संपूर्ण जीवना मध्ये राष्टनिष्ठेपासून ते कधीच ढळले नाहीत. देश्याच्याच ऐक्याला एकात्मतेला आणि अखंडतेला अस्मितेला धोका पोहचणार नाही, याची सदैव काळजी घेतली. जरी या देशातील लोकांनी, धर्माने, संस्कृतीने त्यांना व त्यांच्या समाजास अमानवी वागवणूक दिली. गुलामगिरीचीच व्यावस्था जोपासली त्या लोकांबद्दल आणि धर्माबद्दल त्याना राग असला तरी त्या समाजाचा आणि देशाचा सुड घेण्याचा विचार ही त्यांच्या मनाला स्पर्श केला नाही. मुस्लिम लीघ आणि बँरिस्टर जिना यांच्याशी संगनमत करुन बाबासाहेब पहिले प्रधानमंत्री होऊ शकले असते. फाळणी टाळण्यासाठी जिनांनी बाबासाहेबांना पंतप्रधान करत असल्यास पाकिस्तानची मागणी मागे घेण्याच प्रस्ताव काँग्रेसकडे ठेवला होता. बाबासाहेबांनी कधीच देशहितापेक्षा आपला स्वार्थ हित यास प्राधान्य दिले नाही. म्हणूनच बाबासाहेब अन्य कोणत्याही राष्टवाद्यापेक्षा अधिक प्रखर राष्टवादी होते. नंतर ते ८ मे १९५० ला स्वतंत्र्य भारताचे पहिले कायदेमंत्री झाले. ते जाणत होते की आपला समाज अजून स्वतंत्र्य अनूभवत नाही. देशात कुठेना कुठे गैर प्रकार घडतोच त्याकरिता त्यानी राज्यघटना लिहली.

पण हि राज्यघटना २६ जानेवारी १९५० ला प्रजेच्या हिता करिता लागू करून अंमल बजावणी केली हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून लोकशाहीचे बिज रोवले आणि सर्वाना एक संदेश दिला कि संविधान किती ही चांगले असो पण ते चालवणारे लोक चांगले नसतील तर संविधान इतके सवोत्कृष्ट असून सुद्धा ते लोक इतरांचे कल्याण करु शकत नाहीत. आणि प्रजासत्ताक दिन संबधी समते विषयी प्रश्न उभे करून सांगितल की २६ जानेवारी १९५० ला आपण एक विसंगती युक्त जीवनात प्रवेश करणार आहेत, राजकारणात आपल्याकडे समता राहील; परंतु सामाजिक आणि आर्थिक जीवनात विषमत्ता राहिल. राजकारणात प्रत्येकाला एक मत आणि प्रत्येक मताचे समान मूल्य या तत्वाला आपण मान्यता देणार आहोत. आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात मात्र, सामाजिक आणि आर्थिक संरचनेमुळे, प्रत्येक माणसाला समान मूल्य हे तत्व आपण नाकारत राहणार आहोत.

अश्या परस्पर विरोधी जीवनात आपण आणखी किती काळ राहणार आहोत? आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आपण आणखी किती काळ समता नाकारणार आहोत? आपण जर ती अधिक काळापर्यत नाकारत राहिलो तर आपली राजकीय लोकशाही आपण धोक्यात आणल्या शिवाय राहणार नाही. हि विसंगती शक्य होईल तेवढ्या लवकर आपण दूर केली पाहिजे. अन्यथा ज्यांना विषमतेचे दुष्ट परिणाम भोगावे लागत आहेत ते या सभेने अतिशय परिश्रमाने निर्माण केलेली राजकिय लोकशाहीची संरचना उध्वस्त करतील. परत स्वातंत्र्य म्हणजे नेमके काय आहे? ते जबाबदारीचे सार हे पटवून देताना बाबासाहेब म्हणतात की स्वातंत्र्य ही आनंददायी चीज आहे परंतु स्वातंत्र्याने आपणावर मोठ्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत, हे आपण विसरता कामा नये.

आणखी ते म्हणतात कि आपल्या स्वतंत्र देशाला एकात्मतेची व बंधुत्वाची गरज आहे. एकात्मता व बंधुता हा आपल्या राष्टाचा गाभा ठरला पाहिजे. आपली राज्यघटना म्हणजे काय आहे? हे समजावून सांगतात कि - "आपली राज्यघटना म्हणजे संसदीय लोकशाही स्थापित करण्यासाठी केलेली यंत्रणा आहे. संसदीय लोकशाहीचा अर्थ आहे. 'एक व्यक्ती एक मत' याचाच अर्थ असा की शासनकर्ते सतत दक्ष असावेत. जेव्हा ते मतदात्यांपुढे जातील तेव्हा त्यांनी केलेल्या कामाचा जनता आढावा घेऊ शकेल."

पाहिले बाबासाहेब जे सांगतात त्यावरूनच जे स्वातंत्र्य, समता, बंधूत्व स्मरण करून देणारा दिवस म्हणजे संविधान गौरव दिवसाला प्रजासत्ताक दिवस म्हणून ओळखला जातो यावरून डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे प्रखर राष्टभक्त होते ते लक्षात घेतले पाहीजे.

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

आवाहनात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

साभार -
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया",
"दि नॅशनल नेटवर्क बुद्धिस्ट युथ : पुणे ग्रुप"

लेखाचा पहिला भाग - 
https://m.facebook.com/737916446278745/photos/a.738180676252322.1073741827.737916446278745/787019241368465/?type=1&refid=17

लेखाचा दुसरा भाग - 
https://m.facebook.com/737916446278745/photos/a.738180676252322.1073741827.737916446278745/787426684661054/?type=1&refid=17

लेखाचा तिसरा भाग - 
https://m.facebook.com/photo.php?fbid=1049561971726633&id=524271910922311&set=a.524738524208983.138854.524271910922311

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

मंगळवार, ८ ऑगस्ट, २०१७

● अरे यार बाबासाहेबांमुळे (कविता)

● अरे यार बाबासाहेबांमुळे

बाबासाहेबांनी अरे यार,
शोषून साहिलेल्या अती कष्टामुळे ।
साहेब तु सर झालास,
समाजाचा लिडर झालास ।
गांडु पहिलेचा होता आता,
नर झाला अरे यार बाबासाहेबांमूळे ॥धृ॥

अरे काल सावलीन तुझ्या,
बाटत ईथे होता सळा ।
तोंडाला होत गाडग,
ढुंगनाला तुझ्या फळा ।
लढु शकत नव्हता,
तु हक्काचा लढ़ा ।
आज बांधतो माड्यावर,
माडा बाबासाहेबांमुळे ॥१॥

तुला बाबासाहेबांमुळेच,
खरा मान - सन्मान मिळतो ।
कालचा अशिक्षित भिकारी,
लाखात आज खेळतो ।
काल एखाद कुत्र ही,
विचारत लेका तुला नव्हत ।
आज स्वतः कुत्र पाळतो,
फक्त बाबासाहेबांमुळे ॥२॥

अरे बाबासाहेबांमुळे तु आज,
त्यावरच्या शिखरावर गेला ।
पद - पैसा - प्रतिष्ठा मिळताच,
तुला भडव्या माज फार आला ।
म्हणुनच समाजाला,
तु समजतो भाजी पाला ।
डाँक्टर - कलेक्टर - कमिशनर,
झाला तू बाबासाहेबांमुळे ॥३॥

वाटायला लाज पाहिजे,
तुम्हाला पुजा - आरत्या करतांना ।
२२ प्रतिज्ञांना पायदळी तुडवुन,
तुम्ही गौरी - गणपती बसवितांना ।
शिर्डी - शेगावात जाऊन तुम्ही,
घरच्या महिलेची ओटी भरताना ।
गंडे - धागे - दोरे बांधुन,
महिनो - महिना नवस करताना ॥४॥

भेसळ बापाची औलाद,
स्वतःला सुशिक्षित समजतो,
नागड्या भोंदू लोकांचा,
घरात फोटो लावतो ।
व्यसनी लोकांना आदर्श मानतो ॥५॥

खरे सुशिक्षित तर,
आपले पूर्वजच होते ।
संकटात ही बुध्द अन बाबांशी,
तुटुन दिले नाते नाते ।
स्वाभिमानी होते मर्द,
ते कुणा पुढे ना कधी झुकले ।
बा भिमाच्या एका शब्दावर,
३३ कोटी देव उकिरड्यात फेकले ॥६॥

विषमतेच्या काळात ही त्यांनी,
आपल माणूसपण लपवल नाही ।
जगले सारे ताठ मानेने,
पेशवाई सारी संपवुन टाकली ।
तुम्ही माणुसकी लपवनारी औलाद,
शेवटी हरामखोरीवर गेली ।
बाप लपवुन स्वतःच्या आईला ,
भलतीच दुसऱ्याची रखेल केली ॥७॥

तुमच्या अगांत आहे भेसळ रक्त,
झेलण्यातच वाटते तुम्हाला मजा ।
कधी - कधी तुमच्या,
बापाची सर्वांना शंका वाटते ।
तर जयभिम म्हणायला तुमची,
दिड हात टरटर फाटते ॥८॥

अरे छि - थु तुमच्या शिक्षणावर साली,
सारी हिजड्यांची औलाद पैदास झाली ।
म्हणुनच तुमच्यामुळेच आज,
खरी ही औदसा आली ।
बाबासाहेबांनी दिलेली,
जबाबदारी पाळली असती ।
आज इथे घाटकोपर - खैरलांजी,
इथे कधीच घडली नसती ॥९॥

चुक नकळत झालेली,
मित्रा मी समजू शकतो ।
तु जाणून केलेल्या चुकीमुळे,
मी तुझ्या तुथारावर थुंकतो ।
अरे अजून ही वेळ गेलेली नाही,
भिमकार्याचा धुरा खांद्यावर धर ।
लाचारीत मरण्या पेक्षा,
स्वाभिमानाने लढता - लढता मर ॥१०॥

अरे स्वाभिमानाने जगशील,
तर तुला मानाचा जयभिम करीन,
नाही तर हा "यतिन जाधव" तुला,
सर्वांच्या समोर ठोकून मारिन ॥११॥

कवी -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

•◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆•

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

•◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●◆•◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

शनिवार, २९ जुलै, २०१७

● तो बाप कोण? (कविता)

● तो बाप कोण?

सर्व्वोंच पदी बसलास,
मोहताज होतास खायला ।
ज्याची पुण्याई तो बाप कोण?
जा विचार आपल्या मायला ।।धृ।।

बाप सोडुन बापूच्या,
पायात जावुन बसलास ।
ज्याच्यामुळे भेटलं सार,
त्या बापाला विसरलास ।
घटना सोडुन मनुची,
गिता वाचुन रायला ।।१।।

पद - दलित हिनवल,
जगात तरी फसलास ।
टाँय - कोट सोडुन गाढवा,
हाप चड्डी नेसलास ।
चवदार पाणी भुललास,
चायवाल्याच्या चायला ।।२।।

भाऊ मारले वस्ती जाळली,
भोगली बहीन - आई ।
डोळ्या देखत घडुन जरा,
कशी लाज वाटली नाही ।
तुझ्या सारखा दलाल,
अजुन एक पायला ।।३।।

तुकड्यावर त्यांचा जगलास,
हे म्हणुन सारं घडल ।
तु अक्कर माशी बेवारस,
हे काल आम्हा कळलं ।
उगाचं बसलो होतो आम्ही,
ताल धरुन नाचायला ।।४।।

लिलाव करतील देशाचा,
कुणी वाली उरला नाही ।
तुच असशील दलाल,
तुच करशील सही ।
बैल म्हणुन आणलं तुला,
त्याची जमीन वाहायला ।।५।।

कवी -
खेमराज भोयर : नागपूर

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

जय भिम
जय भारत
नमो बुद्धाय

••¤••••¤••••¤••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BSNETINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NILEPAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UATINJADHAV789456123

•◆●◆•◆●◆•◆●◆•◆●•◆●◆•

• Yatin jadhav :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर Add सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

शुक्रवार, २८ जुलै, २०१७

● धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा शोध आणि बोध

● धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा शोध आणि बोध

सम्यक संबोधी प्राप्त झाल्यावर भगवान बुद्धांनी जो प्रथम धम्मोपदेश केला. तो त्रिपीटकात "धम्मचक्र पवतन सुत्त" म्हणून ओळखला जातो. या सुत्तात असे म्हटले आहे कि -

मज्झिप्पा पतीपदा तथागतेन
अभिसमबुद्ध उपासमय, अभिज्ञान,
समबुद्धाय, निब्बानाय सवंतती ॥

एतेन भगवंता वाराणसिय
जासिपतादे मिगदये अनुत्तरन
धम्मचक्र पवत्तितन ॥

अनुवाद -
"तथागतानी जो मध्यम मार्ग जाणला आहे. तो ज्ञान प्राप्तीसाठी आहे, शांतीसाठी आहे, सम्यक संबोधीसाठी आहे, निर्वाणासाठी आहे. अश्या सर्वश्रेष्ठ धम्माचा वाराणसीतील मृगदाय वनामध्ये प्रथम उपदेश करून धम्म प्रवतीत करून केले."

धम्म म्हणजे बुद्ध तत्वज्ञानानूसार जीवन जगण्याचा मार्ग, चक्र म्हणजे त्या मार्गावरुन चालवण्याचा अनिष्ठ प्रथाचा त्याग करुन परिशुद्ध धम्माचा स्विकार करण्याची संपूर्ण प्रक्रिया आणि प्रवर्तन म्हणजे या प्रक्रियेला वेग देऊन ती गतिमान करणे. हा उपदेश करित असताना तो पटवून देण्यासाठी धम्मचक्र प्रवर्तन मुद्रे द्वारे भगवान बुद्धांनी दोन्ही हातानी संकेतत्मक निर्देश करून सांगितले कि, कमळाचे फूल जसे एक - एक पाकळी करून अलगत उमळते तसी प्रत्येक मनूष्यात बुद्ध तत्वाची बिजे हळू - हळू विकसित करायचे काम धम्म करित असतो. म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन मुद्रेत भगवान बुद्धाच्या उजव्या हाताच्या बोटांनी कमळ रूपी धम्म उलगडून दाखविला आहे.

बौद्ध धम्माच्या इतिहासानूसार या देशा मध्ये तीन धम्मचक्र प्रवर्तने घडली. परिवर्तनाच्या या तिन घटना मानवी मनाच्या सम्यक म्हणायचे कारण असे कि, हि तिन्ही प्रवर्तने त्या त्या काळात कायमस्वरूपी रुजली गेली आहेत. पहिले धम्मचक्र प्रवर्तन हे भगवान बुद्धांनी ई. स. पू ५२८ च्या अष्ठी पौर्णिमेला सारनाथ येथे घडविले, त्याचे प्रथम उपदेशाने प्रभावित होऊन पाच ब्राह्मण परिव्रजकांनी आपला परमपारिक धर्म सोडून बुद्ध धम्माचा स्विकार केला. म्हणजेच त्याचे परिवर्तन होऊन ते नवीन जीवन मार्गाला लागले. त्यानूसार बौद्ध कलेनुसार ते सम्राट अशोकाच्या काळापर्यत धम्मचक्र प्रवर्तन दिन हा "अष्टी पौर्णिमेला" या तिथीनुसार साजरा केला जात. कारण त्या काळात पश्चिमत्य कालगणना अस्तित्वात नव्हती; परंतू जी कालगणना अस्तित्वात होती त्यानूसार भगवान बुद्धांनी अष्ट पौर्णिमेला सुरु केलेला धम्मचक्र प्रवर्तन दिना सम्राट अशोकाच्या काळात विजया दर्शमी या तिथीत कसा परिवर्तीत झाला याचा अभ्यास करणे क्रम प्राप्त ठरते. सम्राट अशोकाने कलिंग वर विजय प्राप्त केल्यानंतर आठ वर्ष तो भिक्खू संघाच्या सहवासात राहिला आणि विजया दर्शमीलाच त्याने उपगुप्त या भिक्खू कडून बौद्ध धम्माची दिक्षा घेतली. त्या आठ वर्षात त्याने प्रजा धर्म, राज धर्म आणि निती धर्म या धर्म नितीप्रमाणे आचरण करून प्रजेला अभय दिले. अनेक प्रकारच्या सुखसोयी निर्माण प्रजेला सुखी केले. पंचशीला वर "दसहरा" हि आचारसंहिता लागू करून प्रजेला बौद्ध धम्माची दिक्षा दिली. त्याचा कतृत्वाने तात्काळीन प्रजा इतकी भरावून गेली कि, त्यानी भगवान बुद्धांचा अष्ट पौणिमा हा धम्मचक्र प्रवर्तन दिन बाजूला ठेवून सम्राट अशोकाने ज्या दिवशी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली तो दिवस म्हणजे "विजया दर्शमी" हा दिन धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून पाळायला प्रारंभ केला.

अश्या प्रकारे धम्मचक्र प्रवर्तनाची दूसरी घटना हि अश्विन शुद्ध दर्शमीला सम्राट अशोकाने घडवली आहे. आपल्या प्रजेसाठी दहानिती असलेली "दसहरा" नावाची आचारसाहिता अंमलात आणून सर्व प्रजेला बौद्ध धम्माचे पालन करण्याचा आदेश दिला. ती दहा निती तत्वे खालील प्रमाणे होती.

१) धर्मिक कार्यासाठी किंवा अन्य कोणत्याही कारणासाठी पशूहत्या ना करणे.

२) कुणाची हि चोरी किंवा फसवणूक ना करणे.

३) व्याभिचार किंवा परस्त्री गमन ना करणे.

४) खोटे ना बोलणे.

५) मद्यपान ना करणे.

६) माणूसकीचा तिटकारा सोडून देणे.

७) माणसाच्या जातीपेक्षा त्याच्या गुणाचा श्रेष्ठ मानणे.

८) "वैर सोडल्याने वैर शांत होते" हे लक्षात ठेवणे.

९) "बहूजन हिताय बहूजन सुखाय" या तत्वास विसरू नये.

१०) "निती नियमांचे पालन केल्यास परम सुखाचा लाभ होतो" हे विसरू नये.

या आचारसंहिता नूसार सम्राट अशोकाच्या काळापासून ते डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (१९५६) काळापर्यंत "धम्मचक्र प्रवर्तन दिन" हा अशोका विजया दर्शमी म्हणून "दसहरा" या तिथीला साजरा केला जात असे.

तिसरे धम्मचक्र प्रवर्तन हे डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर येथे आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दिक्षा देऊन १४ आँक्टोबर १९५६ रोजी अशोका विजया दर्शमीच्या (दसहरा) दिवशी घडविले. खर म्हणजे डाँ. बाबासाहेब आंबेडकांना त्यापूर्वी धम्म दिक्षेचा कार्यक्रम ठेवता आला असता; परंतू १९५६ साली येणारी बौद्ध धम्मातील अशोका विजया दर्शमी आणि १४ आँक्टोबर हा एकाच दिवशी आल्याने या ऐतिहासिक दिनाचे औचित्य सोडून त्यानी १४ आँक्टोबर १९५६ रोजी तिसरे महान धम्मचक्र प्रवर्तन घडवून आणले. या दिवशी लाखो दलित अनुयायांनी आपला जूना धर्म सोडून बौद्ध धम्माचा स्विकार केला. म्हणून १९५६ पासून १४ आँक्टोबर या दिनाशी आपले नाते जूळले. डाँ. बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्विकारल्या नंतर पारंपारिक धर्माकडे हिंदू धर्माकडे कधीच नाहीत. तसे आजचे धर्मांतरीत बौद्ध परिपूर्ण आदर्श बौद्ध धर्मीय बनले आहेत काय? याच उत्तर खेदाने "नाही" असेच येते. आजच्या बौद्धानी सार्वजनिक सामाजिक स्तरावर बौद्ध धम्म स्विकारला पण व्यक्तित्व पावले मात्र अजून ही पारंपारिक धर्माच अडकलेली दिसून येतात. याच कारण ज्या गंर्भीयाने त्या धम्माचा अभ्यास करून तो प्रत्येक्ष आचरणात आणावयास पाहिजे होता. तसे घडले नाही परिणामी १९५६ नंतर बौद्ध समाज दोन्ही धर्मावर श्रद्धा ठेवून जगत राहिला आणि त्याचाच एक भाग अज्ञाना पोटी धम्मचक्र प्रवर्तन दिन हा १४ आँक्टोबर ऐवजी "विजया दर्शमी" या तिथीला साजरा करतो. ते चूकीचे आहे. १९५६ च्या धम्मचक्र प्रवर्तन नंतर आपण आंबेडकरी आदेश शिरसावज्ञा मानले आहेत. म्हणून १४ एप्रिल, ६ डिसेंबर हे दिवस तारखे प्रमाणे साजरे करतो. तसेच धम्मचक्र प्रवर्तन दिन हा सुद्धा १४ आँक्टोबर या तारखेला साजरा केला पाहिजे, असे माझे स्पष्ट मत आहे.

कलिंगात विद्यापिठाच्या १९७५ सालाच्या अभ्यास पथकाच्या निष्कर्षानूसार कलिंग युद्धापूर्वी सम्राट अशोक हा राजा होता व त्याला आपल्या राज्याच्या भौगोलिक प्रदेशाची आणि राज्याची माहिती होती. म्हणजे सम्राट अशोकाला भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना प्राप्त झालेली संबोधी आणि त्यांचे महापरिनिर्वाण या विषयी अगोदर पासून माहिती असावी. केवळ कलिंग युद्ध समाप्ती नंतर एका भिक्खूच्या उपदेशामूळे त्याचे डोळे उघडले व त्याला हजारो - लाखो सैनिक मारल्याचा पश्चाताप होऊन त्याने बौद्ध धम्म स्विकारला असे झालेले नसावे, कारण या घटने नंतर (युद्धानंतर) व त्याने आठ वर्षानी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली आहे.

इ. स. पू. २६२ मध्ये कलिंग युद्धात मिळविलेल्या विजयाचा दहावा हा अश्विन महिन्यात शुक्ल पक्षातील दहावा दिवस होता व अश्विन हा महिना पश्चात कल्पने नूसार आँक्टोबर महिना येतो. म्हणून इ.स.पू. २६२ च्या अश्विन शुध्द दर्शमी पर्यत सोलर कँलेडर नूसार मागे गेल्यास तो दिवस १४ आँक्टोबर येतो. हे संशोधनाने सिद्ध झालेले आहे. अश्विन महिन्यात भरपूर पाऊस झालेला असावा. कारण या युद्धाचे वर्णन "हाडमासाचा चिखल आणि रक्ताचे घाट वाहिले" असे केले जाते ते अतिश्योक्ती पूर्ण वाटते. खरे म्हणजे पावसाने झालेल्या चिखलात सैनिकांचे मृत्यू देह विरखूळलेले असावेत आणि पूर आल्याने नदीत रक्त मिसळलेले गेल्याने पूराच्या पाण्याला लाल रंग आला असावा. हे वास्तूस्थिती दर्शक वाटते आणि हे सर्व वर्णन आँक्टोबर महिन्यात होण्याऱ्या पावसाळी वाट वर्णनाशी जुळते. म्हणजे यावरून हेच सिद्ध होते कि, अशोक विजया दर्शमीचा दिवस १४ आँक्टोबर १९५६ या दिवशी विजया दर्शमी होती म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी तो दिवस निवडला. हे हि खरे कि, असले तरी इतिहासाची नोंद तारखांनी होते. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्राची तारिख ती नोंद १४ आँक्टोबर १९५६ या तारिखेचीच राहिल. यात वाद नाही. २३ सप्टेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांनी प्रेस ट्रस्ट आँफ इंडिया (Press Trust of India - PTI) यासारख्या वृत्त संथ्यांना दिक्षेची तारीख १४ आँक्टोबर १९५६ निश्चित केली असल्याचे कळवले होते. परंतू तो दिवस दसरा असल्याचे नमूद केले होते.

ते वाक्य असे होते -
"It Will Talk Place At Nagpur On The Dussehara Day, i.e. 14th Octobar, 1956. The Ceremony Of Conversion Will Take Place Between 9 to 11 A.M.

अनुवाद -
धर्मांतराचा सोहळा नागपूर येथे दसऱ्याच्या दिवशी, ता. १४ आँक्टोबर १९५६ रोजी, वेळ सकाळी ९ ते ११ वाजण्याच्या दरम्यान आयोजित होणार आहे.

असे नमूद असल्यामूळे त्या दिवसी दसरा होता. म्हणून तो दिवस निवडला हे तर निश्चितच आहे. परंतू १४ आँक्टोबर हि तारिख निश्चित करण्या मागचे कारण होते आणि मला वाटते. हे कारण खूपच महत्वाचे आहे. बौद्ध विद्वान J. F. Flit (जे. एफ. फ्लीट) आणि P. L. Narasu (पी. एल. नरासू) यांनी बुद्धांच्या महापरिनिर्वाणाची तारिख १३ आँक्टोबर दिली आहे. तसेच वामनराव गोडबोले यांनी हि त्यांच्या पुस्तकात दिलेल्या माहिती नूसार ख्रिस्ताच्या जन्माच्या ४८३ वर्षापूर्वी १३ आँक्टोबर या तारखेस भगवान बुद्ध कूशीनगर येथे सांयकाळी पोहचले होते व तेथेच सकाळी २ - ४ च्या दरम्यान म्हणजे चौथ्या यामात त्यांचे "महापरिनिर्वाणास" २५०० वर्ष होतात व चंद्रावर आधारित कँलेडर सुर्यदया पूर्वी जरी ती १४ तारिख झाली अश्या प्रकारे ती तारिख निवडल्या मागे बुद्धांचे महापरिनिर्वाण हे विशेष प्रयोजन होते. हे ही विसरून चालणार नाही.

भारतीय काल मापन पद्धती व पश्चात्य पद्धती हि शाल वाहन शके, विक्रम संवत चंद्राच्या गतीवर आधारित असल्याने, चंद्र वर्षाप्रमाणे येणाऱ्या तिथी नूसार घेतली जाते. त्यात कृष्ण पक्ष, शूक्ल पक्ष, अमावस्या आणि पौर्णिमा येतात. त्याला आपण लूणार कँलेडर (पंचाग) म्हणून ओळखतो. तर पाश्चत्य काल मापन पद्धत ही सूर्याच्या गतीवर आधारित असल्याने तिला आपण सौर वर्ष (सुर्य वर्ष) कँलेडर म्हणून ओळखतो व ते येशू ख्रिस्ताच्या जन्मापासून तारखे नूसार गणली जाते. म्हणजेच तिला सोलर कँलेडर ही म्हटले जाते. चद्र वर्षावर आधारित तिथीनूसार वर्षाचे ३६० दिवस होतात, तर पाश्चत्य कालगणनात वर्षाचे ३६५ दिवस होतात. म्हणजे तिथी व तारिख यात खूप अंतर आहे. या सर्व पर्श्वभूमीवर १४ आँक्टोबर हि तारिख आणि विजया दर्शमी हि तिथी याचा विचार केल्यास आपणास दिसून येते कि, "अशोक विजया दर्शमी आणि दसरा" हे प्रत्येक वर्षी एकाच दिवशी येईलच असे नाही. अभ्यासात असे दिसून आले आहे कि, विजया दर्शमी आणि आँक्टोबर हे दिवश दर १९ वर्षानी एकाच दिवशी येतात. कारण १४ आँक्टोबर १९५६ नंतर असा योगायोग २०१३ ला आला होता. आता पून्हा २०३२ साली येण्याची शक्यता नकारता येत नाही.

नागपूर येथील १४ आँक्टोबर १९५६ च्या धम्म दिक्षा सोहळ्याचा पहिला वर्धापन दिन त्या १४ आँक्टोबर १९५७ ला साजरा व्हायला पाहिजे. पण त्या वर्षाची विजया दर्शमी अगोदर म्हणजे ३ आँक्टोबर रोजी आली. म्हणून नागपूरच्या राजकीय नेत्यांनी विजया दर्शमीच्या दिवशीच धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करून चूकीची प्रथा पाडली. तसेच शासनाने ही १४ आँक्टोबर ऐवजी विजया दर्शमीलाच सार्वजनिक सूट्टी जाहिर करण्याची प्रथा सूरू केल्याने लोक विजया दर्शमीलाच धम्मचक प्रवर्तन दिन समजून दिक्षा भूमीवर जमले व तेव्हापासून (दसरा) हा पारंपारिक सण म्हणजेच "धम्मचक्र प्रवर्तन दिन" अशी समाजाची धारणा झाली व आजत गाजत ती प्रथा सुरूच आहे. तिथे महत्वाची एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे कि, आंतरराष्ट्रीय स्तरावर धम्मचक्र प्रवर्तन दिनाची नोंद ही १४ आँक्टोबर अशीच झालेली आहे. कारण भारता शिवाय इतर राष्ट्रामध्ये विजया दर्शमी हि तिथी कुणालाच माहित नसणार. जापान, चीन, थायलँड, श्री लंका इतर बौद्ध धर्मीय राष्ट्रांचा राष्ट्री विजया दर्शमी तिथीशी संबंध नसल्यामुळे त्याच्या ४ ते १४ हि तारिख धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरातील १४ आँक्टोबर या तारखेचे महत्व लक्षात घेऊन हाच दिवस आपण "धम्मचक्र प्रवर्तन दिन" मानला पाहिजे व साजरा केला पाहिजे.

आजच्या काही वृत्तपत्रा मध्ये या सदर्भात काही लेख वाचण्यात आले. त्यात म्हटले आहे कि, १९५० ते १९५६ या काळात डाँ. बाबासाहेब आबेडकरांनी बुद्ध जंयती तिथीनूसार साजऱ्या केल्या, हे खरे आहे. याच कारण १९५० ते १९५६ हा सहा वर्षाचा काळ बौद्ध धम्माच्या बीजा रोपनाचा काळ आहे. या काळात बाबासाहेब "बुद्ध आणि त्यांचा धम्म" या ग्रंथाचे लिखाण करित होते. त्यामूळे भगवान बुद्धांच्या जंयतीतील पौर्णिमेचे किती महत्व आहे, हे त्यानी जाणले होते. म्हणूनच त्यानी बुद्ध जंयती पौर्णिमेच्या तिथीवर साजरा केल्या. डाँ. बाबासाहेब आंबेडकर हे भगवान बुद्धाच्या विचारांनी आणि सम्राट अशोकाच्या प्रचार कार्याने प्रभावित झाले होते. तसेच आज २१ व्या शतकात आपण बाबासाहेबांच्या विचारांनी आणि कार्याने प्रभावित झालेले आहोत. म्हणून आपण आंबेडकरी विचार आणि आदेश शिरसावज्ञा मानले पाहिजे. त्यामूळेच दूसरे असे कि, दसरा हा मूळचा बौद्धांचा सण आहे, हे खरे असेल तरी किती बौद्ध धर्मीयांना दसऱ्या मधील दहा आचारसंहिता ज्ञात आहे? आणि किती लोक दसरा सण बौद्ध पद्धतीने पाळतात? उलट असे दिसून येते कि, धम्मा विषयी अज्ञान असल्याने अनेक बौद्ध बांधव धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा उद्देश समजून न घेता. दसरा हिंदूचा पांरपारिक सण म्हणून घरात "घट" बसवितात. सोने म्हणून एका विशिष्ट आपटा झाडाची पाने वाटत फिरतात. शस्त्राची (हत्यारे) आणि चिमोल्लोधन म्हणून घरातील कर्त्या पूरूषाला ओवाळतात, हे गैर आहे. तसेच दूसऱ्या एका वृत्तपत्रात म्हटले आहे कि, १९५७ पासून आज पर्यंत आपण विजया दर्शमी - धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा करतो. म्हणून येथून पुढे ही त्याच दिवशी साजरा करावा असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे. पण मग बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा १९५७ पासून आपण प्रामाणिकपणे पाळतो आहोत का? त्याचे मनापासून कोरकोरपणे पालन करतो का? आपल्यातील अनेक लोक आज ही देव - देवतांची पूजा करताहेत. हे योग आहे का?

धम्म जर परिवर्तनशील आहे. असे आपण म्हणतो तर संशोधकांना ज्या क्षणी योग विचार सापडला. तो बुद्धत्वाचा क्षण मानून नवीन विचार स्विकारने आपले कर्तव्य आहे. काही अभ्यासकांच्या व विचारवंताच्या मते बाबासाहेबांची जंयती आपण संपूर्ण महिने साजरी करतो, त्याच प्रमाणे "धम्मचक्र प्रवर्तन दिन" सूद्धा १४ आँक्टोबर या तारखेला व विजया दर्शमी या दोन्ही प्रकारे साजरा करावा. त्यात वाद विवाद करत बसू नये. या पेचातून खर तर मध्यम मार्ग काढणे फार महत्वाचे आहे. खर तर धम्मचक्राला एका दिवसापूर्ती गती द्यायची नसून गती देण्याची क्रिया नंतर चालू ठेवली पाहिजे. असे मला मनापासून वाटते. व त्यासाठी समस्त बहूजनांनी व विशेषत तरूणांनी भरिव कार्य ही करावयास हवे.

❖❖❖

आवाहात्मक एवं मार्गदर्शक लेख -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••◆●◆•◆●◆••

• YATIN JADHAV :
9967065953 WhatsApp number

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।