गुरुवार, ३ जानेवारी, २०१३

भारतीय राज्य घटना


राज्यघटनेची साठी


भारतीय प्रजासत्ताक आज 60 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. भारतीय राज्यघटनेसही 60 वर्षे पूर्ण झाली आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील मसुदा समितीने तयार केलेली राज्यघटना दोन वर्षे, 11 महिने, 18 दिवसांनंतर 26 नोव्हेंबर 1949 रोजी अस्तित्वात आली. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राज्यघटनेची ही ठळक वैशिष्ट्ये...

* 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना अस्तित्वात.
* आतापर्यंत 94 घटनादुरुस्ती.
* उद्देशिकेत समाजवादी, धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य हे शब्द 42 वी घटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले.
* उद्देशिकेत राष्ट्राची एकता व एकात्मता हे शब्दही 42 वीघटनादुरुस्ती करून समाविष्ट करण्यात आले.

महत्त्वपूर्ण दुरुस्ती 
* 1 मार्च 1985 : पक्षांतरबंदी
* 28 मार्च 1989 : मतदानाच्या अधिकाराचे वय 21 वरून 18 वर.
* 12 डिसेंबर 2002 : सहा ते 14 वयोगटातील बालकांना शिक्षणाचा अधिकार.
* 1 जानेवारी 2004 : मंत्रिमंडळाचा आकार लोकनियुक्त सभागृहाच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15 टक्के करण्याचा निर्णय.
* 20 जानेवारी 2006 : इतर मागासवर्गीयांना सरकारी; तसेच खासगी शिक्षण संस्थेमध्ये आरक्षण.

मूलभूत हक्क* समानतेचा हक्क : कायद्यापुढे सर्व समान. धर्म, जात लिंग, जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून भेदभाव करता येणार नाही.
* राज्याच्या नियंत्रणाखालील कोणत्याही पदावरील सेवायोजन किंवा नियुक्ती यामध्ये सर्वांना समान संधी.
* भारताचा कोणताही नागरिक कोणत्याही देशाकडून कोणताही किताब स्वीकारणार नाही.
* राष्ट्रपतींच्या संमतीशिवाय लाभाच्या पदावरील व्यक्ती परकीय देशाकडून किताब स्वीकारणार नाही.

स्वातंत्र्याचा हक्क
* भाषण, अभिव्यक्ती, शांततेने विनाशस्त्र एकत्र जमण्याचा, अधिसंघ वा संघ बनविण्याचा, भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा, भारताच्या कोणत्याही भागात राहण्याचा वा स्थायिक होण्याचा, कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणताही व्यवसाय, व्यापार किंवा धंदा चालविण्याचा हक्क.
* शिक्षणाचा हक्क : वय 6 ते 14 वयाच्या बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाची तरतूद (2003 मध्ये 86 वी सुधारणा).
* वेठबिगारी, बालकांना कामाला ठेवण्यास मनाई : 14 वर्षांखालील बालकांना कामावर ठेवण्यास मनाई.
* सदसद्विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण, आचरण व प्रचार.

सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क * भारताच्या राज्यक्षेत्रात किंवा त्याच्या कोणत्याही भागात राहण्याचा, आपली स्वतःची वेगळी भाषा, लिपी वा संस्कृती असेल त्याला ती जतन करण्याचा हक्क असेल.


२६ जानेवारी : गुणवत्तापूर्ण प्रजासत्ताकासाठी


भारतीय राज्य घटनेनुसार मनुष्याला जन्मत:च मुलभूत हक्क प्रदान केले आहेत. या हक्कांचे संरक्षण करण्याची जबाबदारी आपल्या राज्य सरकारची असते. मुलभूत हक्कांमध्ये भाषण, संचार, शिक्षण, प्रचार स्वांतत्र्य इत्यादी अनेक अधिकार येतात. राज्य सरकार या हक्कांचे संरक्षण करण्यास असमर्थ असेल किंवा त्याचे उल्लंघन केल्यास न्यायपालिकेमार्फत आपल्याला न्याय मागता येतो. 

        राज्यघटना तयार करणार्‍या समितीने मुलभूत अधिकाराचा भारतीय राज्यघटनेत समावेश करून घेण्यासाठी तत्कालीन अनेक लोकशाही देशांच्या राज्यघटनेचा अभ्यास केला होता. उदाहरणार्थ, अमेरिका, ब्रिटन इत्यादी. त्यानंतर राज्यघटनेच्या परिशिष्ट 14-15-19-20-21 मध्ये या मुलभूत अधिकारांचा समावेश करण्‍यात आला व त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी न्यायपालिकेकडे सुपूर्द केली.

        सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशांनी राज्य घटनेच्या 9 व्या कलमात दुरूस्ती करून राज्य सरकारने निर्माण केलेल्या कायद्यामुळे एखाद्याच्या मुलभूत अधिकारावर गदा येणार नाही म्हणून अशा कायद्यांचा राज्यघटनेच्या 9 व्या परिशिष्टात समावेश केला जाईल असा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. जर राज्य सरकारने तयार केलेल्य एखाद्या कायद्यामुळे या अधिकारांचे हनन होत असेल तर न्यायपालिका 9 व्या परिशिष्टात असलेला कायदा बरखास्त करू शकते असेही सांगण्यात आले होते.

        देशात १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्‍यात आली होती. तेव्हा हाच प्रश्न उपस्थित झाला होता. तत्कालीन सरकारने आणीबाणीची घोषणा करून मुलभूत अधिकारावर बंधने आणली होती. तसेच, देशाअंतर्गत सुरक्षेचे कारण सांगून लाखो लोकांना अटक केली होती.

        त्यावेळी या कायद्याअंतर्गत अटक केलेल्या लोकांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली होती. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने राजकीय वाद, हा कायद्याशी सुसंगत नसल्याचे सांगून त्यामध्ये हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता. कदाचित केंद्र सरकारप्रती धर्मनिष्‍ठा किंवा भीती हे एक कारण असू शकते.

        काही अधिकार देण्यास अडचणी निर्माण होतील म्हणून घटनाकारांनी सरकारला अधिकार देण्‍याचा हक्क दिला होता. स्वातंत्र्यानंतर देशाची प्रशासन व्यवस्था मजबूत नव्हती. त्यामुळे या अधिकाराचा सक्षमरीत्या वापर करू शकले नाहीत. म्हणून घटनाकारांनी काही महत्त्वाच्या अधिकाराला मार्गदर्शक तत्त्वे सांगून सरकारला या अधिकाराची अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. स्वातंत्र्यानंतर येणार्‍या १०-१५ वर्षांत हे अधिकार नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे सांगितले होते.

        मार्गदर्शक तत्त्वात मानले गेलेले अधिकार कल्याणकारी होते. लोकशाही देशात, नागरिकांच्या मुलभूत अधिकाराप्रमाणे होते. केवळ सरकारला या अधिकाराची अंमलबजावणी करण्याचे बंधन होते. सरकार या मार्गदर्शक तत्त्वांची लवकरात लवकर अंमलबजावणी करेल.

        मुलभूत अधिकाराचे संरक्षण करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. परंतु, सर्वोच्च न्यायालय व मानव अधिकार आयोग शक्तीशाली मानले जातात. अनेकवेळा या संस्थांनी मानवाच्या मुलभूत अधिकारासंबंधी काही महत्त्वाचे ऐतिहासिक निर्णय दिले आहेत. परंतु, सामान्य लोकांवाटते की या संस्था उच्चवर्गीयांना जास्त महत्त्व देतात आणि हे राज्य घटनेने दिलेल्या मुलभूत अधिकाराच्या विरूद्ध आहे.

        नागरिकांच्या प्राथमिक गरजेनुसार शिक्षण, पाणी, आरोग्य, स्वच्छता, प्रदुषणमुक्ती इत्यादी जे मानवाधिकार किंवा मुलभूत गरजा आहेत. त्यांना स्वातंत्र्यानंतर म्हणजे २६ जानेवारी १९५० ला राज्यघटनेची अंमलबजावणी झाल्यापासून येत्या १५-२० वर्षात मुलभूत अधिकाराचा दर्जा दिला जाईल, असे सांगण्यात आले होते. परंतु, यासाठी प्रयत्न करण्‍याचे दूरच पण हे अधिकार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारने काही विशेष असे प्रयत्नही केले नाहीत.


रविवार, ३० डिसेंबर, २०१२

एक अनिर्णीत लढाई




शौर्य, ध्येय, कर्तव्य - भीमा - कोरेगावची अनिर्णीत लढाई
( १ जानेवारी १८१८ )


                                   दिनांक 1 जानेवारी 1818 रोजी पुण्याजवळ भी ा नदीच्या काठी कोरेगाव येथे दुसरा बाजीराव पेशवा याच्या नेतृत्वाखालील मराठी फौजेची आणि ब्रिटीश सैन्याची लढाई घडून आली. या लढाईविषयी उपलब्ध मराठी संदर्भ ग्रंथांमधून जी काही माहिती मला मिळाली, त्या माहितीच्या आधारे या लढाईचे विश्लेषण करण्याचा या ठिकाणी एक प्रयत्न करण्यात आला आहे.


 भीमा - कोरेगाव


पार्श्वभूमी :-                   दुसरा बाजीराव पेशवा याने स. 1817 च्या उत्तरार्धात इंग्रजांच्या विरोधात युद्ध पुकारले. यावेळी खडकी आणि येरवडा येथे ब्रिटीश आणि मराठी फौजांचा सामना घडून आला व पेशवा पुणे सोडून गेला. बाजीरावाने पुणे सोडल्यामुळे इंग्रजांनी पुणे शहर आपल्या ताब्यात घेतले व शनिवारवाड्यावर आपले निशाण फडकावले. इंग्रजी फौजांशी निर्णायक झुंज न घेता बाजीराव आपल्या सैन्यासह पुण्याच्या सभोवती घिरट्या घालत असताना भीमा नदी जवळ कोरेगाव येथे त्याची व इंग्रजी फौजांची एक लढाई घडून आली. इतिहास ती कोरेगावची किंवा भीमा - कोरेगावची लढाई म्हणून प्रसिद्ध आहे. 


 भीमा - कोरेगाव
                                1) बाजीराव नासिककडे न जातां ओझरचा घाट उतरून जुन्नर खेडावरून ता. 30 डिसेंबर रोजीं चाकण येथें येऊन पोंचला, अशी बातमी स्मिथ यास कळली. त्याचे पूर्वी कोंकणांतून मुंबईकडून इंग्रज फौज येत होती तिला गांठावें किंवा पुण्यावर येऊन ते शहर एकदम हस्तगत करावें असा बाजीरावाचा बेत असल्याचें स्मिथ यास दिसून आलें, दोन्ही गोष्टी इंग्रजांस बिकटच होत्या. पुण्यास इंग्रजांचा बंदोबस्त अगदींच तात्पुरता होता. .... ..... ....... का बर पुण्याचे बंदोबस्तास होता. त्यानें आपल्या मदतीस शिरूरहून जास्त फौज बोलावली होती, त्यावरून कॅ. Staunton थोडे इंग्रज सैन्य बरोबर घेऊन ता. 31 डिसेंबर 1817 रोजीं रात्रीं 8 वाजतां शिरूरहून निघा, तो दुसऱ्या दिवशीं सकाळी 10 वाजतां कोरेगांवजवळ येऊन उतरला. तेथील टेकडीवरून त्याला पेशव्याची प्रचंड फौज भीमा नदीच्या काठीं दिसली. Staunton ची बातमी बापू गोखल्यास होतीच.


                                  घोडनदीहून वरील इंग्रज फौज पुण्यास येत होती तिची बाजीरावाशीं अकस्मात गांठ पडली. बापू गोखल्यास श्रीमंतांनीं आज्ञा केली, कीं आज लढाई करून आम्हास पुढें जाण्यास मार्ग करून द्यावा. गांवास लहानशी तटबंदी होती तींत इंग्रज आश्रयार्थ गेले. त्यांजवर दुसऱ्या बाजूनें मराठ्यांनी तोफांचा मारा सुरु केला. जागा अडचणीची असल्यामुळे तोफा बंद करून मराठ्यांकडील आरबांनी व पायदळांनी इंग्रजांवर चालून घेतले. तेव्हा संगिनीचे व तरवारीचेच युद्ध झाले. इंग्रज शिकस्त झाले. त्यांचे पुष्कळसे ऑफिसर्स व लोक मारले गेले. रात्री 9 वाजेपर्यंत लढाई चालून पेशव्यांचे सैन्य आपल्या छावणीकडे परत आलें. इंग्रजांचे 175 जखमी झाले, त्यापैकी बहुतेक होतकरूच होते. मराठ्यांचे सुमारे 500 लोक पडले. थोडक्या लोकांनी पुष्कळांशी लढून आपला निभाव केल्याबद्दल कोरेगांव येथें इंग्रजांनी स्मारकाचा स्तंभ उभारला आहे. बाजीराव तर अगोदरच जेजुरीच्या वाटेने साताऱ्याकडे निघाला होता. पाठीमागून ज. स्मिथ येत असतां त्यास ओझरच्या घाटांत त्रिंबकजी डेंगळ्याच्या रामोशांनी इतके सतावून सोडले की ता. 2 जानेवारी रोजी जेमतेम तो चाकणला येऊन पोंचला. त्याच दिवशी कॅ. Staunton जखमी झालेले लोक व उरलेली फौज बरोबर घेऊन परत शिरूरच्या छावणीत गेला.' (संदर्भ ग्रंथ - मराठी रियासत खंड 8)

 भीमा - कोरेगाव
                                  2) दुसरे दिवशी पेशव्यांनीं तेथोन कुच करून मुळा नदीस मुकामास आले. आणि पुढें न जातां परत ब्राम्हणवाड्यास आले. आणि जुनरास जाऊन फुलगावावर मुकाम झाला. तेथोन कुच करून पुन्हा सालप्याच्या घाटानें करनाटकांत जाण्याचा विचार ठरविला. कुच करून राजवाडीस मुकामास जावें असा विचार होता, तों प्रथम प्रहर दिवसाचे आंत नगराहून पुण्यास जाण्याकरितां इंग्रजाची फौज एक पलटण व दोनशें स्वार व दोन तोफा घेऊन कोरेगावास मुकामास आले. तेथून फुलगावीं एक कोसावरच पेशव्याचा मुकाम आहे हें त्यांस माहित नव्हते. व पेशव्यांकडील फौजेनें इंग्रजांकडील फौज कोरेगावावर आलेली पाहून त्यांजवर धावा केला. इतक्यांत त्या पलटणींतील साहेबांनी जलदी करून कोरेगावांतील दोनतीन वाड्यांत शिरून तोफ चालू करून पलटणी लोक फेरा मारू लागले. तेणेंकरून पेशवे याजकडील लोक अजमासे दीडशे व इंग्रजाकडीलही सुमारे चारशांवर मेले व जखमी झाले असतील. याप्रसंगी बापूसाहेबानीं बहूत शूरत्व केले. इंग्रजी फौज ही धैर्य धरून अस्तमानपर्यंत लढत होती, रात्र झाल्यावर पेशवे यांजकडील फौजेनें इंग्रजी फौजेला सोडून राजेवाडीस मुकामास गेले. ' ( संदर्भ ग्रंथ :- सरदार बापू गोखलेच्या विषयी लिहिलेल्या दोन बखरींच्यापैकी विठ्ठल पुणेकर लिखित बखरीमधील हा उतारा आहे. सदर बखरीतील उतारे श्री. सदाशिव आठवले यांच्या ' सरदार बापू गोखले ' या ग्रंथात छापले आहेत. विठ्ठल पुणेकर यांनी बापू गोखले विषयीची बखर कधी लिहिली याविषयी माहिती मिळत नाही. त्यामुळे या बखरीत कोरेगाव येथील लढाईच्या संदर्भात जी काही माहिती आलेली आहे त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हे एक कोडंच आहे. परंतु, कोणत्याही बखरीतील सर्वच माहिती सर्वस्वी टाकाऊ नसते हे इतिहासप्रेमी वाचकांना आणि अभ्यासकांना माहिती आहेच. त्यामुळेच या बखरीतील उपरोक्त उतारा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला आहे. )
 भीमा - कोरेगाव
                      3) ब्राम्हणवाड्याहून पेशवा पुन्हा पुण्याच्याच रोखाने निघाला तो ता. 30 डिसेंबर 1817 रोजी चाकण येथे आला. मात्र तेथून बापूच्या सूचनेमुळे असो किंवा स्वतःच्याच लहरीप्रमाणे असो पुण्याकडे न जाता जवळपासच पण दुसऱ्याच कोणत्यातरी स्थळाकडे चालू लागला. बाजीराव पुण्यास जाणार, त्याचेबरोबर चांगला फौजफाटा असणार, तिथे कदाचित त्याला आणखी लोक सामील होणार आणि आपला पुण्यावरचा ताबा सुटणार अशी भीती वाटून इंग्रजांची एक फौज शिरूरहून कॅ. Staunton ह्याचे नेतृत्वाखाली पुण्याकडे निघाली. पुण्यास कर्नल बर होता, पण त्याच्याकडे सैन्यही फारसे नव्हते आणि युद्धसामग्रीही बेताचीच होती. कॅप्टन Staunton ची फौज ता. 1-1-1818 रोजी कोरेगावास पोचली तेव्हा पेशव्यांच्या फौजेचा तळ तेथे आधीच पडलेला होता. तिचे आधिपत्य अर्थात बापूकडेच होते. बापूने पेशव्यास साताऱ्याकडच्या मार्गाला लावले आणि स्वतः कोरगावी इंग्रजांविरुद्ध मोर्चेबांधणी सुरु केली. बापूने प्रथम तोफांचा मारा करण्याचे योजिले, परंतु इंग्रजांनी आडोशाच्या सुरक्षित जागा शोधल्यामुळे ते गोळ्यांच्या टप्प्यात येत नाहीत हे लक्षात येताच त्याला युद्धतंत्र बदलावे लागले. बंदुका आणि तलवारी हाती घेऊन मराठे पुढे धावले. इंग्रजांनी चांगला प्रतिकार केला ह्यात शंका नाही. तथापि ह्या ठिकाणी इंग्रजांना काय किंवा मराठ्यांना काय मोठे निकाली युद्ध कोणालाच करायचे नव्हते. इंग्रजांना हे मार्गातील संकट पार करून पुढे पुण्याकडे जावयाचे होते, तर बापूला त्यांना अडवून धरून पेशव्यास दूर जाण्यास अवसर द्यावयाचा होता. दोघांचेही हेतू सिद्धीस गेले. ता. 4 जानेवारी 1818 च्या एका बातमीपत्राप्रमाणे त्या तारखेपर्यंत बाजीराव फुलगावला मुक्कामाला आलेला होता.' ( संदर्भ ग्रंथ :- सरदार बापू गोखले - लेखक :- सदाशिव आठवले )



विश्लेषण :-                   कोरेगावच्या लढाई विषयी मराठी रियासत आणि सदाशिव आठवले यांचे सरदार बापू गोखले हे पुस्तक फारसे विश्वसनीय असल्याचे दिसून येत नाही. तुलनेने विठ्ठल पुणेकर लिखित बापू गोखल्यांची बखर या ठिकाणी अधिक विश्वसनीय अशी वाटते. याचे कारण म्हणजे, बखर लेखकास कोणत्याही पक्षाचे गुणगान करण्यापेक्षा आपल्याला जी माहिती ज्ञात आहे ती लिहून काढणे गरजेचे वाटत होते. त्याउलट सरदेसाई आणि सदाशिव आठवले यांचे लेखन गोंधळात टाकण्यासारखे असल्याचे दिसून येते. कोरेगाव येथील लढाईमध्ये मराठी फौजेचा विजय झाल्याचे सरदेसाई अप्रत्यक्षपणे नमूद करतात परंतु त्यासोबतच इंग्रजांनी मोठ्या शर्थीने आपला बचाव केल्याचे आणि लढाईमधून बाजीराव पेशवा पळून गेल्याचेही त्यांनी नमूद करून वाचकांचा गोंधळ मात्र उडवून दिला आहे.

                                  सदाशिव आठवले यांनी दिलेली माहिती देखील जवळपास अशीच आहे. त्यांच्या मते हि लढाई एकप्रकारे अनिर्णीत अशी होती. इथपर्यंत ठीक आहे परंतु, 4 जानेवारीच्या बातमीपत्राचा हवाला देत ते लिहितात कि त्या तारखेपर्यंत बाजीरावाचा मुक्काम फुलगावी होता हे काही पटत नाही. याचे कारण म्हणजे फुलगाव हे स्थळ चाकण आणि भीमा - कोरेगाव यांच्या दरम्यान असून या ठिकाणाहून भीमा कोरेगाव अगदीच जवळ म्हणजे 8 - 10 किलोमीटर्सपेक्षाही कमी अंतरावर आहे. बाजीराव पेशव्याच्या पाठीवर जनरल स्मिथची फौज असल्याचे खुद्द आठवले यांनीच लिहिले आहे आणि असे असूनही कोरेगावची लढाई झाल्यावर बाजीरावाचा मुक्काम 4 जानेवारी रोजी फुलगावी होता असे ते लिहितात याला काय म्हणावे ? याउलट विठ्ठल पुणेकर लिखित बखरीमधील माहिती विश्वसनीय वाटते कि लढाई झाल्यावर मराठी फौजा राजेवाडीस निघून गेल्या. राजेवाडी हे स्थळ जेजुरीच्या जवळपास असून भीमा - कोरेगावच्या युद्धक्षेत्रापासून सुमारे 30 - 40 किमी. अंतरावर आहे.
 भीमा - कोरेगाव


                                   भीमा - कोरेगाव येथे पेशव्याची आणि ब्रिटीश फौजेची लढाई घडण्यापूर्वीच्या घटनांचा परत एकदा थोडक्यात आढावा घेणे गरजेचे आहे. खडकी आणि येरवडा येथील लढाया झाल्यानंतर बाजीराव पुणे शहर सोडून निघून गेला. त्याच्या पाठीवर जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली ब्रिटीश फौजेची एक तुकडी होतीच. स्मिथच्या फौजेला पाठीवर घेऊन बाजीराव पुण्याच्या आसपासच्या दीड - दोनशे किलोमीटर्सच्या परिघात पळत होता असे म्हटल्यास वावगे ठरू नये. ब्रिटीश सैन्याचा एखाद्या ठिकाणी ठासून उभा राहून पराभव करण्याची त्याची इच्छा होती कि नव्हती या वादात या ठिकाणी तरी शिरण्याचे काही प्रयोजन नाही परंतु, इंग्रजांच्या सैन्याशी मोठी लढाई देण्याचे तो टाळत होता हे एक उघड गुपित आहे. कोरेगावची लढाई घडून येण्यापूर्वी बाजीराव जुन्नरच्या आसपास ब्राम्हणवाडा येथे मुक्कामास होता. तेथून तो पुण्याच्या दिशेने निघाला असला तरी पुण्याला जाण्याची त्याची इच्छा कितपत होती याविषयी शंकाच आहे. जनरल स्मिथ हा पेशव्याच्या पाठलागावर होताच. त्याला रोखून धरण्याची कामगिरी बहुतेक त्रिंबकजी डेंगळेवर सोपवण्यात आलेली होती असे दिसून येते. अर्थात, हे कार्य दुसऱ्या कोणत्यातरी सरदारावर देखील सोपवले असावे. असो, ब्राम्हणवाडा येथून बाजीराव पुण्याचं दिशेने निघाला. त्याच्या हेतूंची / बेताची इंग्रजाना अजिबात कल्पना नव्हती असेच म्हणावे लागते. मुंबईची इंग्रज फौज पुण्याच्या दिशेने येत होती तिला अडवण्याचा पेशव्याचा बेत असावा किंवा पुणे शहर परत एकदा आपल्या ताब्यात घेण्याचा त्याचा हेतू असावा असा इंग्रजांचा समज झाला. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत बाजीरावाचे मनसुबे उधळून लावण्याचे त्यांनी ठरवले. पुण्यामध्ये इंग्रजांची फारशी मोठी फौज नव्हती. पुण्यातील इंग्रजांना त्वरीत कुमक करेल असे एक ठाणे जवळच होते व ते म्हणजे शिरूर हे होय ! या ठिकाणी असलेल्या इंग्रज फौजेस तातडीने पुण्यास जाण्याचा आदेश देण्यात आला. इकडे जनरल स्मिथ मराठी सैन्याचा प्रतिकार मोडून काढत बाजीरावास पकडण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करत होता. बाजीराव पेशवा ब्राम्हणवाडा येथून चाकणच्या पुढे फुलगावी मुक्कामास आला. शिरूर येथील ब्रिटीश सैन्यावर हल्ला करण्याची त्याची योजना नव्हती त्याचप्रमाणे पुण्यात जाण्याची देखील त्याची इच्छा नव्हती. नाहीतर चाकण येथून तो फुलगावी न जाता तडक पुण्याला जाऊ शकत होता. यावेळी पुण्यात इंग्रजांची फौज अगदीच अत्यल्प अशी होती. जर बाजीराव पुण्यावर चालून गेला असता तर पुणे शहराचे रक्षण त्यांच्या हातून झालेच असते असे म्हणता येत नाही. परंतु बाजीराव अथवा त्याचे सरदार अधिक व्यवहारी होते. जनरल स्मिथच्या नेतृत्वाखाली बडी इंग्रज फौज आपल्या पाठलागावर आहे याची त्यांना कल्पना होती. तसेच शिरूर येथे इंग्रजांची एक तुकडी मुक्कामाला असल्याची माहिती त्यांना होतीच. पुणे ताब्यात घेतल्यावर शिरूर येथील ब्रिटीश तुकडीचा बंदोबस्त त्यांना करावा लागला असता आणि तोपर्यंत ज. स्मिथ पुण्याजवळ येऊन ठेपला असता. किंवा असेही म्हणता येते कि एकाच वेळेस त्यांना ज. स्मिथच्या आणि शिरूर येथील ब्रिटीश सैन्याचा मुकाबला दोन आघाड्यांवर करावा लागला असता. हे सर्व लक्षात घेता पुणे ताब्यात घेण्याचं भरीस न पडता स्मिथ पासून शक्य तितके लांब जाण्याचाच निर्णय मराठी सरदारांनी किंवा पेशव्याने घेतला असे म्हणता येते.
BATTLE  OF  KOREGAON 

                                  त्यामुळेच पुणे उजव्या बाजूला टाकून फुलगावी येथे मराठी सैन्याचा तळ पडला. आधी सांगितल्यानुसार ब्रिटिशांना मराठी मुत्सद्यांच्या बेताची अजिबात कल्पना नसल्याने त्यांनी पेशवा कदाचित पुण्यावर चालून जाईल हि शक्यता गृहीत धरून शिरूर येथील ब्रिटीश तुकडीला पुण्याला जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार शिरूर येथील इंग्रज फौज कॅप्टन Staunton च्या नेतृत्वाखाली पुण्याच्या दिशेने रवाना झाली. शिरूर येथील ब्रिटीश फौज आपल्यावर चालून येईल अथवा त्या फौजेचा पुण्याला जाण्याचा बेत असावा अशी कल्पना मराठी सरदारांना होती कि नाही याविषयी ठामपणे सांगणे शक्य नाही. कारण, त्यांना जर तशी काही कल्पना असती तर भीमा - कोरेगाव नजीक त्यांनी नदीउतार रोखून धरण्याचा किंवा नदी पाठीशी घालून भीमा - कोरेगाव हे स्थळ काही काल आपल्या ताब्यात ठेऊन शिरूरच्या फौजेचा मार्ग रोखून धरण्याचा बंदोबस्त केला असता. परंतु त्यांनी असे काहीच केल्याचे दिसून येत नाही. यावरून शिरूर येथील इंग्रजी फौजेच्या बेताची त्यांना फारशी माहिती असल्याचे दिसून येत नाही. इकडे शिरूरच्या इंग्रज पथकाला पेशवा फुलगावी मुक्कामाला असल्याची बातमी मिळाली नव्हती असे दिसून येते. उपलब्ध माहितीवरून शिरूर येथील ब्रिटीश सैन्य 31 डिसेंबर 1817 रोजी सायंकाळी किंवा रात्रीच पुण्याच्या दिशेने रवाना झाला होते. साधारण 35 - 40 किमी. अंतर कापून हि फौज जेव्हा कोरेगाव जवळ येऊन पोहोचली त्यावेळी शत्रू सैन्याला समोर उभे असल्याचे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला असावा. परंतु, ब्रिटीश अधिकाऱ्यांनी प्रसंग ओळखून कोरेगाव ताब्यात घेण्याची चलाखी केली. मराठी फौजांनी जर यापूर्वीच कोरेगावचा ताबा घेतला असता तर इंग्रजांना या वेळी आपला बचाव करणे अतिशय अवघड गेले असते पण मराठी सरदार याबाबतीत फारच गाफील राहिले असे म्हणावे लागते. इकडे ब्रिटीश लष्कराची निशाणे दृष्टीस पडताच मराठी मुत्सद्द्यांत चलबिचल झाली असावी. कारण उपलब्ध माहितीवरून त्या दिवशी फुलगाव येथील मुक्काम उठवून साताऱ्याच्या दिशेने जाण्याचे त्यांचे आधीच ठरले होते व त्यानुसार बरीचशी मराठी पथके पुढे रवाना झाली होती. खुद्द बाजीराव पेशवा आणि बापू गोखले व इतर काही सरदार मागे राहिले होते. सातारचा छत्रपती प्रतापसिंह यावेळी बाजीरावासोबत होता कि मराठी सैन्यासह तो आधीच पुढे गेला होता याची चर्चा या ठिकाणी तशी अप्रयोजक आहे. कारण छत्रपती लढाईच्या ठिकाणी हजर असला काय आणि नसला काय दोन्ही सारखेच होते. असो, रात्रभर प्रवास करून दमलेली ब्रिटीश पथके कोरेगावात पोहोचली त्यावेळी सकाळचे 9 - 10 वाजून गेले होते. तरीही या ठिकाणी मराठी सैन्याशी लढाई दिल्याखेरीज आपला निभाव लागणे शक्य नसल्याचे त्यांनी ओळखले. माघार घेण्याचा किंवा पुढे पुण्याला जाण्याचा आता प्रश्नच नव्हता. कारण, मराठ्यांची सेना पुढे जय्यत तयारीनिशी सज्ज असल्याने पुणे तर दूरच पण सुरक्षितपणे माघार घेणे देखील शक्य नव्हते. असो, इकडे बाजीरावाने आपल्या सरदारांना ब्रिटीश फौजांशी लढण्याची आज्ञा दिली किंवा असेही म्हणता येईल कि मराठी सरदारांनी इंग्रजांना लढाईमध्ये गुंतवण्याचे ठरवून बाजीरावाला सातारा जवळ करण्याचा सल्ला दिला. दोनपैकी काय खरे असेल ते असेल, पण हे निश्चित कि कसलीही पूर्वकल्पना नसताना किंवा आगाऊ डावपेच आखलेले नसताना मराठी व इंग्रजी सैन्याला कोरेगाव येथे एकमेकांशी झुंजणे भाग पडले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर 

                                   मराठी सरदारांच्यापेक्षा इंग्रज अधिकारी संधी व भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेण्यात जास्त कुशल असल्याचे या लढाईत दिसून येते. रात्रभर प्रवास केलेला असूनही कोरेगाव हे स्थळ ताब्यात घेण्यात त्यांनी कमालीची तडफ दाखवली. यावेळी ब्रिटीश पथकांच्या सोबत तोफा असल्याने त्यांनी माऱ्याच्या जागा पाहून आपल्या तोफा पेरल्या. मराठी सैन्याचा तोफखाना आधीच पुढे गेल्याने त्यांना आपल्या तोफखान्याचे पाठबळ लाभू शकले नाही किंवा त्यांच्या लांब पल्ल्याच्या तोफा पुढे पाठवल्यामुळे मागे राहिलेल्या लहान तोफांचा या प्रसंगी मराठी फौजेला फारसा फायदा झाला नाही असे लढाईच्या उपलब्ध वर्णनावरून लक्षात येते. असो, कोरेगावात घुसलेल्या इंग्रजी फौजांचा समाचार घेण्याची किंवा त्यांना लढण्यात गुंतवण्याची जबाबदारी बापू गोखलेवर येऊन पडली होती. इंग्रजांनी गावाचा आश्रय घेतलेला असल्याने बापूला आपल्या तोफांनी इंग्रज पथकांना सडकून काढता आले नसावे. त्याउलट मराठी फौजा मोकळ्या मैदानावर असल्याने आणि ब्रिटीशांनी मोक्याच्या जागी तोफांचे मोर्चे उभारले असल्यामुळे त्यांच्या तोफा मराठी सैन्यावर आगीचा वर्षाव करत होत्या. इंग्रजांचा तोफखाना बंद पडला नाही तर आपल्या फौजेची बरीच हानी होईल हे ओळखून बापूने लष्कराला कोरेगावावर चालून जाण्याचा आदेश दिला. त्यानुसार मराठी पथके कोरेगावावर चालून गेली. परंतु, इंग्रज सैनिकांनी गावातील घरांचा आश्रय घेतलेला असल्याने त्यांच्यावर थेट चाल करणे किंवा हातघाईच्या लढाईत त्यांचा समाचार घेणे त्यांना शक्य झाले नाही.
 भीमा - कोरेगाव
                                कोरेगावात इंग्रज आणि मराठी सैनिकांची हातघाईची लढाई झाली कि नाही किंवा झाली असल्यास ती कधी झाली ? तसेच बापू गोखल्याने कोरेगाव ताब्यात घेण्यासाठी किती हल्ले चढवले व इंग्रजांनी ते कसे परतवून लावले याविषयी सध्या तरी लिहिणे मला शक्य नाही. कारण तितकी माहिती याक्षणी माझ्याकडे नाही. पुढेमागे याविषयी अधिक माहिती मिळाल्यास मी या लढाईचे तपशीलवार वर्णन जरूर देईन. या ठिकाणी लढाईनंतर नेमके काय घडून आले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे व माझ्याकडे जी काही माहिती उपलब्ध आहे त्यावरून असे अनुमान बांधता येते कि सदाशिव आठवले लिहीतात त्यानुसार हि लढाई अनिर्णीत राहिली. भीमा - कोरेगाव येथील लढाईमध्ये ना मराठी सैन्य जिंकले ना इंग्रज ! याचे कारण म्हणजे, युद्ध संपल्यावर सामान्यतः विजयी पक्ष रणांगणाचा ताबा घेतो ते या ठिकाणी घडून आले नाही. अर्थात काही अपवादात्मक प्रसंगी विजयी पक्षाला रणभूमी ताब्यात घेण्यात यश मिळत नाही किंवा काही कारणास्तव युद्धभूमी ताब्यात न घेता विजयी पक्षाला त्या ठिकाणाहून निघून जावे लागते हे गृहीत धरून देखील कोरेगाव येथे मराठी किंवा इंग्रजी फौजेचा विजय झाला असे ठामपणे म्हणता येत नाही. समजा, मराठी सैन्य जिंकले असे म्हणावे तर मुठभर इंग्रज फौजेची त्यांनी कत्तल वा लूट का केली नाही हा प्रश्न उद्भवतो. इंग्रजांच्या बाबतीत देखील हेच म्हणता येईल. कदाचित ब्रिटीश पक्षाच्या वतीने असेही समर्थन करता येईल कि, पूर्ण रात्र प्रवास केल्याने आणि दिवसभर युद्धाचा ताण पडल्यामुळे पराभूत मराठी सैन्याचा पाठलाग करणे त्यांना शक्य झाले नसावे. परंतु, हा मुद्दा देखील तितकासा पटण्यासारखा नाही. किंबहुना काहीकाळ हा मुद्दा जर मान्य केला तर पुढचा प्रश्न उद्भवतो कि, प्रतिहल्ल्यात किंवा माघार घेणाऱ्या मराठी सैन्याची त्यांनी कितपत हानी केली ? लढाईची उपलब्ध वर्णने लक्षात घेतली असता भीमा नदी पाठीशी घेण्यात दोन्ही पक्षांना अपयश आल्याचे दिसून येते. किंबहुना दोघांनाही नदी पाठीशी घेणे त्यावेळी जमले नाही. हे ध्यानात घेता कोरेगावातून माघार घेणाऱ्या व नदीपार करून पळून जाणाऱ्या मराठी सैन्याचा पाठलाग करून त्यांची कत्तल उडवण्याची संधी इंग्रजांनी का दवडली याची उकल होत नाही. म्हणूनच इंग्रज किंवा मराठी फौजा कोरेगाव येथे निर्णायक विजय मिळवू शकल्या नाहीत असे म्हणावे लागते.
महार रेजिमेंट 

                                 सूर्यास्तापर्यंत लढाई देऊन बापू गोखलेने जेजुरीच्या मार्गाने साताऱ्याच्या दिशेने कूच केले. लढाई चालू असताना बाजीराव पेशवा त्याच मार्गाने पुढे साताऱ्याच्या रोखाने गेला असल्याने त्याची पिछाडी सांभाळत त्याच मार्गाने जाणे बापूला भाग होते. कोरेगाव येथील लढाईमध्ये सहभागी घेतलेल्या मराठी सैन्याने जेजुरीच्या अलीकडे असलेल्या राजेवाडी या ठिकाणी आपला तळ ठोकला. हे ठिकाण कोरेगावपासून सुमारे 30 - 35 किलोमीटर्स अंतरावर आहे. कोरेगावच्या लढाईने बाजीराव पेशव्याच्या फौजेच्या अनेक उणीवा मात्र परत एकदा प्रकर्षाने जगासमोर म्हणा किंवा शत्रूसमोर आल्या असेच म्हणावे लागते. जरी या संघर्षात मराठ्यांची सर्व फौज सहभागी झाली नसली तरी इंग्रजांच्या एका पथकाचा निःपात करण्यात त्यांना आलेले अपयश ठळकपणे लक्षात येते. पाठीवर असलेल्या जनरल स्मिथच्या प्रचंड फौजेला रोखून धरण्याची जबाबदारी यावेळी मराठी सैन्याने किंवा काही इतिहासकार सांगतात त्यानुसार त्रिंबकजी डेंगळेने पार पाडली नसती तर कोरेगाव येथे बापू गोखलेच साफ निकाल लागला असता असेच म्हणावे लागते. असो, कोरेगावची लढाई झाल्यावर शिरूरहून पुण्याला निघालेली ब्रिटीश फौज, लढाई झाल्यावर दुसऱ्या दिवशी शिरूरच्या दिशेने मागे वळली. जर कोरेगावची लढाई त्यांनी जिंकली असती तर विजयी पथके जल्लोष करत थेट पुण्याला गेली असती आणि त्या शहरात आपल्या विजयाचा मोठा उत्सव त्यांनी केला असता. यामुळे पुण्यातील पेशव्याच्या व पेशवाईच्या समर्थकांना मोठीच दहशत बसली असती. परंतु कोरेगावात इंग्रजांचा विजय झाला नसल्याने त्यांनी पुण्याकडे जाण्याचे एकप्रकारे टाळले असेच म्हणावे लागते. या ठिकाणी आणखी एक मुद्दा असा उद्भवतो कि, जरी इंग्रजांचा कोरेगाव येथे पराभव झाला नसला तरी त्यांनी तसेच पुढे पुण्यात जाण्याचे का टाळले असावे ? माझ्या मते, जनरल स्मिथ 2 जानेवारी 1818 रोजी चाकण जवळ आल्याची बातमी मिळाल्यामुळे आणि कोरेगावच्या झुंजात ब्रिटीश सैन्याची बरीच हानी झाल्यामुळे तसेच नजीकच्या काळात तरी पुण्यावर बाजीरावाची स्वारी येण्याची शक्यता नसल्याने शिरूरहून आलेली ब्रिटीश पथके परत मागे फिरली असावीत.


                                  कोरेगाव येथे इंग्रजांनी जो काही स्तंभ अथवा स्मारक उभारले आहे ते ब्रिटीशांच्या विजयाचे प्रतीक आहे असे म्हणणे धाडसाचे आहे. शत्रूच्या तुलनेने त्यांची फौज अल्प असताना देखील मोठ्या शौर्याने आणि शिकस्तीने सामना करून त्यांनी आपला बचाव केला त्याबद्दल इंग्रजांना अभिमान वाटणे स्वाभाविक आहे. त्यामुळेच त्यांनी त्या ठिकाणी एक स्मारक उभारले असल्यास नवल नाही.

 भीमा - कोरेगाव

माझ्या जयभिमवाल्यांच्या शौर्याची साक्ष आहे हा विजयस्तंभ
धाडस तर सगळेच करतात

पण

धाडस अस कराव
की त्या इतीहासालाही भिती वाटावी
चुकुन कुठे तो काळ समोर आला तर त्या काळाचीही छाती फाटावी
रक्त तर सगळ्यांचेच सळसळते

पण

रक्त असे सळसळावे की रक्तातील धमन्या फाटाव्या
रक्त मातिवर सांडताच,मातीतुन अग्नीच्या ज्वाला उठाव्यात
मरतात तर सगळेच

पण

मरण्याची एक रित अशी ज्वलंत असावे की आपल्या मृत्युने मारना-याचे काळीज फाटले त्याची त्याला खंत वाटावी!!!

जयभिम

पेशवाईचा अंत करना-या त्या शुरविरांना माझी भावपुर्ण आदरांजली

मंगळवार, २५ डिसेंबर, २०१२

शिव रायाचा मृत्यु कि खून ?


शिवरायाचा मृत्यु कि खून ?




संभाजीराजे आणि सोयराबाई यांचे नातेसंबंध :-

१. सत्ताप्राप्तीसाठी शिवरायांचे कुटुंबात कोणत्याही प्रकारचा संघर्ष नव्हता. सोयराबाईनी संभाजीराजांना शेवटपर्यंत स्व:पुत्रा प्रमाणे सांभाळले. तर संभाजीराजे सोयराबाईना नेहमी " निर्मल मनाची आई " असे म्हणत.


२. सोयराबाई व शंभूराजे यांचे भांडण लावायचा प्रयत्न ब्राह्मण मंत्र्यांनी केला. पण त्यात त्यांना यश आहे नाही. या उलट संभाजीराज्यांनी स्वराज्याचे वाटणीस विरोध केला.


३. राजाराम यांना राजसाबाई यांचे पोटी पुत्र रत्न झाले . तेव्हा राजाराम यांनी पुत्राचे नाव संभाजी असे ठेवले
(१६९७ ) जर संभाजी व राजाराम यानमध्ये संघर्ष असता तर राजाराम यांनी मुलाचे नाव संभाजी असे ठेवले असते का ?



शिवरायांचा खून का व कसा झाला :--

हजारो वर्षांची ब्राह्मनी दादागिरी शिवाजीराजे व संभाजीराजे यांनी संपवली त्यामुळे ब्राह्मण आतून प्रचंड चिडले. म्हणून त्यांनी राज्यांचे कुटुंबात भांडण लावण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.


अपयश आले तरी मोरोपंत, अण्णाजी, राहुजी सोमनाथ थांबले नाहीत. शिवरायांना संपवायचेच हा पक्का निश्चय त्यांनी केला होता. आण्णाजी दत्तो रायगडाच्या पायथ्याशी पाचाडला थांबला होता. गडावर राहुजी सोमनाथ हा ब्राह्मण अधिकारी होता. रायगडाची संपूर्ण नाकाबंदी करण्यात आली. कसल्याही प्रकारचा सुगावा लागणार नाही याची दक्षता या तिघांनी घेतली. म्हणून या कटाचा संशय येऊ नये यासाठी मोरोपंत आणि अण्णाजी दत्तो घटनास्थळा पासून दूर थांबले होते. हत्त्या करण्याचा कट रचणारे, प्रवृत्त करणारे जवळ थांबत नसतात. या प्रसंगी राज्यातील अत्यंत महत्वाची माणसे गडावर नव्हती. संभाजीराजे पन्हाळा गडावर होते. सेनापती हंबीरराव माहिते हे तळबीड या ठिकाणी होते. ते राजगड पासून २५० किलोमीटर आहे. शिवाजी महाराज यांचे कुटुंबातील सर्व नातेवाईक हे पाचाडला होते. असा स्पष्ट उल्लेख शिवभारतमध्ये आहे. ( संदर्भ :- वा.सी.बेंद्रे लिखित श्री. छ. संभाजी महाराज )

तीन एप्रिलचा दिवस उजाडला तेव्हा शिवरायांचे भोवती ब्राहामानांचेच वलय होते. राहुजी सोमनाथने गडावरचे सर्व दरवाजे बंद केले. गडाची सर्व सूत्रे सोमनाथच्या ताब्यात होती. या सार्या परिस्थितीचा फायदा घेऊन शिवरायांवर विषप्रयोग झाला. संभाजीराजे व सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना राज्यांचे खुनाची माहिती समजणार नाही याची खबरदारी घेण्यात आली. राज्यांचा अंत्यविधी हा घाई घाईत उरकण्यात आला.




दहा वर्षाच्या राजारामला सिंहासनावर बसउन ब्राह्मण मंत्री सत्ता ताब्यात घेउ इच्छित होते. म्हणून त्यांनी दहा वर्षाच्या राजारामाच्या राज्याभिषेकाची बातमी फुटू न देता राज्याभिषेक उरकला. शिवरायांचा खून व राजाराम यांचा झालेला राज्याभिषेक चोरून लपउन केला गेला. हि बातमी रायगडावरून फुटणार नाही याची दखल घेतली गेली. लगेच ब्राह्माण मंत्र्यांनी संभाजीराजे यांना पकडण्याचे ( अटक) करण्याचे आदेशपत्र हंबीरराव मोहिते यांना दिले.... पण हंबीरराव यांना शिवरायांनी खाजगीत संभाजीला छत्रपती करा असे सांगितले होते. राजाराम हा दहा वर्षाचा आहे त्याला राजाकरणे हे स्वराज्य ब्राह्मण मंत्र्यांचे हातात देणे होईल अशी सूचना शिवरायांनी पूर्वीच " राजारामाचे सख्खे मामा सेनापती हंबीरराव मोहिते " यांना केली होती. हंबीरराव यांना ब्राह्माण मंत्र्यांचे पत्रं मिळताच त्यांनी संभाजीराजे यांना त्याची माहिती कळवली.


वरील प्रसंग सिद्ध करतो कि सोयराबाई यांचा सख्खा भाऊ हा स्वतःच्या भाच्याला छत्रपती करायची संधी डावलून स्वराज्याचे हित पाहतो. पहा नीट पहा विचार करा सोयराबाईया संभाजी विरोधक नव्हत्या याचा हा पुरावा नव्हे काय ? तरीही हा खून सोयराबाई यांनी केला अशी अफवा ब्राह्मणी इतिहासकारांनी नंतर उठवली.

जेव्हा शिवरायांचा खून झाला तेव्हा राज्यांचे वय हे अवघे ५० वर्ष होते. राज्यांना कोणताही असाध्य रोग नव्हता. ते प्रधीर्ग आजारी नव्हते. राज्यांची प्रकृती निरोगी होती. वयाचे ५० व्या वर्षी राज्यांना अनैसर्गिक मृत्त्यू येणे कदापीही शक्य नाही.





शिवरायांच्या मृत्त्यू बाबद संशय निर्माण करणाऱ्या काही बाबी :--
१. शिवरायांचे धर्म परिवर्तनाचे कार्य.


२. शिवरायांनी ब्राह्मणी वर्चस्वाला दिलेला शह.


३. रायगडावरील ब्राह्मण मंत्र्यांचा अंतर्गत विरोध.


४. तीन एप्रिलचे गडावरील संशयास्पद वातावरण.


५. शिवरायांचा घाई घाईत उरकण्यात आलेला अंत्यविधी.


६. पराक्रमी, विद्वान,चारित्र्यसंपन्न, जेष्ठपुत्र संभाजीराजे यांना धोका देऊन कोणतीही चूक नसताना कैद
करायचे आदेश देऊन.... दहा वर्षाच्या कनिष्ठ राजारामला घाई घाईत छत्रपती करण्यामागचा ब्राह्माण मंत्र्यांचा हेतू काय असावा ?


७. शिवरायांच्याखुनाची, राजारामाच्या राज्याभिषेकाची, माहिती गोपनीय ठेवण्या माघे ब्राह्माण मंत्र्यांचा काय हेतू होता ?


८. संभाजी महाराजांचे सांत्वन करण्यापेक्षा त्यांना अटक करायला गेलेले ब्राह्मणमंत्री यांचा हेऊ काय होता ?


9. या सार्या प्रकारा नंतर संभाजीराजे यांनी सोयराबाई यांना मान दिला, गौरवले व राजाराम महाराज यांना प्रेमाने वागवले....... तर ब्राह्माण मंत्री यांना कैद केले व पुढे त्यांना हातीचे पायाखाली देऊन ठार केले. हे काय दर्शवते


संभाजी महाराज यांना अटक करा व आम्हाला वाटेत भेटा असे आदेश ब्राह्माण मंत्र्यांनी हंबीरराव मोहिते यांना दिले होते .पण संभाजी महाराज यांना कपटाने कैद करायला निघालेल्या मंत्र्यांना ( मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत..) हंबीरराव यांनी वाटेतच अटक केले ! त्यानंतर संभाजीराजे हे रायगडावर आले त्यांनी सर्व मातांचे सांत्वन केले. 


सोयराबाई या निर्दोष होत्या हे सिद्ध करणारा एक भक्कम पुरावा म्हणजे संभाजीराजे २४ ऑगस्ट १६८० रोजी म्हणतात कि ' सोयराबाई या स्फटिका सारख्या निर्मल मनाच्या आहेत'. याचा अर्थ सोयराबाई या निर्दोष तर होत्याच पण त्या संभाजीराजे यांना आदर स्थानी होत्या. कुमंत्र्यांनीच सोयराबाई यांना संभाजी विरोधात भडकवण्याचा अयशस्वी प्रयत्न केला होता. [संधर्भ छ. संभाजी (पान २२१ ) वा. सी बेंद्रे.]



आता आपण शिवरायांचे मृत्युबाबत देशी आणि परदेशी साधनांचा विचार करू :--

पुढील संदर्भ साधनांची चिकित्सा करताना त्या साधनांचा काळ व कर्ता याचा विचार केलेला आहे. मराठी आणि संस्कृत साधनांचे लेखक हे ब्राह्मण या एकाच जातीचे असल्याने सत्यशोधनात अडचणी येतात. तरी देखील अपराधीपणाची जाणीव त्या साधनात सापडते.

सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......

१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "


२. पारसी कागदपत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्यावरून उतरले त्यांना अतिउष्णतेमुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "


३. निकोलोमनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "


४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संदर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विषप्रयोग केला असावा "



शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा खून झाला. शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? हे मात्र सारेच जाणत नव्हते कारण ब्राह्माण मंत्र्यांनी रायगडावरून वाराही बाहेर जाणार नाही याप्रकारे बंदोबस्त केला होता.

आता आपण मराठी -संस्कृत साधने पाहू :----

१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "


२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "


३. जेधे शकावली - " चैत्र शुद्ध शनिवार दिवसा दोन प्रहरी रायगडावर शिवरायांचे निधन झाले हंबीरराव मोहिते यांनी मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत यांना कैद केले."



चिटणीस बखर,शिवदिग्विजय या १८१८ सालच्या असल्याने समकालीन नाहीत. पण त्या विषप्रयोग झाल्याचे बोलतात. ब्राह्माण मंत्र्यांनी विषप्रयोग केला पण सोयराबाई यांच्या नावाने अफवा पसरवली. हे वरील साधनांवरून लक्षात येते.


जेधे शकावली हि दैनंदिनी असल्याने स्पष्टीकरण नाही पण त्यात निधनानंतर लगेच मंत्र्यांना अटक केल्याचे स्पष्ट होत आहे. मंत्र्यांनी खून केला म्हणून त्यांना अटक केली असा स्पष्ट अर्थ निघतो.

बहुजन सामाज्याची दिशाभूल करण्यासाठी नंतर काही ब्राह्माण इतिहासकरांनी शिवरायांचा मृत्यू हा " गुडघी रोगामुळे " झाला अशी अफवा पसरवली. (पण मित्रहो जगाच्या इतिहासात पूर्वी आणि आजही गुडघीरोग कोणालाही झाल्याचे उदाहरण नाही..) तर काही इतिहासकारांनी शिवरायांचा खून हा सोयराबाई यांनी केला असा कुप्रचार सुरु केला.

याचा स्पष्ट अर्थ काय निघतो ब्राह्माण हे अफवा पसरवण्यात, दिशाभूल करण्यात, कपटकारस्थानात, खून पचवण्यात जगात एक नंबर आहेत.

राज्यांचा खून पचावायासाठी ब्राह्मण कंपूने अनेक अफवा पसरवल्या. जनतेला खरे गुन्हेगार समजू नयेत खरे आरोपी सुटावेत यासाठी आजही ब्राह्माण खोटा प्रचार, दिशाभूल करत असतात.

शिवरायांचा खून पचउन स्वराज्य हस्तगत करायचा ब्राह्माण मंत्र्यांचा डाव होता त्यासाठी त्यांनी राजाराम यांचा राज्यभिषेक घाई घाईत उरकला.

कारण राजाराम हे १० वर्षाचे बालक होते. राजारामला नामधारी राजा करायचे व राज्यकारभाराची सर्व सूत्रे आपल्या हातात घ्यायची असा ब्राह्मण मंत्र्यांचा डाव होता. तसेच संभाजीराजे हे हुशार, धाडसी,पराक्रमी, होते म्हणून संभाजीराजे यांना अटक करायला मोरोपंत, अण्णाजी, प्रल्हादपंत हे पन्हाळागडाकडे निघाले पण वाटेतच या कपटी, स्वराज्यद्रोही, नरपशूना.... स्वराज्यप्रेमी, शिवभक्त, राजाराम यांचे सख्खे मामा हंबीरराव मोहिते यांनी अटक केली आणि संभाजीराजे यांचा रायगडावर अभीषेक केला. !






तात्पर्य :-

विषप्रयोग झाला हे सारे जाणतात. काही ब्राह्मणी विचारांनाबळी पडून सोयराबाई ही यात सामील होत्या असे समजतात. पण त्याच वेळी शंभूराज्यांनी सोयराबाई यांना कधीच अटकही केले नाही व कोणताही त्रास दिला नाही उलट खुणानंतर ५-६ महिन्यांनी संभाजीयांनी सोयराबाई यांना गौरवले त्याचा सन्मान केला ! याचा वर पुरावा दिलेला आहे. म्हणजेच सोयराबाई या निर्दोष होत्या हे कोणीही खरा शिवप्रेमी कबुल करेल. म्हणजेच शिवरायांचा खून हा केवळ स्वराज्य बळकावण्यासाठी ब्राह्माण मंत्र्यांनी केलेला ब्राह्मणीकावा होता हे सिद्ध होते.

====================================================================



तरीही काही लोक खालील शंका उपस्थित करू शकतात :-

१. शिवरायांवर विष प्रयोग झाला का ?
>>>>>>>> परिस्थिती तशीच आहे. <<<<<<<<<


सुरवातीला आपण अमराठी साधने पाहूयात ......
१. इंग्रजांचे पत्र " शिवाजी महाराज यांचा मृत्यू रक्तातीसाराने झाला. "
२. पारसी कागद पत्र ( मासिरे आलमसिगरी - साकीमुस्तेखान ) " शिवाजी हे घोड्या वरून उतरले त्यांना अतिउश्नते मुळे दोन वेळा रक्ताच्या उलट्या झाल्या. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला "
३. निकोलो मनुची ( असे होते मोगल ) - " शिवाजीराजे यांना रक्ताच्या उलट्या होऊन मरण आले "
४. दाघ रजिस्टर ( डच कागदपत्र - १६८० (पृष्ठ ७२४.२९) संधर्भ परयीच्या दृष्ठी. ) - " राज्यांवर विष प्रयोग केला 
असावा "


वरील अमराठी साहित्य काय सांगते ?
शिवरायांना रक्ताच्या उलट्या झाल्या. हे कोणीही टाळू शकत नाही. शिवाजीराज्यांनी राजारामाचा विवाह १५ मार्च १६८० रोजी प्रतापराव गुजर यांचे मुलीशी लाऊन दिला आणि अवघ्या १८ दिवसात शिवाजीराजे यांचा मृत्यू झाला तोही रक्ताच्या उलट्या होऊन ! शिवाजीराजे रक्ताच्या उलट्या होऊन मरण पावले हे सारे जाणतात................. पण त्यांना रक्ताच्या उलट्या का झाल्या ? याचे उत्तर ब्राह्मणीसाहित्य त्यांचे भाषेत देते.


१. शिवदिग्विजय - " सोयराबाईंकडून राज्यांना विषप्रयोग झाला "
२. चिटणीस बखर - " सोयराबाईवरच आरोप ठेवते "



निष्कर्ष काय निघतो :--
१. कि सारे म्हणतात रक्ताचा उलट्या झाल्या.
२. दाघ रजिस्टर म्हणते विषप्रयोग झाला.
३. ब्राह्मणी साहित्य हि स्वीकारते कि विषप्रयोग झाला ! पण तो सोयराबाई यांनी केला !!
यातील कोणाकडे काहीही पुरावा नाही म्हणू हा गोंधळ होत आहे.
पण हे उघड आहे कि राजाराम यांचे लग्न झाले आणि १८ दिवसात शिवाजी वारले. लग्ना वेळी ते तंदुरुस्थ होते. कोणताही असाध्य रोग नव्हता. मग अचानक रक्ताच्या उलट्या का झाल्या ? या प्रश्नाचे उत्तर हेच आहे कि विषप्रयोग झाला. 





2. मग नवीन प्रश्न निर्माण होतो कि तो कोणी केला ?
त्यासाठी आधी रायगडावर त्याप्रसंगा आधी परिस्थिती कशी होती हे पाहावे लागेल 
रायगडावर शिवरायांचे घरात गृहकलश सुरु होता !! शिवाजी महाराज हे कोणी साधारण व्यक्ती नव्हते. महाराजांसारखे कुशल पारखी यांचे घरात गृहकलश ! 
ज्यांनी संपूर्ण भारतीय मूलनिवासी जनतेला एक जुठ केले , अनेक कुटुंबातील वाद आपल्या दरबारात योग्य न्यायाने मिटवले त्या महाराजांचे घरात गृहकलश !!! छे छे हे मनाला अजिबात पटत नाही ... ज्यांनी अफजलखानसारख्या महाकाय श्वापदाच्या आणि औरंगजेबासारख्या कुशाग्र बुद्धी असणाऱ्या बादशाच्या हातावर तुरी दिल्या. त्या महाराजांना आपल्याच घरातील वादावर हतबल व्हावे लागले हे मनाला पटत नाही. पण काय करणार भावना या भावनेच्या जागी राहतात आणि वास्तव हे वास्तव असते...... आणि वास्तव हेच आहे कि महाराज यांचे घरात गृहकलश होता !


गृह कलश होता हे वास्तव जड अन्तःकारणाने स्वीकारले तरी काही नवीन प्रश्न निर्माण होतात.गृहकलश काय होता ? त्याचे कारण काय ?
सोयराबाई यांना संभाजीराजे हे छत्रपती होणे पसंत नव्हते ! का ? तर त्यांचा १० वर्षाचा मुलगा त्यांना तेथे हवा होता !! पण राज्याभिषेकावेळी तर असे काही झाले नाही........ मग आताच का असे व्हावे कारण सोयराबाई यांचे मनात कोणीतरी विष कालवले..... मग हे विष कालवणारे कोण होते ? त्यांनी असे का केले ? 
ते होते ब्राह्मणमंत्री........अण्णाजी दत्तो हे या कटाचे मुख्य सूत्रधार होते !!!! अण्णाजी दत्तो.. ज्या माणसाने एक दोन वेळा स्वराज्यसाठी तलवार हि उचलली तो अण्णाजी ! असे का वागला ? 

कारण :--

A) संभाजी महाराज यांनी एक वेळा या आण्णाजीने केलेला भ्रष्टाचार उगडा केला होता ! त्याची बोच या अण्णाजी दत्तोच्या काळजात गेली होती.
B ) अण्णाजी दत्तोची विवाहित मुलगी हिचे संभाजी महाराज यांचे वर प्रेम होते ती त्यांचेकडे आकर्षित झाली होती. आणि त्यातून एक प्रसंगी तिने संभाजीराजे यांचे महालात जाऊन इच्छा व्यक्त केली होती. पण "पराविया नारी राखूमाई समान" या तुकोबांच्या विचारांशी नाते असल्याने व तसे संस्कार जिजाऊनी व शिवरायांनी केलेले असल्याने संभाजी महाराज यांनी तिला महालातून हाकलून दिले. त्यामुळे तिने स्वतःच्या कृतीचा पश्चाताप झाल्याने आत्महत्या केली. असे बरेच प्रसंग येथे देता येतील पण या दोन प्रसंगा वरून दत्तो का दात खाउन होता हे लक्षात येते.

शिवरायांवरील विषप्रयोगा आधीही ब्राह्मणमंत्री यांनी बरेच वेळा शंभू महाराज यांना बदनाम करणे व संपवण्याचा प्रयत्न केला होता. सोयराबाई आधी त्यांनी शिवरायांचे मनात विष कालवायचे अनेक प्रयत्न केलेले होते. 
तसेच शंभू महाराज यांना संपवण्याचे ही प्रयत्न याच मंत्री लोकांनी केले होते. सविस्तर माहितीसाठी आपण संभाजी ही कादंबरी वाचा.



तात्पर्य :- 

शिवरायांचे मंत्री हे कटकारस्थानी होते व त्यांनी संभाजी महाराज जिवंत असताना ही अनेक कारस्थाणे केली आणि ते शहीद झाल्यावर कारस्थानांचा वारसा त्यांचे वंशजांनी चालू ठेवला. 

आता कोणालाही वरील शंका नसावी. मराठा सामाज्याचा सर्वात मोठा प्रोब्लेम हा आहे कि आम्ही स्वतः कधी ही वाचन करत नाही ब्राह्मण सांगतात आणि आम्ही ऐकतो. आणि ब्राह्मण ही मोठे धूर्त असतात ते ही असे काही असत्य बिंबवतात कि सत्य हे बरोबर त्या उलट सापडते.......
वर सिद्ध होते कि ब्राह्माण मंत्री यांनी पहिल्यांदा शिवरायांचे मनात विष कळवायचा प्रयत्न केला. पण शिवराय यांचे स्वतःच्या पहिल्या मुलावर, स्वराज्याच्या भावी छत्रपतीवर प्रेम होते आणि असणार तसेच शिवराय हे दुसर्याचे ऐकणारे नव्हते , कान चुगल्याना बळी पडणारे नव्हते त्या मुळे धूर्त ब्राह्मण मंत्री यांचा हा प्रयोग फसला!

आता या मंत्री लोकांनी मोर्चा वळवला तो सोयराबाई यांकडे. सोयराबाई या सरळमार्गी,साध्या-भोळ्या,स्फटिक मनाच्या होत्या त्यांना या ब्राह्मण मंत्र्यांच्या चाणक्यानीतीचा ठाव नव्हता. त्यामुळे त्या सुरवातीला या मंत्र्यांच्या कानचुगल्याना बळी पडल्या !!!

काही वेळ शिवरायांचे कुटुंबात वाद निर्माण झाला पण त्याला हे मंत्री जबाबदार होते. यासाठी पुरावा म्हणू संभाजीराजे यांचे पत्र घ्या.

संभाजीराजांचे 24 डिसेंबर 1680चे पत्र उपलब्ध आहे. त्यात ते म्हनतात ..
."राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते. पण कुटिल मंत्र्यांनी दुष्ट सल्ला दिला की मोठ्या मुलाला गादी मिळता कामा नये. या सल्ल्याचा प्रभाव तिच्यावर पडला. "
आता हे स्पष्ट दिसत आहे कि शिवरायांचे घरात आणि संभाजीराजे यान वरील सर्व कटकारस्थानात फक्त आणि फक्त ब्राह्मण मंत्री होते ते अनेक वर्षापासून असे डाव आखत होते. त्या मंत्री गणाचे प्रतिनिधीत्व हे अण्णाजी दत्तो करत होते.

आता पुढे प्रश्न निर्माण होतो तो काय ब्राह्मण मंत्री यांचे चाणक्यनीतीला बळी पडलेल्या सोयराबाई या विषप्रयोगात सामील होत्या ? काय त्यांना याची पुसटशी हि कल्पना होती ?


 नाही ते शक्य नाही कारण "राणीचे (सोयराबाईचे) मन स्फटिकासारखे निर्मळ होते." असे खुद्द शंभू राजे बोलतात. अशी स्त्री असे करणे शक्य नाही. उलट त्यांना असा कट माहित असता तर त्यांनी पुढील घटना रोकली असती हे उघड आहे.

मग राहतात ते अण्णाजी दत्तो आणि त्यांचे सहकारी. बाकी कोणावर हि संशय घेता येणे शक्य नाही.






3. शेवटी आणखीन एक प्रश्न ब्राह्माण भक्त करतील कि अण्णाजी दत्तो यांनी फार चुका केल्या हे कबुल पण काय ते शिवरायानवर विषप्रयोग करतील ?
>>>>>>>>>>>>>>  हो ते करू शकतात. <<<<<<<<<<<<<


कारण त्यांनी संभाजी महाराज यांवर विषप्रयोग केल्याचे इतिहासात दाखले आहेत पण ते फसले.
त्यांनी केलेल्या अनेक गुन्हे शंभू महाराज यांनी माफ करून हि अण्णाजी आणि कंपूने शिवरायांचे स्वराज्य हे मोगल पुत्र अकबराला विश्वासात घेऊन वाटून घेण्याचा कट केला होता. आणि आम्ही संभाजीला संपवायला तुम्हाला मदत करतो अश्या आशयाचे पत्र हि लिहिले होते मोगल पुत्राला ! पण त्यांचे दुर्दैव मागील कटात त्यांनी हंबीरराव यांना फितावण्याचा प्रयत्न केला व हंबीरराव यांनी त्यांनाच धडा शिकवला आता त्यांनी मोगल पुत्राला स्वराज्य वाटून घेण्याचे आमिष दाखवले पण याही वेळी मोगल पुत्र तडक शंभू राज्यांना हे पत्र देऊन मोकळा झाला ! आणि या शिवद्रोह्याना हत्तीचे पाया खाली द्यावे लागले. 




आता तुम्हीच विचार करा :--

१. ज्या लोकांनी शिवरायाची शेवटची इच्छा (म्हणजे शंभूराजे यांना गाडीवर बसवणे ) पूर्ण करायचे सोडून शंभूराज्यांना कैद करायचा कट केला.

२. एवडे होऊन हि शंभूराजे यांनी काही दिवस कारावास देऊन यांना मोकळे केले तर यांनी पुन्हा शंभू हत्तेचा कट केला. त्यातून सुटले

३. परत यांनी शिवरायांचे स्वराज्य मोगलाला फुकट वाटून देण्याचे पत्र दिले व शंभू महाराज यांना संपवण्याची इच्छा केली.




हे शिवरायांचे भक्त असतील का ? यांनी शिवरायांवर विष प्रयोग केला असणे शक्य नाही का ?

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१२

अंधश्रद्धा ( माझी कविता )

अंधश्रद्धा

अंगामध्ये टाय कोट हातमध्ये बंग
चौकात मोठ लिंबू पाहून फिरला माघच्या माघ
पर्सनल कामी जाता येता मांजर गेली आडवी
अपशकून मोठा झाला म्हणून माया आपली भडवी
शिक्षण मोठ भारी त्याची इंग्लिश हाय फाय
पण नवरात्रीची नउ दिवस खेटखचून पाय
कामामधून ब्रेक मिळाला संकट पडल भारी
घेऊन परडी हातावरी जोगवा मागतोय दारी  
महागाईत कर्जाचा गाडला भारी टप्पा
तरी घरात बसतो त्याचा नवसाचा बाप्पा
यतीना सांग तयाला जालीम एक उपाय
तथागताच्या धम्मा शिवाय नाही तरणोपाय

                                         -  यतिन जाधव.   

बुधवार, १९ डिसेंबर, २०१२

गाडगेबाबा पुण्यतिथी विशेषक लेख

बुद्धाचा संदेश गावोगावी पोहचविणारे संत गाडगेबाबा 



श्री संत गाडगे महाराज 
                        गांधीनी वनवासी असे नामकरण करून ठक्कर बाप्पाच्या मदतीने आदिवासी बांधवाचे लक्ष विचलित करून शिक्षणाच्या नावाने ब्राहणीकरण करून त्यांना आहे त्याच परिस्थितीत ठेवण्याचा यशस्वी प्रयन्त केला. गाडगेबाबा किवा डॉ बाबासाहेब आदिवासी बांधवानाही समजलेले नाहीत. आदिवासी  आश्रमशाळा  राहुरी (अहमदनगर) ते सिताखंडी (नांदेड) पर्यंत १४ आश्रमशाळा "गाडगे महाराज आदिवासी आश्रमशाळा" या नावाने प्रसिद्ध आहेत. शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही; बाबा नेहमी म्हणत. एकदा "एका महाराला त्याच्या (मुंबईला असलेल्या) मुंलाचे पत्र आले. अनाडी-अज्ञान निरक्षर महार धावत गावातील ब्राह्मणाकडे (कुलकर्णी) जाऊन त्याला ते पत्र दिले. ब्राह्मणाने त्याचा गैरफायदा घ्यायचे ठरविले. 'माझे लाकूड फोडून दे मगच वाचून दाखवितो पत्र' दादा तुमचे पाया पडतो पत्र वाचून दाखवा माझा पोरगा सुखी आहे ना?" महाराने विनंती केली. घटकाभर (एक तास) पेक्षा जास्त वेळ त्या महाराने लाकडे फोड" बरीच लाकडे फोडली परंतु ब्राह्मणाने पत्र वाचून दाखविले नाही "गाढवा आधी लाकडे फोड" बारीक लाकडे फोडली. शेवटी गाठी असलेली लाकडे फुटत नव्हती. तशाही स्थितीत तो घामाघूम झाला. त्याने प्यायला पाणी मागितले परंतु कुलकरण्याने पाणीच पाजले नाही पण मनाला वाटेल त्या शिव्या दिल्या. गाठी फुटत नाही म्हणून महार हैराण झाला आणि शेवटी म्हणाला कुलकर्णीदादा वाचायचे नसेल तर नको वाचू पण मी या लाकडाच्या गाडी फोडू शकत नाही ते मला शक्य नाही. गाठी फोड, तरच पत्र परत देतो, नाहीतर जा तसच. 'ब्राह्मणाचे वाक्य  ऐकूण महार परतणार तोच समोरून गाडगेबाबा पाऊल सरकवत पुढे सरकले. त्यांनी  तो सारा तमाशा पहिला. आणि काठी गाडगे बाजूला ठेवून कुरहाड हाती घेतली; व मोठ्या कष्टाने त्या मोठ्या गाठी फोडल्या घामाघूम झालेल्या बाबांनी ब्राह्मणाला विचारले. 'काय दादाजी देता की नाही या महाराचे पत्र ' नजर त्याच्यावर रोखून बाबांनी ब्राह्मणाला दम भरला 'न शिकलेली माणसे गाढव असतात' बाबा म्हणाले ब्राह्मणाला शब्दनिच गार करीत.

                     टिळकांला शब्दांनी चराचर कापणारा क्रांतिकारी बाबा - गाडगेबाबांचा एक किस्सा मी या ठिकाणी उदधृत करतो. १४ फेब्रवारी १९१८ ला टिळक म्हणतात "स्वराज्य (भटमान्य) हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे. आणि मी तो मिळवणारच "स्वराज्य म्हणजे भट लोकाचे पेशवाईचे राज्य." १३ नोव्हेबर १९१७ च्या अथनीपासून महाराष्ट्रात  टिळकांनी एकच नारा दिला.  "तेल्या ताबोल्याना का कौन्सिलात घाना चालवायचा  आहे, कुणब्यांना काय नागर हाकायाचे आहे, शिप्यांना काय मशीन चालवयाची आहे" या दोन्ही वाक्यांना अर्थ होतो फक्त ब्राह्मणशाहीचे राज्य. पंढरपूरच्या भाषणात टिळकांनी इज्जत काढली. बाबासमोर येत होते. श्रोत्याची माना वळवल्या टिळकांना घाम फुटला, टिळकांनी श्रोत्याची मने ओळखली बाबांनी काहीतरी बोलवे असेच त्याचे मते होते. टिळकांनी बहुजानाचे मते काऊन्टर केले आणि गाडगेबाबान स्टेजवर आणले. गाडगेबाबा डॉ बाबासाहेबाच्या स्टेजवर कधीही चढले नाहीत. परंतु टिळकांनी गाडगेबाबांना स्टेजवर आणताच गाडगेबाबांनी टिळकांच्या  ब्राह्मणपथाला शब्दांनी झाडायला सुरुवात केली. बहुजनांनी पार्लमेंटमध्ये स्वतंत्र प्रतिनिधीकी मागणी केली होती त्यासाटी १९१८ मध्ये (ए.सी, ए.टी, ओ.बी.सी) बहुजनांनी फार मोठे आंदोलन केले तेव्हाही सोलापूर मध्ये  टिळकांनी अथनीचेच तेच भाषण केले. आणि तेच पंढरपूरला केले. तेव्हा बाबा म्हणतात. "टिळक महाराज, म्या चुकलो आम्ही ह्यातीभर तुमची कपडे धुतली, इस्त्री केली तवा आम्ही कस मार्गदर्शन करू. महाराज कायबी करा पण आमालाबी ब्राह्मण करा!' टिळकांच्या भाषणाचा बट्याबोळ करणारा तत्वज्ञानी बाबा गाडगे महाराजाच्या शब्दाना समाज समाज समजला. दरम्यान शाहू महाराज, भास्करराव जाधव यांनी साऊथ ब्युरो कमिशनपुढे मागणीचे निवेदन पदाविले होते. अहवाल भाग ५, दिनांक २३ एप्रिल १९१९ ला अहवाल प्रकाशित झाला. टिळकांनी केलेली समाजाची हक्क अधिकाराची हिंसा बाबांनी बहुजनाना पाठवून दिली.

अश्पृशाला  मदत करताना संत गाडगे आणि त्याचे साथीदार 
अश्पृशाला  मदत करताना संत गाडगे आणि त्याचे साथीदार 
                      बुद्धांनी हिंसा नाकारली तेच बाबांनी ज्या ठिकाणी म्हशी,कोंबड्यां रेडे,बकरे बळी दिले द्यायचे त्या त्या ठिकाणी जीवदया संस्था स्थापन केल्या.  बाबाच्या आंदोलनाला कांऊटर करण्यासाठी गांधीनी अहिंसा, साफसफ़ाइचे उपक्रम सुरु केले. आणि समाजात गांधीनी ब्राह्मण ब्नियाच्या वर्तमान दैनिकातून स्वतची वाहवा करून घेतली.बाबाच्या कार्याने त्यांना थांबयाला वेळ मिळत नव्हता. रत्नागिरी  खारेपाटण येथे कीर्तनाला सुरुवात केली तोच ५ ते १९२३ ला गोविंद (बाबांचा मुलगा) पागल कुत्राच्या चाव्याने मृत झाल्याने कळले, बाबा म्हणतात.

'गेले कोटी कोटी काय रडू एका साठी'

बाबांनी कीर्तन सुरु केले. देवदासी जोगती मुर्ळीच्या प्रथा ब्राह्मणा पडल्या होत्या या प्रथेत मुली देवाच्या नावाने सोडल्या जात त्याची लाग्ने देवाशी लावत व त्याचा उपयोग ब्राह्मण पंडे, पुरोहित घेत ती प्रथा बाबांनी मोडली. देव मोठा कि माणूस मोठा लोक सांगत देव मोठा बाबा म्हणत देव मोठा तर त्यांने तुम्हाला द्यायला पाहिजे तुम्हीच त्याला नारळ पेढे, लाडू,प्रसाद,फळे चढवटतात, तो खातही नाही मह तुम्ही का दगडाच्या मुर्त्यासमोर ठेवतात. त्याला कपडेही तुम्हीच घालतात त्याची अंघोळ तुम्हिच घालतात मग तो कसला देव ?

संत गाडगे बाबासह कीर्तन ऐकण्यासाठी जमा झालेल्या महिला 
                     १९५४ ला प्रयागच्या गोरक्षा परिषदेत त्यांना बोलायला आग्रह केला. सब लोग निश्चित करे तो एक दिन मी हि गोहत्या बंद हो सकती है, लोगो को गालत रह पार ले जा कर काळ के होनेवाले हजारो मानव सांहारो के आप हि जिम्मेदार नाही ही क्या ? मनुष्य जीवित राहा तो गोरक्षा का महत्व है ? मनुष्य का संहार करणे लागा, तो धर्माभिमान और गोरक्षा भी व्यर्थ है ! बाबांनी ब्राह्मणाना उलटा टोला दिला आणि आपल्या पुडाच्या मिशनसाठी काळू लागले. चंद्रभागा नदीत अंघोळ करी तर बाबा सांगत पाण्यात साहणारे जीवजंतू का पुण्य होत नाहीत. ते तर रात्रदिवस चंद्रभागा नदीत अंघोळ करीत असतात.

                     समता,स्वतंत्रता, बंधुभाव व न्यायासाठी संघर्ष करणारे बाबांना एक ह्रुदयद्रावक दृश्य पाहायला मिळाले. काही लोक पंक्तीत जेवायला बसले होते. ते जोराने ओरडले. तेव्हा बाबांनी विचारले ते अस्पृश लोक आमच्याबरोबर जेवायला बसलेत. त्यानाही भूक लागली खाऊ द्या! बाबांनी समजावले आमच्याबरोबर ते जेवणार नाहीत. जेवणारे इतर म्हणाले. तेव्हा बाबा कानवाळून म्हणाले काय रे एवढि  पण लाज नाही सर्व लोकाच्या नंतर जेवायला  बसण्यापेक्षा पोटात काटे का घालून घेत नाहीत. चला, आम्ही येथे थांबणार नाहीत आणि या ठिकाणी जेवणार नाही. बाबांनी पक्तीतल्या लोकांचे म्हणणे नाकारले त्याचे म्हणणे होते कि, अस्पृशानी अमचे उष्टे खाल्ले पाहिजे. बबन ते नको होते.

                  ईश्वर, आत्मा, ब्राह्यधाम, भोंदुगिरी, कपटनिती, फसवणूक, अहमपणा या टाकाऊ गोष्टी बाबांनी नाकारल्या ते उपदेश करताना म्हणत.

मेरा कोई शिष्य नहि है, और मै किसी का गुरु नाही हु! स्वयप्रेरणा से प्रपच के मोह को त्याग कर जो कोई इच्चामुक्त होकार दिनोद्धार के और अनपढ गरीब लोगो के देवधर्म के बरे मे लगा है, वे सभी मेरे अनंत जन्म के गुरु है!

हा बाबाचा जनकल्याणाचा संदेश आहे.

समतावादी डेबुजीने महार, मराठा, सुतार, धोबी, भिकारी, भटके एकत्र करून समता स्थापन केली.

                     सुखी संसार, समर्थक धीरवंत पत्नी, दोन गोडस मुली, नातेवाईक, शेतीबाडी, घरदार सारे कष्टाने मिळविले होते, गायी-गुरे, धनधान्य एवढ सर्व वैभवशाली जीवन असूनही बाबांनी घरदार का सोडले, तर त्यांना सत्य, न्याय, समता, ज्ञान, स्वतंत्र पाहिजे होते. प्रामाणिकपणे कष्ट करण्याची हिम्मत व टाकत होती; म्हनुनच त्याचे आंदोलन प्रामाणिकपणे "कष्टकरी अभियान" होते.१९०५ ते १९१७ पर्यंत १२ वर्षाच्या कालावधीत त्यांनी मोह, माया द्वेष,मत्सर, लोभ या सार्या टाकाऊ गोष्टी जमिनीत गाडल्या.

                      बाबाजी गुणाजी या मुलनिवासीला जवळ घेतले व जेवायला बसलेल्या डेबुजीला दापुर्यात नको नको करून सोडले होते. एका महाराबरोबर जेवतो म्हणून डेबुजीला लोकानी हिणवले. मात्र समतावादी डेबुजीने महार, मराठा, सुतार, धोबी, भिकारी, भटके एकत्र करून समता स्थापन केली. शेतीकरी-कष्टकरीचे अज्ञान, दैन्यावस्था, दरिद्र, सावकारी शोषण, ब्राहणी यंत्रणा, कोर्टाचे अन्यायी निकाल याविरुधात बाबांनी मिशन राबवले. विश्रांती नावाचा शब्द त्याच्याजवळ उरलाच नव्हता. पंढरपुर मुक्कामी (१४ नोव्हेंबर १९५६) ला सतत १६ तास उभे राहून कीर्तन केले. रात्री ८ वाजता संपल्यावर गायी गुरांसती गो गोदाम (गुरांचा वाडा) बांधला होतात्यात विश्रांती घेण्याचे ठरविले. सतत १६ तासच शारीरिक ताण पडल्याने ते अशक्त झाले म्हणून थोडीसी झोप घ्यावी, असा निश्चय ते पायीच निघाले मात्र केकाडी महाराजांनी बबन निरोप पडविला कि, कीर्तनासाठी यावे, विनंती निरोप आल्याने ते बाबा केकडी महाराजाकडे निघाले. रात्रीचे १२ वाजले होते. तेव्हा बाबा समूहाला म्हणाले, आतच पहायचे ते मला पाहून घ्या, ऐकयाचे ते माझ्या कडून एकुन घ्या. माझे शेवटचे कीर्तन आहे. (१५ नोव्हेबर १९५६) चे पंढरपुरातील शेवटचे कीर्तन होते. त्यांनी ब्राह्मण-यज्ञ, पूजा,षढयंत्र यावर बहुजनांचे प्रबोधन केले. बाबांना (बाबासाहेब आंबेडकरान विषयी) अत्यंत आदर होता. " काही दिवस जगायचे होते. पुष्कळ काम राहिले" बाबासाहेबांच्या निर्वनानंतर त्यांनी हळूहळून उद्गार काढले. बुद्धाचा सिद्धांत सांगणारे बाबा खरे भिक्षु होते. अन्याय, अज्ञान, वेदना दिसल्या कि, ते जगिक थांबून त्याचे निरीक्षण करीत व त्याला न्याय दिल्याशिवाय पुढे जात नसत.

                     डॉ. बाबासाहेबानी एक महत्वाची खबर धर्मातारापर्यंत पोहोचली.कदाचित डॉ. बाबासाहेबानी बाबानाच प्रथम त्याचे विश्लेषण सांगितले असावे. कदाचित गाडगेबाबा मुंबईच्या जे.जे. हॉस्पिटल शेजारी असलेला  आश्रम शाळेचे काम पाहत होते. बाबासाहेबांनी निरोप पाठवीला 'मला (हिंदुत्व सोडून) धर्मांतर करायचे आहे. मी आपल्याबरोबर चर्चा करू इच्छितो, बाबांना निरोप मिळताच डॉ. बाबासाहेबाना ते कुलाबा येथे येऊन भेटले. बराक वेळ चर्चा झाली. गाडगेबाबा खुश झाले. "डॉ. तुम्ही करणार ते योग्य असणार सारा समाज तुमच्या पाठीशी आहे."  डॉ. बाबासाहेबाच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. बाबा मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. मी बुद्धाला स्वीकारणार आहे. हा समारंभ नागपूर येथे होणार आहे' बाबासाहेब या चांगल्या कार्यातयशस्वी होतील, अशी आशा करून गाडगेबाबा तेथून न थांबता तेथून निघून गेले. गाडगेबाबा जास्त वेळ बाबासाहेबासोबत थांबत नसत. बाबासाहेबांवर फारमोठी जबाबदारी आहे. असे त्यांना वाटे. त्याचा बहुमोल वेळ वाया जाऊ नये असा ते विचार करीत. आणी इतरांसोबत ते जास्त ते जास्त वेळ घालवत  नसत. त्यात त्याचा वेळ वाया जाणार नाही, याची त्यांना चिंता होती.

                         आई, कळावणी (मुलगी) मुलगा गोविंद बाबापासून दूर गेलेत तरी बाबांनी त्याचा थागपत्ता घेतला नाही. समाज आणी त्याचे उत्थान हाच बाबाचा परिवार.

                         बाबांनी तुकाराम, चोखामेळा यांचा आदर्श घेतला आणी बाबा सतत चालत राहिले. समोरासमोर प्रहार केलेत. लोकांनी अधिकार म्हणून त्यांना मारहाण केली, त्यांनी सोसले, देव धर्माच्या नावाने यात्रेला व जत्रेला जाऊ नका असे गाडगेबाबा अज्ञानव पीडित समाजाला सांगत परंतु भट,पुरोहित,बडवे, पंडे त्याचे विचार काऊटर करण्यासाठी समाजाला फसवित. ऊन, वारा, पाऊस, वादळ, दिन, रात्र न पाहता भुके व अनवाणी भटशाहीला बळी पडत. जातीच्या नावाने अस्पृश फासत व जातीच्याच नावाने ब्राह्मण या अज्ञान समाजाला फसवत. त्यात जखमी होत, कोणी मेलेरीया, हैजा, गैस्टो, महामारी,रोगांनी  गरीब जनतेचे बळी जात असे, या जीवघेण्या रोगात जर बळी गेलातर देवाच्या दरी जागा मिळाली असा प्रचार-प्रसार ब्राह्मण अंगात ताप असतानाही लोक पंढरपुरला जात. त्या ठिकाणी हलकी जातीची माणसा म्हणून त्यांना ऊन, पावसात कोणीही घराचा छपराचा आसरा देत नसत.

                           गाडगेबाबांनी समाजाचे उत्थान करण्यासाटी जो त्याग घेतला तो फारक वेगळा होता असे मुळीच  नाही. पंढरपुरला यात्रेला जाणारे महार, मांग,वडार आणि इतर जातीच्या लोकांसाठी १९१८ साठी लाखो रुपये जमीन मिळवून धर्मशाळा बांधली. महार-मांगसारख्या कथित जातीला पंढरपुरात देवाच्या नावाने मृत्यू येऊन नये म्हणून व या बहुजन समाजाने स्वत:चे हक्काचे निवास समजून कोणाची भीती न बाळगता हक्क अधिकाराने राहावे हा विकार करून "संत चोखामेळा धर्मशाळा"असे नाव दिले.

                            हि धर्मशाळा, ट्रस्टीच्या ताब्यात जाण्याचा मार्ग निघाला तेव्हा धर्मशाळेला गांधीच्या आंदोलनाचे अभियान वसविण्याचा प्रयन्त झाला. चोखामेळा नाव कडून "संत गाडगेबाबा हरिजन धर्मशाळा" असे नामकरण करून १९३५ मध्ये गांधीवादाचे भांडवल पसरविण्यासाठी शिजला. गाडगेबाबांचे जे अभियान होते ते हरिजन नावाने गांधीच्या "हरिजन सेवा संघ", हरिजन पत्रिका" या दोन घटकांना जोडून संत चोखामेळा नाव टाळणे व गाडगेबाबांचे कार्य फक्त 'हरिजन' नावाच्या लोकांसाठी आःएआषे दर्श्वूब गाडगेबाबांचे आंदोलन करण्याचा प्रयन्त गांधी आणी गांधीवाद्यांनी केला. गाडगेबाबांना या सर्व षडयंत्र कारभाराची जाणीव होती. १४ जुलै १९४१ ला बाबाची प्रकृती ठीक नव्हती. महानंद्सामी नावाचा त्याचा चाहात्याने मुंबईत आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना गाड्गेबाबाची खबर दिली, बाबासाहेब तेव्हा भारताचे पहिले कायदेमंत्री होते. आणि त्यांना अर्जंट दिल्लीला जायचे होते. जास्त वेळ नव्हता सायंकाळच्या ट्रेनने दिल्लीला रवाना व्हायचे होते. मात्र बाबाचा निरोप मिळाला, त्यांना दुख झाले. सर्व कामे बाजूला ठेवली. दोन घोंगड्या विकत घेतल्याव महानंद्सामी सह ते बाबा ज्या खासगी रुग्यालयात होते तेथे गेले. बाबासाहेब येताच बाबा उठून बसले. कुणाकडून काही न घेणाऱ्या बाबांनी बाबासाहेबाच्या दोन घोंगड्या स्वीकारल्या. "डॉ. तुम्ही कशाला आलेत, मी एक फकीर, तुमचा किती मोठा अधिकार तुमचा एक मिनिट (देशासाठी) महत्वाचा आहे". गाडगेबाबा डॉ. बाबासाहेबांना म्हणाले. त्यावर बाबासाहेब म्हणाले, "बाबा माझा अधिकार दोन दिवसाचा आहे. उद्या खुर्ची गेली तर मला कोणीही विचारणार नाही. "तुमचे अधिकार अमर आहेत." या भेटीत डॉ. बाबासाहेबाच्या डोळ्यात निश्चित अश्रू जमा झाले असावेत. कारण हा ऐतिहासिक प्रसंग बाबासाहेबांच्या जीवनात परत येणार नव्हता, हे बाबा आणी बाबासाहेब जाणून होते.

(ढोंगी) बाबा, बुवा, पाखंडी, वैरागी,साधू-संन्यासी अशा लोकापासून बाबा आणी बाबासाहेब दोन्ही दूर होते. परंतु गाड्गेबाबाचे बाबासाहेबांवर अफाट प्रेम होते.समाजासती ते आंदोलन चालवत होते. पायाला स्पर्श न करू देणारे हा महान संत. समानतेने अभिवादन करणारा संत. समानतेने व समतेने अभिवादन करणारा संत बाबांनी कपाळावर टिळा, गंध, भस्मलावला नाही , न अंगावर भगवे कपडे घातले, गळ्यात धाग, दोरा, माळा घातला नव्हता, स्वत: फार मोठा विद्वान, साधू, संन्याशी, संत, आचार्य पंडित, स्रमाट जोगी मानले नाही. किवा उच्च आसनावर बसले नाहीत. समानता, बंधुभाव न्याय त्यांनी अंगीकार केलेला गुण आणी हेच बाबाचे समता-स्वातंत्र्याचे आंदोलन समाप्त करण्यासाटी गांधीनी बऱ्याचदा प्रयन्त केला. १९२५ ला सत्यशोधक आंदोलन समाप्त गांधीनी केले. नंतर  ते १९२७ ला पेरियार आंदोलन समाप्त करण्यासाठी गांधीनी प्रयन्त केले. मात्र पेरियार रामसामी गांधीपासून सावध होते. बाबांचे आंदोलन समाप्त करण्यासाटी गांधीनी त्याची भेट घेण्याचा प्रयन्त केला. बाबांना बाबांना गांधीनी निरोप पाठविला तेव्हा बाबा म्हणतात, :मुझे क्या काम है उनसे, समाज का बहुत काम करना है, मेरे पास वक्त नाही है!" तेव्हा गांधीनी नवीन उपाय आखला. मुंबई प्रांतचे प्रोव्हिसीएल मुखमंत्री बाळ गंगाधर खेर (गांधीचा ब्राह्मणावादी ब्राह्मण चेला) यांस गाडगेबाबांची भेट घालून देण्याविषयी कळविले. खेरने बाबाच्या मुक्कामावर पाळत ठेवली. एक साधा परंतु भरपूर जनजागृतीचे ज्ञान गांधीना कळल्यावर त्याचे आंदोलन संपविण्याची गांधीनी तयारी केली.

                          ३० नोव्हेबर १९३५ ला बाबांचे सामाजिक आंदोलनाचे कीर्तन वर्धा येथील गांधीच्या आश्रमजवळक खेरने दिली. सुमारे २०-२५ किमीवरून लोकांचे समूह बाबाच्या कीर्तनाला आले होते. झौंदिच्याझुंडी वर्धा नगरीत व तेथून आश्रमाच्या दिशेने येत होते. गांधीच्या मागे मागे एवढी प्रजा नव्हती. अख्या देशातूनही गांधीकडे एवढी जनता आली नव्हती.बाबाचा प्रभाव पाहून गांधी बाबाच्या भेटीसाठी स्वतहून गेले. आणि गांधीनी बाबांना उच्च आशान देताच बाबा जमिनीवर बसले. नंतर ते उभे राहिले त्यांनी (गांधीनी) हरिजन धर्माशाळेचा पुन्हा विषय काढला. (ज्या धर्मशाळेचे नाव संत चोखामेळा धर्मशाळा-पंढरपुर असे होते.) या सर्व धर्मशाळा गांधी (स्वत:च्या) ट्रस्टमध्ये जमा करणार होते. त्या धर्माशाळेचा विषय संपवून बाबांनी 'आंदोलनात्मक' कीर्तन सुरु केले. (संदभ -गाडगेबाबा पृ.९० प्रबोधनकार) गांधी, मदन मोहन मालवीय, शंकराचार्य कुर्नकोटी या सत्वाचा तत्कालीन नाटकी समाजसेवा अक्षरश: खोटा ठरविला. बाबांसमोर येऊन उभे राहणे गांधी स्वत:ला धन्य माणू लागले व बाबाच्या कार्यापुडे बापू, काय आणी शंकराचार्य काय सार्वक फोल ठरले. बाबांनी सत्यशोधक विचारातून गांधीला निस्टेन केले. लोकांनी त्याची वाहवा केली काय आणी बऱ्याचदा त्याची बदनामी आपल्या म्हात व उद्देश विचारले परंतु त्याचे उत्तराक त्याच्याकडे असल्याने मला बदनाम करू नका असेच त्यांनी चार्घावले व याज्ञाकारांना सांगितले. साक्षाकार, दृष्टांत यात्रा जमा हि थोतांड पटवून दिली.

                       गांधीनी बाबांना जेवणाचे आमंत्रण दिले. कीर्तन त्याच्याच आश्रमाच्या आवारात असल्याने व लोकांच्या प्रेमळ अन्ग्राहणे बाबांनी गांधीचे आमंत्रण स्वीकारले. त्याच्या आश्रमाच्या समोर गांधीचे निवासस्थान होणे बाबा त्याच्या निवासस्थाना बाहेर कट्ट्यावर बसले त्यांना त्याच्या आवडीचे जेवण विचारल्यावर बाबांनी कांदा, चटणी, ज्वारीची भाकरी व मासुरची डाळ असे जेवण सांगितल्यावर जमिनीवर बसून जेवले. बाकरींना सफरचंद, द्राक्षे, खाऊ घालून स्मित हास्य केले व "गरीब लोग खाते वही खाना बाबा खाते है." अपवित्र मानतात व ते पूर्वी प्रेतावर हि डाळ टाकायला सांगत देवोदास व कस्तुरा गांधी यांनी बाबांना जेऊ घातले आणि बाबा परभणीच्या रस्त्याला लागले. बाबा कोणाचाही भेट घेऊन वेळ वय घालवीत नसत डॉ. बाबासाहेबांची भेट मात्र ते स्वत:हून घेत हा त्याच्या आंदोलनाचा भाग होता. बाबाची आई (सखुबाई) खूप आजारी होती. तिला आपल्या लाडक्या डेबुची तोंड पाहण्याची इच्छा झाली पत्नी कुंता बाबाकडे आली आल्याचे कारण सांगितल्यावर बाबा कुंताबाईला म्हणतात. मला समाजाची भरपूर कामे करायची आहेत. संध्या वेळ नाही, माझे तोंड पाहून काय होणार. मागच्या तर भेटलो आईचा मृत्यू झाला परंतु बाबांनी समाजकार्य सोडले नाही. अस्पृश्य समाजाला दुक्ण्यासाठी मातीचे भांडे घेऊन त्याचा भिक्षापात्र म्हणून वापरले तर पाटीमागे पाऊल खुणा पुसण्यास घाण, अंधश्रद्धा, अज्ञान, अंधकार, विषमत्ता साफ करण्यासाठी (झाडूचा वापर) केला. महार, मांगांना अस्पृश्य म्हणून गावाच्या बाहेर राहण्यास भाग पडले. तर बाबानी आंदोलनासाठी त्याचा वापर केला. झाडाखाली पोत्यावर झोपून रात्र काढल्या. अंगभर चांगले कपडे वापरण्याची बंदी होती. त्या बंदीला काऊटर करण्यासाठी आणि त्या परिस्थितीला आंदोलनात बदल करून घेतला. फाटक्या कपड्याचे पासुकुलीत (चीवर) बनवून गाडगे बाबांनी आंदोलन केले. ब्राह्मण माधुकारीच्या नावाने फुकटचे खात बाबांनी गावच्या-गाव साफ केले. किवा लाकडे फोडून दिल्यावर आपल्या मातीच्या भांड्यात कष्टाचे जेवण घेतले. हि महान ओळखीच्या वर्गाला बाबांनी दिली. ब्राह्मणानी ज्या पद्धती बाबांनी आंदोलनासाठी वापरून अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी लढा दिला. धोबी जातीला १९६०-६१ पर्यंत महाराष्ट्रात अनुसूचित जाती म्हणून ओळखले जात होते परंतु नंतर महाराष्ट्र त्यांना ओबीसी म्हणून ओळखले जाते. पंढरपुरला एकदा गाडगेबाबा आपल्या मिशनसाठीआले होते. त्यांना पाहून त्या दिकाणी उपस्थित चालू आहे, अशा फाटक्या कपड्यात देव कधी  भेटतो काय ?  देव फटके कपडे घातल्यावर भेटत नसेल, तर कोणते कपडे घातल्यावर देव भेटतो ते तरी आपण सांगावे गाडगेबाबांच्या खेर उत्तर देऊ शकले नाहीत ते खाली मन घालून निघून गेलेत. गाडगेबाबा समोरच्या व्यक्तीला त्याच्याच विचाराने उत्तर देत. पी के अत्रेना त्याच्या पत्रकारितेवर घमेंड होता परंतु त्यांनी जेव्हा बाबाचे अभिनवयुक्त जिते-जागते समाज जागृत कीर्तन पहिले एकले तेव्हा त्यांनी आपला अभिप्राय व्यक्त केला. "गाडगेबाबांचे कीर्तन एकले तर मला असे वाटले माझे ५५ वर्षाचे आयुष्य फुकट गेले.

                        " डॉ. बाबासाहेब आंबेडकर जेव्हा बाबांचे कीर्तन ऐकत. जेव्हा बाबासाहेब कीर्तन एकूण आपल्या पुढील कामासाठी निघत तेव्हा गाडगेबाबा आपल्या कीर्तनकार मंडळींना डॉ. आंबेडकर कि जय अशा घोषणा देत मनमाड येथे १९४२-४३ ला गाडगेबाबांनी बाबासाहेबांना शोषित-पिडीत  समाजाचे उद्धारक म्हटले. बाबासाहेबांची महानिर्वानाची बातमी गाडगेबाबांनी ऐकली आणि त्यांनी दवा, ऑषधी घेण्याचे सोडले. ते खचून गेले,करोडो समाजाला ते सोडून गेले आणि त्यांनी त्यासंदभार्त उदगार हि काढले, बाबासाहेबांची दु:खद बातमी कळली. त्यानंतर त्यांनी मुंबई सोडली. मुंबई-हावडा एक्सप्रेसने अमरावतीला निघाले, जणू त्यांना जीवनात संपल्याची आयुष्याने सूचना दिली होती. आता त्यांना जीवनात निराशा दिसली १७ डिसेंबर १९५६ ला प्रकृती गंभीर झाली. त्यांनी आडमिट केलेले हॉस्पिटल हि सोडले. १९ डिसेंबर १९५६ ला ते बडनेराला गेले आणि त्यांना नगरवाडीला जाण्याची इच्छा केली. "माझा मृत्यू कोणाच्याही घरी व्हायला नको, मी रस्ताने जाताना मारायला पाहिजे,. जेथे मी मृत होणार त्याक ठिकाणी माझे अंतिमसंस्कार करावे." असे बाबांनी आपल्या साथीदारांना सांगितले. स्मारक किवा मंदिर बनून न मी जे कार्य केले ते अखंड चालू ठेवा तेच माझे स्मारक आहे." , बाबांनी आपल्या नागर्वाडीला शेवटचा श्वास घेण्याची परंतु त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्यांना अमरावतीला घेऊन जायला सांगितले, बाबा झोपले होते, त्यांना अचानक जाग आली, "नागरवाडी  अजून आली नाही का?" बाबांनी विचारले.साथीदारांनी गाडी अमरावतीकडे जात असल्यास सांगितले. बळगावच्या पुलावरून गाडी जात असताना बाबांनी प्राण सोडले. रात्री १२.२० वाजले होते. २० डिसेंबराचे फक्त २० मिनिटे बाबांनी अंतिम श्वासाचे घेतले,  "नागरवाडी  अजून आली नाही का?" हे वाक्य बाबाचे अंतिम शब्द ठरले. अंधार पडल्यावर अग्नीसंस्कार केले जात नव्हते परंतु बाबांनी केलेले कार्य अंधश्रद्धा नष्ट करण्याचेही असल्याने बाबाच्या प्रेरणा घेणारयानी बाबाचे संस्कार केलेत. हा संदेश आकाशवाणीवरून सर्व दूर प्रसारला. एकाच महिन्यात दोन महापुरुषाची महाअंत्ययात्रा जगातील एकमेव उदाहरण आहे. जे दोन्ही एकाच विचाराचे व एकदुसर्याला मान-समान देत. स्व:तच्या प्राणाची आहुती देणारे थोर समाजसुधारक होते. दोघाची रणनीती वेगवेगळी असली तरी उद्देश,ध्येय एकच होते. इतिहासाला चराचर कापणारी महापुरुषाची एकमेव जोडी होय. ज्यांचे राहणीमान व शिक्षण एकसमान नव्हते परंतु दोघांच्या विचारचा खजिना बुद्धाच्या सामाजिक क्रांतीकडे घेवून जाणारा होता. रात्री २.२० मिनिटांनी बाबाचे अंत्यसंस्कार पार पडले. आणि एक महान अशा राष्टीय संताला भारत देश मुकला, बाबाचे अपूर्ण कार्य आज फक्त बामसेफ करीत आहे. १९०५ ते २० डिसेंबर १९५६ असे ५१ वर्ष या समाज क्रांतीकाराने अविरत कार्य केले. सतत चालत राहिले. मृतदेहसुद्धा अस्थिर राहिला त्यांना स्थायी निर्वाण नको होते. तेच घडले. वयाच्या २९ वर्ष गृहत्याग करणाऱ्या बाबाचे ८०व्या वर्षी महानिर्वाण झाले, बुद्धाचे महानिर्वाणाप्रमाणे बाबा अखेर पर्यंत झुंजत राहिले. ब्राह्मणी साहित्यकारांनी लेखणीचा गैरवापर करून ब्राह्मण, भट, पुरोहित, पंडे अशा भात समाज सुधारक बनवले.

                      बांद्रा पोलीस स्टेशन येथे ८ नोव्हेंबर १९५६ ला बाबांना किर्तनासाठी बोलावले गेले. बाबांची प्रकृती ठीक नव्हती, तरीही किर्तनासाठी हजर राहिले. त्यांना कोणीतरी प्रकृती ठीक नाही तरी का आलेत. तेव्हा त्यांनी विनोदांनी त्यांना हसविले. "पोलिसचा नियम आहे. का नाही आला. बेड्या घालून पकडून आणा." साळ्याला माझीच फजिती झाली असती. शेवटी मी आलोच. मग खोकला होऊन मरा.. आणखी कशाला मरो! पोलीसानां लाजवणारा विचार बाबांनी सांगितला तेव्हा पोट भरून हसलेच........


बाबांचा अमर संदेश -
"बाप हो, देव न तिर्थात ना मूर्तीत , तो दरिद्रीनारायणाच्या रुपात तुमच्या समोरच उभा आहे."
तन मन धनाने बाबांचे मिशन बहुजन समाजाला पूर्ण करायचे आहे. बाबा पुढे चालत राहिले-मागे  कीर्ती वाटत गेली!
--------------------------------------------------------------------------------------------------------------------------



                                    किर्तीचा लोप हि शुल्लक गोष्ट आहे,
                           पण प्रज्ञेचा लोप हि दु:खद  गोष्ट  आहे.,
                       दोन्ही महामानव आणि एकच राष्ट्र आहे....!!!

                                                               - यतिन जाधव.

--------------------------------------------------------------------------------------------------------------------------



बुद्धाचा संदेश गावोगावी पोहचविणारे संत गाडगेबाबा 

यांना त्याच्या महापारीनिर्वान दिना निमित

त्याच्या पवित्र स्तृतीस कोटी कोटी प्रणाम........!!!!!

                                                              - यतिन जाधव.