सोमवार, १७ डिसेंबर, २०१८

● सम्राट अशोक त्यांचा धम्म आणि त्याचे भवितव्य

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

                ● सम्राट अशोक त्यांचा
                धम्म आणि त्याचे भवितव्य
                    लेख - सुरेंद्र पवार

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

               त्या तलवारीतून (खडंगातून) फक्त किंकाळ्या, आरडाओरड ऐकू यायचे. "चंड" अशोक म्हणून ओळखला जायचा तो "विद्रुप" म्हणून त्या सुंदर महिला हसल्या होत्या आणि एका क्षणाच्या आत त्याच्या सुंदर मुंड्या धडाच्या वेगळ्या झाल्या होत्या. संध्याकाळी कत्तल खाण्यासारख्या त्या कारागृहात सगळ्या आरोपीची मस्तके उडविताना अशोक आपली चंडगिरी सिद्ध करायचा त्या किंकाळ्या ते चित्कार! स्वतःच्या सावत्र भाऊ सुशीमला मारताना हि त्याला काहीही वाटलं नाही. त्याच्यासाठी केलेल्या सापळ्यात सुशीम पडला आणि भस्म झाला. पण एका बाजूने त्याची पत्नी विदिशा त्याच्यात हळू हळू बुद्ध परित होती आणि झाले ही तसे कलिगाच्या त्या युद्धात राशीच्या राशी मासाचा, हाडांचा डोगर, रक्ताच्या नद्यांच्या नद्या पाहून सम्राट पदाच्या आनंद फार वेळ पचवू शकला नाही आणि हाथातून ती तलवार (खडंग) आपोआप सुटले आणि एकच घोष निघाला. "बुद्धम शरणम गच्छामि ।"

अशोकला बदलला त्या सुशीमच्या सात वर्षाच्या मुलाने तो भिक्षू सात वर्षाचा सरळ अशोकाच्या सिंहासनावर जाऊन बसला. अशोकातील चंड जागा झाला लगेच तलवारीवर (खडंगावर) हाथ गेला. त्याला वाटलं सुशीमच गादीवर बसला आहे, कारण सुशीम असाच दिसायचा. तो मुलगा लगेच उठला आणि म्हणाला - "राजा कसा बसतो? ह्या सिंहासनावर किती तरी विंचू आहेत. ह्या सिंहासनावर मी एक मिनिट सुद्धा बसू शकत नाही. हे मलमूत्र सारखेच आहे." माझ्यासाठी आणि सम्राट मध्ये आमूलाग्र बदल झाला. नंतर त्याने मोगलीपुत्त तिस्साला भेटायला गेला. जे अर्हत होते. पण त्यांनी सांगितले की - "ते येणार नाहीत. ते सुद्धा सम्राट आहेत." धर्माचे आणि अशोक स्वतःहून नदी पर्यंत भंतेना भेटावयास गेले. भंते होडीतून बाहेर आले आणि सम्राट पुढे होऊन हाथ मिळविला. तेव्हा पासून आपल्या भारतात हस्तदोलन हा प्रकार सुरू झाला. दोन अनोळखी आता सुद्धा एकमेकास हाथ मिळवितात व मित्र होतात. हि प्रथा तेव्हापासून भारतात सुरु झाली आणि मग मोगलीपुत्त तिस्सानी अशोकाला विपश्यना दिली. सम्राट अशोक राजस्थान मध्ये जवळ जवळ ६ वर्ष विपश्यना करत होते आणि त्यात प्रवीण होत होते.

आज ८३००० स्तूप व लेण्या आपण पाहतो. ते त्यांचीच देन आहे. अखंड भारत करून त्यांनी आपली संपत्तीचे समान विभाग करून जनतेत वाटले. अशोकांनी पहिल्या प्रथम बुद्धांचा उपदेश उपयोगात आणला. आर्थिकतेच्या बाबतीत आणि त्यानुसार आपल्या राज्यात ही आर्थिक समानता असावी, ते सिद्ध केले. राज्याचा पैसा तो जनतेचा सर्व लोकांना सामान जमीन वाटली. तक्षशीला, नालंदा विद्यापीठात लोक बाहेरून येत. त्यांच्या राहण्याची व्यवस्था खाद्य ह्याची व्यवस्था स्वतः अशोकाच्या आदेशाने होत होती.

नशा - पाणी, नाच - गाणे, नाटक, शस्त्र ठेवणे ह्याला बंदी आणली. मनुवाद बंद केला. सर्वे समान आहेत, म्हणून प्रचार प्रसार केला. चंड अशोकचा धम्म अशोक ज्या विपश्यनेमुळे तो धम्म अशोक झाला. ती विपश्यना व धम्म बाहेरील देशात प्रचार प्रसार करणारा पहिला राज्य सम्राट अशोक होय. असे म्हणतात की - त्याच्यात जी मंगल मैत्री जागली. त्यामुळे वेगवेगळ्या लोकांतील देवता, ब्रम्हाचा लाडका म्हणजे प्रिय होता, म्हणून त्याला लोक "देवान प्रिय राजा" म्हणत. ८३००० लेण्या बांधताना वेगवेगळ्या ग्रहातील दगड वापरले. त्यामध्ये तुषित लोक,१६ ब्रम्ह लोक असे अनेक लोक मधील देवतांनी लेण्या बनविल्या व त्यावर वेगवेळ्या औषधी झाडे लावली. पारिजातक हे परनिर्मिती वंशवर्ती देव लोकातील फुल ते पृथ्वी वरील नाहीत.

एका वर्षात ८३००० लेण्या बांधल्या गेल्या. इतर लोकांतील वेगवेगळे आभूषणे व सोने, हिरे, मोती आकाशातील वेगवेळ्या ग्रहावरून आणले गेले म्हणूनच तर ह्या देशाला सोन्याची चिडीया बोलू लागले. राम राज्यात मनुवाद होता. खालील जातीतील, पीडित, शुद्र  लोकांवर अन्याय होत होता. जसे शंभुकाचा वध किंवा स्त्रीयावर अन्याय स्वतः सीतेला जंगलात सोडणारा श्रीराम होता. पण सम्राट अशोकाच्या राज्यात लोक प्रगती पथावर वर होते, असे लोक होते. जे परग्रहावर जात असत, येत असत. त्यामुळे खूपच धम्म समजत होता.

पृथ्वीवर नव्हे तर त्यावेळी ६ देव लोक व १६ रूप ब्रह्म लोक हि बुद्धाचे अनुयायी होते आणि हे साध्य झाले. ते मोगलीपुत्त तिस्समुळे त्यावेळी पृथ्वीवर हजारोच्या संख्येने अर्हन्त होते आणि इतर ग्रहावर हि तेव्हढेच होते. त्यावेळी देवता ब्रम्हाला परमात्मा वैगेरे मानत नसत. कारण तेही मरणारे आहेत. हे सिद्ध होण्यासाठी त्यावेळचे अर्हन्त एकत्र असत किंवा स्वतः ब्रह्म लोकातील ब्रम्ह अर्हन्त अशोकाच्या सानिध्यात येऊन सांगत. देवता ब्रम्ह लोकात ही वैदिक धम्म होता व बौद्ध धम्म होता. तिथे ही वेगवेगळ्या विचाराचे लोकात भांडणे होत असत.

देवता, ब्रम्हा व मनुष्य समान आहेत. फक्त ग्रह वेगवेगळे आहेत. पण दोन्ही मरण धर्मीच आहेत. ह्यामुळे कोणी उच्च नाही की नीच नाही. पण काही मनुवादी देवता ब्रम्हा स्वतःला मनुष्यापेक्षा श्रेष्ठ समजत. पण जेव्हा बुद्धांच्या वेळी व अशोकाच्या वेळी मनुष्य त्याच्या लोकी येऊन त्याच्यापेक्षा रिद्धी - सिद्धी मध्ये उजवे ठरू लागले व तेथील अर्हतांनी हि सिद्ध केले की - "सर्व समान धर्मी आहेत. कोणी उच्च नाही की नीच नाही. फक्त धातू वेगवेगळे आहेत." अशोकाच्या वेळी जे ब्रम्हा व देवता, यक्ष लोक अर्हत झाले होते. ते तेथील मनुवादी देवता ब्रम्हा पेक्षा भारी व जास्तच रिद्धी - सिद्धी होते व उजवे होते. त्यामुळे पृथ्वीवर ते कहिही वाईट घटना किंवा घातक कार्य करता येत नव्हते. त्यात अशोक पुण्य परिमिता युक्त आणि बुद्धाचे भविष्य ह्या सत्यासमोर देवता, ब्रम्हा नपुसक होते. दोन गट होते. एक समतावादी व एक असमातावादी आणि खरंच त्यावेळी मार हि हरला होता. कारण सम्राट आता धर्माचा सम्राट होता. त्याला कोण नमविणार होत. कोणीही नाही आणि बुद्ध कालीन जास्तच वय जगणारे अर्हत देवता, ब्रम्हा होतेच. समर्थनाला आणि त्याची परिमिता ही!

अशोकाच्या ८०० वर्षानंतर जेव्हा ह्या देशात अर्हत होणं बंद झाले. तेव्हा मात्र ह्या देशात सत्य धम्मानी साथ सोडली आणि त्यात महायान, वज्रयान असे दूषित विकृत धर्म निर्माण झाले. त्यामुळे देवता ब्रम्हा लोकी सुद्धा अर्हन्त होणे बंद झाले. मनुष्य लोकी जी प्रथा जोर धरते ती प्रथा देव लोक व ब्रह्म लोक मध्येही सुरु होते. हा निसर्ग आहे. ह्या सर्व घटनेचा फायदा माराला होतो. परनिर्मिती कारक वंशवर्ती देवताला बुद्ध धम्म आवडत नाही. त्याला लोकांची दिशाभूल करण्यात मजा येते. तो दिशाभूल करण्यासाठी मनुष्याना भरकटवितो. कारण त्याला कोणी अर्हत किंवा बुद्धत्व होऊन त्याच्या क्षेत्रा बाहेर गेलेलं आवडत नाही. त्याला सत्व - जन्म - मृत्यूच्या विळख्यात असावे, हेच आवडते. हा त्याचा स्वभाव आहे. म्हणून तर कधी सत्व मनुष्य व्यक्ती होतो. तर कधी प्राणी, कधी देवता कधी, ब्रम्हा ह्या प्रवासात सत्व अडकते आणि हेच त्या परनिर्मिती वंशवर्ती लोकांतील काळ ब्रम्हाला आवडते. तो कधी आल्हा स्वतःला म्हणवितो. तर कधी परमात्मा, तर कधी ईश्वर! हा काळ ब्रम्हा हि वेळेनुसार मारतो आणि कर्माच्या गतीनुसार जन्म घेतो. हा एकच नाहीय करोडोने आहेत. तो एक स्वयं प्रकाशीत लोक आहे.

आज आपण जे जीवन जगतोय. ते काल ब्रम्हा म्हणजे परनिर्मिती वंशवर्ती देवता माराच्या राज्यात जे असत्य आहे. त्यात आज मनुवाद त्याचेच प्रतीक आहे. लोक सदाचार सोडून चमत्कार, परमात्मा वगैरे अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकले आहेत. जेव्हा महंमद गजनीने कत्तली केल्या. तेव्हा कोणीही अर्हत नव्हते. ते भिक्षु धम्माचे पालन करत नव्हते. तर खूप तर चरित्र भंग भिक्षु होते. त्यामुळे ह्या मरानी डाव साधलाच आल्हा बनून सत्य धर्म हा धारण केला. तरच धावून येतो. असत्य धारण केल्यावर सत्य कसे धावून येणार? तुम्ही कोणता धम्म धारण केलंय? तेसेच होणार की मग तुम्ही कोणतीही पातळी लावा. भिक्षु असा ना धम्म काही परमात्मा नाही. जसे बीज रोवणार तसे होईलच. तुम्ही त्याचे नाव घ्याल व तो खुश होईल असे नाही, होत नाही. जे धारण कराल तेच फळ येईल आणि त्यावेळी  कोणी अर्हत नसल्याने त्याच्यात कोणती ताकत नाही की - "ते आपल्यासाठी कोणते संरक्षण तयार करतील किंवा त्यांच्यासाठी धावून येईल.

आज बुद्ध धम्माच्या शोधाला कोणी मानत नाहीत. अर्हत होणे तर दूरची बाब पण आता विपश्यना ह्या देशात पोचली आहे आणि लोक श्रोतापन्न (जागृत) होत आहेत. यामुळे इतर ग्रहावर चांगले देवता ब्रम्ह तयार होत आहेत. तेव्हा परत ह्या देशात धम्म पसरेल, हि भविष्य वाणी बुद्धांची आहे. जशी भविष्य वाणी होती तसे झाले. २५०० वर्षानी परत धम्म भारतात येईल व तसेच झाले एक बोधिसत्व ज्यांनी परत ह्या देशात धर्मातर केलं व पहिली वेळ ह्या देशात "बुद्धम शरणम गच्छामि" चे स्वर ऐकू येऊ लागले आणि ते बोधिसत्व डॉ. भिमराव रामजी आंबेडकर आहेत. धम्म तर आला पण त्यावर चालण्याचा मार्ग विपश्यना ज्यांनी अर्हत होता येत. तो धम्म मार्ग हि निसर्गतःच आला आणि त्याचे श्रेय सत्यनारायण गोयंका गुरुजी यांना मिळते.

◆◆◆

लेखक -
आयुष्यमान सुरेंद्र पवार
(लेखक, कवी आणि आंबेडकरी विचारवंत)
"सदस्य : स्क्रीन राईटर्स एसोसिएशन"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

प्रचारक, अनुवादक एवं संकलन कर्ता -
यतिन जाधव (व्यवस्थापक एवं संचालक)
"दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क ऑफ इंडिया"

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

एकदा नक्की भेट द्या.
• दि बुद्धिस्ट सोशल नेटवर्क आँफ इंडिया
Www.FaceBook.Com/BsnetINDIA

• एक रात्र निळ्या पाखराची
Www.FaceBook.Com/NilePAKHARU

• यतिन जाधव फेसबुक अकाऊंट
Www.FaceBook.Com/UatinJADHAV789456123

• मातृ संघटनेत सहभागी होण्याकरिता
Www.SSDIndia.Org

▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬

• YATIN JADHAV : 9967065953
• RAMESH BHOSALE : 9773338144
• BSNET HELPLINE : 7738971042
(Use Only One WhatsApp Number)

सादर The Buddhist Social Network Of India : WhatsApp Group वर (ADD) सहभागी व्हायचे असल्यास मेसेजने संपर्क करा.

धन्यवाद ।

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा